शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्र निवडणूक 2019: शेवटच्या तासापर्यंत मी आशावादी; शरद पवारांना सत्तास्थापनेची खात्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 13:47 IST

शिवसेना सोबत न आल्यास स्वतंत्रपणे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली भाजपाने सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत, तर दुसरीकडे....

ठळक मुद्दे९ तारखेपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास विधानसभा विसर्जित होऊन राष्ट्रपती राजवट लागू शकते.'भाजपा-सेना आज ना उद्या एकत्र येतील आणि सरकार स्थापन करतील याची आम्हाला खात्री वाटते'शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी कुठलंही प्रपोजल आणलं नव्हतंः शरद पवार

महाराष्ट्रात भाजपा - शिवसेना महायुतीकडे बहुमताचा आकडा असला, तरी त्यांच्यात मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून एकमत होत नसल्यानं सत्तास्थापनेची कोंडी फुटता फुटत नाहीए. ९ तारखेपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास विधानसभा विसर्जित होऊन राष्ट्रपती राजवट लागू शकते. त्यामुळे सगळेच पक्ष वेगाने हातपाय मारताना दिसत आहेत. शिवसेना सोबत न आल्यास स्वतंत्रपणे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली भाजपाने सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत, तर दुसरीकडे शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये भेटीगाठी, फोनाफोनी सुरू असल्याचंही समजतंय. त्यामुळे राजकीय वर्तुळाचं लक्ष राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे आहे. सातत्याने विरोधी पक्षात बसण्याची भूमिका पवार मांडत असले, तरी सस्पेन्स कायम ठेवण्याचं कामही ते चोख बजावताहेत. आजच्या पत्रकार परिषदेतही, राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत बोलण्यासारखं काही नाही, असं म्हणतानाच ते बरंच काही बोलून गेले.

...अन् अखेर शिवसेना नेते मुख्यमंत्र्यांना भेटले, चर्चेचे चक्र फिरले; उद्धव ठाकरेंना मानाचं पद?

शरद पवार म्हणतात, तुमच्याप्रमाणे मीदेखील त्यांची आतुरतेनं वाट पाहतोय

राज्यातील जनतेनं भाजपा-शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी कौल दिला आहे. त्यांची युती आजची नाही. २५ वर्षांपासून ते सोबत आहेत. त्यामुळे ते आज ना उद्या एकत्र येतील आणि सरकार स्थापन करतील याची आम्हाला खात्री वाटते, असं शरद पवार यांनी पुन्हा स्पष्ट केलं. आता अवघे काही तास उरले आहेत आणि भाजपा-शिवसेनेतील तिढा सुटताना दिसत नाही, अशा परिस्थितीत राष्ट्रवादीची भूमिका काय असेल, या प्रश्नावरही त्यांनी युतीच्या एकीचा आशावाद व्यक्त केला. त्यांचं जमेल असा विश्वास मला अगदी शेवटच्या तासापर्यंत आहे, असं त्यांनी नमूद केलं. 

२५ वर्षं युतीत सडली म्हणाले, पण एकत्रच निवडणूक लढले; शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना टोला

'शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास काही दिवसांत पुन्हा निवडणुका होतील'

राज्याच्या सत्तास्थापनेत माझी कुठलीही भूमिका नाही, पुढचे तीन दिवस तर मी मुंबईतही नाही, असं शरद पवार म्हणाले खरं; पण निर्णय घ्यायचा झालाच, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रच घेतील, असंही त्यांनी सूचित केलं आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी कुठलंही प्रपोजल आणलं नव्हतं, ते नेहमीच भेटतात आणि आमची भेट सकारात्मकच होते, राज्यसभेच्या विषयासंदर्भात ते आले होते, असंही त्यांनी सांगितलं.

भाजपा-शिवसेनेनं घटनात्मक पेच निर्माण होऊ देऊ नये, त्यांच्याकडे संख्या आहे, त्यांनी सरकार बनवावं. आमच्याकडे संख्या असती तर आम्हीच बनवलं असतं, वाट पाहिली नसती, असा सल्लाही त्यांनी दिला. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस