शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

महाराष्ट्र निवडणूक 2019:'...म्हणून महाराष्ट्राला भाजपापासून वाचवलं पाहिजे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 11:14 IST

maharashtra election 2019 आमदारांना आमिषं दाखवली जात असल्याचा आरोप

मुंबई: निवडणूक निकाल जाहीर होऊन दोन आठवडे होत आले तरी अद्याप महायुतीमधील सत्तापदांच्या वाटपाचा संघर्ष संपलेला नाही. त्यातच आता शिवसेनेनं राज्यात फोडाफोडीचं राजकारण होत असल्याचा आरोप करत भाजपावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. सत्तेचा वापर करून ‘फोड झोड’ करणार असाल तर खबरदार, असा इशाराच शिवसेनेनं भाजपाला दिला आहे. यावरुन आता काँग्रेसनं भाजपा आणि शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. महायुतीला सत्ता स्थापनेचा नैतिक अधिकार आता राहिला आहे का?, असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.  'शिवसेना हा भाजपाचा सहयोगी पक्ष व महायुतीचा सदस्य असतानाही जर त्यांना भाजपा आपले आमदार फोडेल ही भीती वाटत असेल तर भाजपा किती नैतिकदृष्ट्या भ्रष्ट आहे आणि महाराष्ट्राला भाजपा पासून का वाचवले पाहिजे हे लक्षात येईल,' असं ट्विट सावंत यांनी केलं आहे. शिवसेनेनं फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यता वर्तवल्यावर सावंत यांनी हे ट्विट केलं. फोडाफोड टाळण्यासाठी शिवसेनेकडून सर्व आमदारांना नरिमन पॉईंट येथील हॉटेल ट्रायडंटवर ठेवलं जाण्याची शक्यता आहे.  निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दोन आठवडे होत आले तरीही शिवसेना, भाजपामध्ये सुरू असलेला सत्ता वाटपाचा संघर्ष अद्याप कायम आहे. आज दिवसभरात होऊ घातलेल्या घडामोडी पाहता सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून शिवसेना, भाजपामध्ये सत्तापदांच्या वाटपावरून सुंदोपसुंदी सुरू आहे. या संघर्षाला आज पूर्णविराम मिळण्याची चिन्हं आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. तर दुपारी 2 वाजता भाजपा नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेणार आहेत. या भेटीत सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेस