शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

औरंगाबाद निवडणूक 2019 निकाल : दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांचा कन्नड मतदारसंघातून पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 16:41 IST

Maharashtra Election 2019 Result : अंतिम फेरीनंतर जाधव यांचा १८ हजार ६९० मतांनी पराभव झाला आहे

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र जवळपास आता स्पष्ट होताना दिसत असून काही मतदारसंघातील निकाल हाती आले आहेत. कन्नड विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा विजय मिळवणारे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांचा पराभव झाला असून, शिवसेनेचे उमेदवार उदयसिंग राजपूत विजयी झाली आहेत. राजपूत यांना ७९ हजार २२५ मते मिळाली आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाचे कारण ठरल्याने हर्षवर्धन जाधव मोठ्याप्रमाणावर चर्चेत आले होते. तर दानवे यांचे जावई असल्याने त्यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कन्नड विधानसभा मतदारसंघातील अंतिम फेरीनंतर जाधव यांचा १८ हजार ६९० मतांनी पराभव झाला आहे.

शिवसेनेचे उमेदवार राजपूत यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. त्यामुळे जाधव यांना मोठा धक्का बसला असून दोन वेळा विधानसभेत पाठवणाऱ्या कन्नडच्या जनतेनी त्यांना यावेळी नाकारले असल्याचे दिसून आले. तर याच मतदारसंघातून रिंगणात असलेले पाणीपुरवठा मंत्री यांचे जावई किशोर पवार यांचा सुद्धा पराभव झाला आहे.

मिळालेली मते

उदयसिंग राजपूत ( शिवसेना) ७९ हजार २२५,

हर्षवर्धन जाधव ( अपक्ष ) ६० हजार ५३५

संतोष कोल्हे ( रॉ. का.) ४३ हजार ६२५

जाधवांना 'ते' वक्तव्य पडले महागात

विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यात हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यांनतर महाराष्ट्रभरातून त्यांच्यावर शिवसेनकडून टीका होताना पाहायला मिळाली होती. तर कन्नड तालुक्यात सुद्धा शिवसेनेची मोठी ताकद आहे. तर जाधव यांच्या त्या विधानानंतर शिवसेनच्या नेत्यांनी जाधव यांना पाडण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली होती. त्यामुळे जाधव यांची अडचण वाढणार असल्याचे बोलले जात होते. तर जाधव यांचा पराभव झाल्याने, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कलेले वक्तव्य त्यांना महाग पडल्याचे बोलले जात आहे.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kannad-acकन्नडAurangabadऔरंगाबाद