शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

नितीन गडकरी 'इन अ‍ॅक्शन'; तिढा सुटेल म्हणत शिवसेनेला 'समजावला' मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 13:25 IST

नितीन गडकरींचे संघाशी आणि 'मातोश्री'शी जवळचे संबंध असल्यानं भावांच्या भांडणातून ते 'मार्ग' काढू शकतात, भाजपा-शिवसेनेत 'पूल' बांधू शकतात, अशी आशा निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेची कोंडी काही केल्या फुटायला तयार नसताना, हा गुंता सोडवण्यासाठी वेगवेगळी नेतेमंडळी सक्रिय झाली आहेत. त्यात, देशात महामार्ग बांधणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पुढाकार विशेष लक्षवेधी मानला जातोय. त्याचं कारण, नितीन गडकरींचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आणि 'मातोश्री'शी असलेले जवळचे संबंध. त्यामुळे ते भावांमधील भांडणातून 'मार्ग' काढू शकतात, भाजपा-शिवसेनेत 'पूल' बांधू शकतात, अशी आशा निर्माण झाली आहे. सरसंघचालक मोहन भागवत आणि नितीन गडकरी आज कार्यक्रमात एकत्र भेटणार असल्यानं राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. गडकरी राज्याच्या राजकारणात परतणार का, शिवसेनेला सोबत घेऊन सरकारचं नेतृत्व करणार का, यावरून तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु, या शक्यता फेटाळून लावत, गडकरींनी तिढा लवकरच सुटेल असा विश्वास व्यक्त केला. त्यासोबतच, युती किंवा आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला कसा असतो, तेही शिवसेनेला समजावलं.

भाजपा आपल्या मदतीशिवाय बहुमताचा आकडा गाठू शकत नसल्याचं लक्षात आल्यानं शिवसेना 'फिफ्टी-फिफ्टी' फॉर्म्युल्यावर अडून बसली आहे. पदं आणि जबाबदाऱ्यांचं समान वाटप करण्याबाबत आमचं ठरलंय, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारीमध्ये युतीच्या घोषणेवेळी सांगितलं होतं. त्या विधानाच्या आधारेच, अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर शिवसेना ठाम आहे. परंतु, मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचं काहीही ठरलं नव्हतं, असा दावा फडणवीस यांनी केला आहे आणि तेव्हापासून चर्चेला खीळ बसली आहे.

 

या पार्श्वभूमीवर, नितीन गडकरींनी भाजपाचं म्हणणं कसं योग्य आहे, हे पटवून दिलं. भाजपाचे १०५ आमदार निवडून आलेत आणि शिवसेनेचे ५६ आमदार आहेत. युती किंवा आघाडीत ज्यांचे जास्त आमदार, त्यांचाच मुख्यमंत्री होत असतो, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. थोडक्यात, भाजपा मुख्यमंत्रिपदावर तडजोड करण्याच्या मनःस्थितीत नसल्याचंच त्यांनी सूचित केलं आहे. शिवसेनेशी चर्चा सुरू आहे आणि राज्याच्या हिताचा मार्ग लवकरच निघेल, असंही त्यांनी नमूद केलं.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा यायची इच्छा नाही. भाजपाच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली सरकार बनलं पाहिजे, असंही नितीन गडकरींनी ठामपणे सांगितलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ युतीच्या वाटाघाटींमध्ये मध्यस्थी करत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या राजकीय बातम्याः

'मातोश्री'वर शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक सुरु; मोबाईल फोनवर बंदी 

महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल; 'आकड्यांच्या खेळा'त भाजपाकडून 'शब्दांचा खेळ'

'दिल्लीहून स्पष्ट सूचना आल्यात; 'तसं' पाऊल कदापि उचलणार नाही'

...तशी हिंमत कोणीही करणार नाही; राऊत यांचा भाजपावर निशाणासत्तास्थापनेसाठी उरले फक्त ३ दिवस; 'ही' आहेत सत्तेच्या गणिताची ९ समीकरणं 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघUddhav Thackerayउद्धव ठाकरे