शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नितीन गडकरी 'इन अ‍ॅक्शन'; तिढा सुटेल म्हणत शिवसेनेला 'समजावला' मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 13:25 IST

नितीन गडकरींचे संघाशी आणि 'मातोश्री'शी जवळचे संबंध असल्यानं भावांच्या भांडणातून ते 'मार्ग' काढू शकतात, भाजपा-शिवसेनेत 'पूल' बांधू शकतात, अशी आशा निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेची कोंडी काही केल्या फुटायला तयार नसताना, हा गुंता सोडवण्यासाठी वेगवेगळी नेतेमंडळी सक्रिय झाली आहेत. त्यात, देशात महामार्ग बांधणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पुढाकार विशेष लक्षवेधी मानला जातोय. त्याचं कारण, नितीन गडकरींचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आणि 'मातोश्री'शी असलेले जवळचे संबंध. त्यामुळे ते भावांमधील भांडणातून 'मार्ग' काढू शकतात, भाजपा-शिवसेनेत 'पूल' बांधू शकतात, अशी आशा निर्माण झाली आहे. सरसंघचालक मोहन भागवत आणि नितीन गडकरी आज कार्यक्रमात एकत्र भेटणार असल्यानं राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. गडकरी राज्याच्या राजकारणात परतणार का, शिवसेनेला सोबत घेऊन सरकारचं नेतृत्व करणार का, यावरून तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु, या शक्यता फेटाळून लावत, गडकरींनी तिढा लवकरच सुटेल असा विश्वास व्यक्त केला. त्यासोबतच, युती किंवा आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला कसा असतो, तेही शिवसेनेला समजावलं.

भाजपा आपल्या मदतीशिवाय बहुमताचा आकडा गाठू शकत नसल्याचं लक्षात आल्यानं शिवसेना 'फिफ्टी-फिफ्टी' फॉर्म्युल्यावर अडून बसली आहे. पदं आणि जबाबदाऱ्यांचं समान वाटप करण्याबाबत आमचं ठरलंय, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारीमध्ये युतीच्या घोषणेवेळी सांगितलं होतं. त्या विधानाच्या आधारेच, अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर शिवसेना ठाम आहे. परंतु, मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचं काहीही ठरलं नव्हतं, असा दावा फडणवीस यांनी केला आहे आणि तेव्हापासून चर्चेला खीळ बसली आहे.

 

या पार्श्वभूमीवर, नितीन गडकरींनी भाजपाचं म्हणणं कसं योग्य आहे, हे पटवून दिलं. भाजपाचे १०५ आमदार निवडून आलेत आणि शिवसेनेचे ५६ आमदार आहेत. युती किंवा आघाडीत ज्यांचे जास्त आमदार, त्यांचाच मुख्यमंत्री होत असतो, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. थोडक्यात, भाजपा मुख्यमंत्रिपदावर तडजोड करण्याच्या मनःस्थितीत नसल्याचंच त्यांनी सूचित केलं आहे. शिवसेनेशी चर्चा सुरू आहे आणि राज्याच्या हिताचा मार्ग लवकरच निघेल, असंही त्यांनी नमूद केलं.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा यायची इच्छा नाही. भाजपाच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली सरकार बनलं पाहिजे, असंही नितीन गडकरींनी ठामपणे सांगितलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ युतीच्या वाटाघाटींमध्ये मध्यस्थी करत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या राजकीय बातम्याः

'मातोश्री'वर शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक सुरु; मोबाईल फोनवर बंदी 

महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल; 'आकड्यांच्या खेळा'त भाजपाकडून 'शब्दांचा खेळ'

'दिल्लीहून स्पष्ट सूचना आल्यात; 'तसं' पाऊल कदापि उचलणार नाही'

...तशी हिंमत कोणीही करणार नाही; राऊत यांचा भाजपावर निशाणासत्तास्थापनेसाठी उरले फक्त ३ दिवस; 'ही' आहेत सत्तेच्या गणिताची ९ समीकरणं 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघUddhav Thackerayउद्धव ठाकरे