शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

खडसे, तावडेंची 'तिकीटं कापली' नाहीत; त्यांची भूमिका बदलली!; मुख्यमंत्र्यांचे 'पुनर्वसना'चे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 19:18 IST

Maharashtra Election 2019: एकनाथ खडसे, विनोद तावडे यांची तिकिटं कापली असं म्हणणं चुकीचं ठरेल.

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. या निष्ठावंतांची तिकिटं का कापली असतील, त्यांचं काय चुकलंय, आता पुढे काय, यावरून चर्चा झडत आहेत. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नेत्यांच्या राजकीय पुनर्वसनाचे संकेत दिले आहेत. 

एकनाथ खडसे, विनोद तावडे यांची तिकिटं कापली असं म्हणणं चुकीचं ठरेल. कारण, पक्षामध्ये जबाबदाऱ्या बदलत असतात. त्यामुळे आता या नेत्यांची भूमिका बदलली आहे, त्यांना नवी जबाबदारी दिली जाणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. भाजपा-शिवसेना-रिपाइं-रासप-शिवसंग्राम आणि रयत क्रांती या पक्षांच्या महायुतीची औपचारिक घोषणा आज करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य प्रमुख नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. या विधानसभा निवडणुकीत शिवसेना १२४, मित्रपक्ष १४ आणि भाजपा १५० जागा लढवत असल्याचा फॉर्म्युला मुख्यमंत्र्यांनी सांगितला.

लोकसभेवेळी आम्ही युती केली होती. एखाद्या मुद्द्यावर मतभेद असतील, जागावाटपावरून तिढा असेल, पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही एक आहोत. युती होईल की नाही याबाबत अनेकांच्या मनात शंका होती. मात्र युती होणार यावर आम्ही ठाम होतो. व्यापर वैचारिक भूमिका आम्ही दोन्ही पक्षांनी स्वीकारली आणि दोन्ही पक्षांनी तडजोड केली, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. निष्ठावंतांना डावलून 'आयारामां'ना संधी दिल्याची टीकाही त्यांनी खोडून काढली. यावेळी बाहेरच्या पक्षातून अनेकांना भाजपा आणि शिवसेनेत यायचं होतं. ज्यांना आम्ही सोबत घेऊ शकत होतो त्यांना घेतलं. आमच्या उमेदवारी याद्या पाहिल्यात, तर त्यात निष्ठावंतच अधिक आहेत, असं त्यांनी नमूद केलं. 

बंडखोरी करणाऱ्यांना इशारा

राज्याच्या अनेक भागात भाजपा-शिवसेनेच्या नेत्यांनी बंडखोरी केली आहे. त्यांना मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला. पुढच्या दोन दिवसांत जेवढे बंडखोर आहेत, त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. राज्यात कुठेही बंडखोरी राहणार नाही असा विश्वास आहे. जर कोणी बंडखोरी केली तर यापुढे त्याला युतीच्या कोणत्याच पक्षात जागा राहणार नाही, महायुतीच्या माध्यमातून त्याला त्याची जागा दाखविण्यासाठी ताकद पणाला लावू, असं त्यांनी खडसावलं.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMumbaiमुंबईBJPभाजपाVinod Tawdeविनोद तावडेEknath Khadaseएकनाथ खडसेAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019