शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
4
Dog Attack Mumbai: बिबट्यासारखी उडी आणि खांदा पकडला जबड्यात; मुंबईत भटक्या कुत्र्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला, Video पहा
5
जपान पुन्हा हादरला: ६.७ तीव्रतेचा जोरदार भूकंप, पॅसिफिक किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा जारी
6
रिस्क घेतली अन् गुंतवणूक वाढली! इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत २१ टक्क्यांनी वाढ; सलग तीन महिन्यांच्या घसरणीला ब्रेक
7
Accident: देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला, बस खोल दरीत कोसळली, ९ जण ठार झाल्याची भिती
8
भविष्यातील भारतात अदानी ग्रुपचं काय योगदान असेल?; प्रणव अदानींनी सांगितला संपूर्ण 'प्लॅन'
9
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
10
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
11
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
12
मराठवाड्यातील ७० हजार कुटुंबांना आता हक्काचे घर; ‘मदत माश’ जमिनीवरील घरे नियमित होणार
13
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
14
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
15
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
16
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
17
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
18
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
19
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
20
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

खडसे, तावडेंची 'तिकीटं कापली' नाहीत; त्यांची भूमिका बदलली!; मुख्यमंत्र्यांचे 'पुनर्वसना'चे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 19:18 IST

Maharashtra Election 2019: एकनाथ खडसे, विनोद तावडे यांची तिकिटं कापली असं म्हणणं चुकीचं ठरेल.

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. या निष्ठावंतांची तिकिटं का कापली असतील, त्यांचं काय चुकलंय, आता पुढे काय, यावरून चर्चा झडत आहेत. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नेत्यांच्या राजकीय पुनर्वसनाचे संकेत दिले आहेत. 

एकनाथ खडसे, विनोद तावडे यांची तिकिटं कापली असं म्हणणं चुकीचं ठरेल. कारण, पक्षामध्ये जबाबदाऱ्या बदलत असतात. त्यामुळे आता या नेत्यांची भूमिका बदलली आहे, त्यांना नवी जबाबदारी दिली जाणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. भाजपा-शिवसेना-रिपाइं-रासप-शिवसंग्राम आणि रयत क्रांती या पक्षांच्या महायुतीची औपचारिक घोषणा आज करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य प्रमुख नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. या विधानसभा निवडणुकीत शिवसेना १२४, मित्रपक्ष १४ आणि भाजपा १५० जागा लढवत असल्याचा फॉर्म्युला मुख्यमंत्र्यांनी सांगितला.

लोकसभेवेळी आम्ही युती केली होती. एखाद्या मुद्द्यावर मतभेद असतील, जागावाटपावरून तिढा असेल, पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही एक आहोत. युती होईल की नाही याबाबत अनेकांच्या मनात शंका होती. मात्र युती होणार यावर आम्ही ठाम होतो. व्यापर वैचारिक भूमिका आम्ही दोन्ही पक्षांनी स्वीकारली आणि दोन्ही पक्षांनी तडजोड केली, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. निष्ठावंतांना डावलून 'आयारामां'ना संधी दिल्याची टीकाही त्यांनी खोडून काढली. यावेळी बाहेरच्या पक्षातून अनेकांना भाजपा आणि शिवसेनेत यायचं होतं. ज्यांना आम्ही सोबत घेऊ शकत होतो त्यांना घेतलं. आमच्या उमेदवारी याद्या पाहिल्यात, तर त्यात निष्ठावंतच अधिक आहेत, असं त्यांनी नमूद केलं. 

बंडखोरी करणाऱ्यांना इशारा

राज्याच्या अनेक भागात भाजपा-शिवसेनेच्या नेत्यांनी बंडखोरी केली आहे. त्यांना मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला. पुढच्या दोन दिवसांत जेवढे बंडखोर आहेत, त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. राज्यात कुठेही बंडखोरी राहणार नाही असा विश्वास आहे. जर कोणी बंडखोरी केली तर यापुढे त्याला युतीच्या कोणत्याच पक्षात जागा राहणार नाही, महायुतीच्या माध्यमातून त्याला त्याची जागा दाखविण्यासाठी ताकद पणाला लावू, असं त्यांनी खडसावलं.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMumbaiमुंबईBJPभाजपाVinod Tawdeविनोद तावडेEknath Khadaseएकनाथ खडसेAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019