शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

महाराष्ट्र निवडणूक 2019: राज्यातील आमदारांची अवस्था बिकट, पगार, भत्तेही नाहीत अन् आमदार निधीही नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 05:33 IST

विधानसभा निवडणुकीत जिंकलेले आमदार राष्ट्रपती राजवटीमुळे केवळ नावापुरते आमदार असून त्यांना आमदार म्हणून कोणताही अधिकार नाही.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत जिंकलेले आमदार राष्ट्रपती राजवटीमुळे केवळ नावापुरते आमदार असून त्यांना आमदार म्हणून कोणताही अधिकार नाही. त्यांचा आमदार म्हणून शपथविधीदेखील झालेला नाही. सध्याच्या राजकीय अस्थिरतेत आमदारांच्या भवितव्याचा फैसला काय होईल, कोण जाणे पण त्यांचे वर्तमान डळमळीत आहे.राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे. त्यामुळे विधानसभा संस्थगित झालेली आहे. आमदारांचा शपथविधी झाला असता आणि नंतर राष्ट्रपती राजवट लागू झाली असती तर आमदारांना निदान पगार तरी सुरू झाले असते, पण शपथविधीच्या आधीच राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने यापैकी कोणताही लाभ आमदारांना मिळणार नाही. कोणतेही भत्ते तसेच सुविधादेखील मिळणार नाहीत. जिल्हा नियोजन मंडळाचे (डीपीसी) सदस्यही नाहीत. त्यामुळे या बैठकांना ते उपस्थित राहू शकत नाही.आमदार अधिकाऱ्यांच्या बैठका बोलावू शकत नाहीत, कोणतेही आदेश आमदार म्हणून देऊ शकत नाही. सहा महिने राष्ट्रपती राजवट कायम राहिली आणि त्यानंतर मध्यावधी निवडणुका घेतल्या गेल्या तर या आमदारांना पेन्शनदेखील मिळणार नाही. विधिमंडळाच्या लेखी मुळात ते आमदारच उरणार नाहीत.जनतेने आपल्याला मोठ्या विश्वासाने निवडून दिले पण आज आपण जनतेसाठी काहीही करू शकत नाही, या भावनेमुळे त्यांच्यात अस्वस्थता आहे. दरवर्षी मिळणाºया दोन कोटी रुपयांच्या आमदार निधीवर तूर्त तरी पाणी सोडावे लागेल. त्यातील एक छदामदेखील राष्ट्रपती राजवटीच्या काळात मिळणार नाही. इतकेच काय तर आमदार निवासाची खोलीदेखील मिळणार नसल्याने अनेकांची पंचाईत झाली आहे.>एका जिल्ह्यातील उत्साही आमदाराने लगेच अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आदेश देणे सुरू केले. पहिल्या एक-दोन बैठकांना अधिकारी गेले पण नंतर नकार दिला. अधिकाºयांनी जिल्हाधिकारी यांकडे तक्रार केली. जिल्हाधिकाºयांनी आमदारांना फोन करून बजावल्याने आमदारांची मनमानी बंद झाली.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस