शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरांच्या 'या' अवाजवी मागणीमुळे तुटली 'वंचित'-एमआयएमची युती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 15:48 IST

ओवेसी म्हणाले की, युती तोडण्याची आमची कोणतेही इच्छा नव्हती, आम्ही आजही युती करण्यास तयार आहोत.

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही. त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत, असं एमआयएमने जाहीर केलं होत. तर एमआयएमने अचानक चर्चा थांबवली आणि त्यांनतर युती तुटल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. मात्र आता युती तुटण्याचे खरे कारण समोर आले आहे. एमआयएमकडे असलेल्या औरंगाबाद मध्य मतदारसंघावर वंचितने दावा केल्याने युती तुटल्याचा गौप्यस्फोट खुद्द एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. वंचित आघडीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत असल्याचा त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी सद्या औरंगाबाद जिल्ह्यात पक्षाच्या प्रचारसाठी आले आहेत. तर याचवेळी वंचित बहुजन आघाडीचे काही नेत्यांनी ओवेसी यांची भेट घेत, युती तुटल्याचा मुद्द्यावरून चर्चा केली. यावेळी बोलताना ओवेसी म्हणाले की, युती तोडण्याची आमची कोणतेही इच्छा नव्हती, आम्ही आजही युती करण्यास तयार आहोत. त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांना आपण विनंती करा असेही ओवेसी यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना ओवेसी म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे एमआयएमची विद्यमान जागा वंचितला सोडण्याची मागणी करत आहे. परंतु मी माझी विद्यमान जागा कशी सोडणार, असा प्रश्न सुद्धा ओवेसी यांनी यावेळी उपस्थित केला. तर आंबेडकर यांच्यासाठी आम्ही औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ सोडायला तयार झालो होतो. मात्र ते 'मध्य'वर अडवून बसल्याने हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे ओवेसी म्हणाले.

प्रत्यक्षात मध्य मतदारसंघातून २०१४ ला इम्तियाज जलील हे निवडून आले होते. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या युतीत या मतदारसंघावर एमआयएमचा नैसर्गिक अधिकार होता. त्यामुळे आंबेडकर यांची मागणी अवाजवी असल्याचे आता बोलले जात आहे. तर एमआयएमचा ताब्यात असलेल्या एका मतदारसंघासाठी आंबेडकर यांनी युती तोडली असावी का ? असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.