शहरं
Join us  
Trending Stories
1
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
2
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
3
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
4
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
5
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
7
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
8
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
9
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
10
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
12
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
13
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
14
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
15
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
16
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
17
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
18
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
19
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
20
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!

आंबेडकरांच्या 'या' अवाजवी मागणीमुळे तुटली 'वंचित'-एमआयएमची युती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 15:48 IST

ओवेसी म्हणाले की, युती तोडण्याची आमची कोणतेही इच्छा नव्हती, आम्ही आजही युती करण्यास तयार आहोत.

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही. त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत, असं एमआयएमने जाहीर केलं होत. तर एमआयएमने अचानक चर्चा थांबवली आणि त्यांनतर युती तुटल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. मात्र आता युती तुटण्याचे खरे कारण समोर आले आहे. एमआयएमकडे असलेल्या औरंगाबाद मध्य मतदारसंघावर वंचितने दावा केल्याने युती तुटल्याचा गौप्यस्फोट खुद्द एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. वंचित आघडीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत असल्याचा त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी सद्या औरंगाबाद जिल्ह्यात पक्षाच्या प्रचारसाठी आले आहेत. तर याचवेळी वंचित बहुजन आघाडीचे काही नेत्यांनी ओवेसी यांची भेट घेत, युती तुटल्याचा मुद्द्यावरून चर्चा केली. यावेळी बोलताना ओवेसी म्हणाले की, युती तोडण्याची आमची कोणतेही इच्छा नव्हती, आम्ही आजही युती करण्यास तयार आहोत. त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांना आपण विनंती करा असेही ओवेसी यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना ओवेसी म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे एमआयएमची विद्यमान जागा वंचितला सोडण्याची मागणी करत आहे. परंतु मी माझी विद्यमान जागा कशी सोडणार, असा प्रश्न सुद्धा ओवेसी यांनी यावेळी उपस्थित केला. तर आंबेडकर यांच्यासाठी आम्ही औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ सोडायला तयार झालो होतो. मात्र ते 'मध्य'वर अडवून बसल्याने हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे ओवेसी म्हणाले.

प्रत्यक्षात मध्य मतदारसंघातून २०१४ ला इम्तियाज जलील हे निवडून आले होते. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या युतीत या मतदारसंघावर एमआयएमचा नैसर्गिक अधिकार होता. त्यामुळे आंबेडकर यांची मागणी अवाजवी असल्याचे आता बोलले जात आहे. तर एमआयएमचा ताब्यात असलेल्या एका मतदारसंघासाठी आंबेडकर यांनी युती तोडली असावी का ? असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.