शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आंबेडकरांच्या 'या' अवाजवी मागणीमुळे तुटली 'वंचित'-एमआयएमची युती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 15:48 IST

ओवेसी म्हणाले की, युती तोडण्याची आमची कोणतेही इच्छा नव्हती, आम्ही आजही युती करण्यास तयार आहोत.

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही. त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत, असं एमआयएमने जाहीर केलं होत. तर एमआयएमने अचानक चर्चा थांबवली आणि त्यांनतर युती तुटल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. मात्र आता युती तुटण्याचे खरे कारण समोर आले आहे. एमआयएमकडे असलेल्या औरंगाबाद मध्य मतदारसंघावर वंचितने दावा केल्याने युती तुटल्याचा गौप्यस्फोट खुद्द एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. वंचित आघडीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत असल्याचा त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी सद्या औरंगाबाद जिल्ह्यात पक्षाच्या प्रचारसाठी आले आहेत. तर याचवेळी वंचित बहुजन आघाडीचे काही नेत्यांनी ओवेसी यांची भेट घेत, युती तुटल्याचा मुद्द्यावरून चर्चा केली. यावेळी बोलताना ओवेसी म्हणाले की, युती तोडण्याची आमची कोणतेही इच्छा नव्हती, आम्ही आजही युती करण्यास तयार आहोत. त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांना आपण विनंती करा असेही ओवेसी यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना ओवेसी म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे एमआयएमची विद्यमान जागा वंचितला सोडण्याची मागणी करत आहे. परंतु मी माझी विद्यमान जागा कशी सोडणार, असा प्रश्न सुद्धा ओवेसी यांनी यावेळी उपस्थित केला. तर आंबेडकर यांच्यासाठी आम्ही औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ सोडायला तयार झालो होतो. मात्र ते 'मध्य'वर अडवून बसल्याने हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे ओवेसी म्हणाले.

प्रत्यक्षात मध्य मतदारसंघातून २०१४ ला इम्तियाज जलील हे निवडून आले होते. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या युतीत या मतदारसंघावर एमआयएमचा नैसर्गिक अधिकार होता. त्यामुळे आंबेडकर यांची मागणी अवाजवी असल्याचे आता बोलले जात आहे. तर एमआयएमचा ताब्यात असलेल्या एका मतदारसंघासाठी आंबेडकर यांनी युती तोडली असावी का ? असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.