शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

महाराष्ट्र निवडणूक 2019:'...म्हणून महाराष्ट्राला भाजपापासून वाचवलं पाहिजे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 11:14 IST

maharashtra election 2019 आमदारांना आमिषं दाखवली जात असल्याचा आरोप

मुंबई: निवडणूक निकाल जाहीर होऊन दोन आठवडे होत आले तरी अद्याप महायुतीमधील सत्तापदांच्या वाटपाचा संघर्ष संपलेला नाही. त्यातच आता शिवसेनेनं राज्यात फोडाफोडीचं राजकारण होत असल्याचा आरोप करत भाजपावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. सत्तेचा वापर करून ‘फोड झोड’ करणार असाल तर खबरदार, असा इशाराच शिवसेनेनं भाजपाला दिला आहे. यावरुन आता काँग्रेसनं भाजपा आणि शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. महायुतीला सत्ता स्थापनेचा नैतिक अधिकार आता राहिला आहे का?, असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.  'शिवसेना हा भाजपाचा सहयोगी पक्ष व महायुतीचा सदस्य असतानाही जर त्यांना भाजपा आपले आमदार फोडेल ही भीती वाटत असेल तर भाजपा किती नैतिकदृष्ट्या भ्रष्ट आहे आणि महाराष्ट्राला भाजपा पासून का वाचवले पाहिजे हे लक्षात येईल,' असं ट्विट सावंत यांनी केलं आहे. शिवसेनेनं फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यता वर्तवल्यावर सावंत यांनी हे ट्विट केलं. फोडाफोड टाळण्यासाठी शिवसेनेकडून सर्व आमदारांना नरिमन पॉईंट येथील हॉटेल ट्रायडंटवर ठेवलं जाण्याची शक्यता आहे.  निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दोन आठवडे होत आले तरीही शिवसेना, भाजपामध्ये सुरू असलेला सत्ता वाटपाचा संघर्ष अद्याप कायम आहे. आज दिवसभरात होऊ घातलेल्या घडामोडी पाहता सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून शिवसेना, भाजपामध्ये सत्तापदांच्या वाटपावरून सुंदोपसुंदी सुरू आहे. या संघर्षाला आज पूर्णविराम मिळण्याची चिन्हं आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. तर दुपारी 2 वाजता भाजपा नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेणार आहेत. या भेटीत सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेस