शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाला 'त्या' १५ आमदारांचंही बळ?... धक्का देणारेच संपर्कात; मुख्यमंत्र्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 17:16 IST

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या आज लागलेल्या निकालांमध्ये भाजपा आणि शिवसेना महाआघाडीने राज्यातील सत्ता पुन्हा एकदा राखण्यात यश मिळवले आहे. मात्र २०१४ च्या तुलनेत भाजपा आणि शिवसेनेच्या जागांमध्ये घट झाली आहे.

मुंबई - महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या आज लागलेल्या निकालांमध्ये भाजपा आणि शिवसेना महाआघाडीने राज्यातील सत्ता पुन्हा एकदा राखण्यात यश मिळवले आहे. मात्र २०१४ च्या तुलनेत भाजपा आणि शिवसेनेच्या जागांमध्ये घट झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचा कौल स्पष्ट झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महायुतीच्या झालेल्या पिछेहाटीचे कारण सांगितले आहे. राज्यात भाजपा आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या अधिकृत उमेदवारांविरोधात मोठ्या प्रमाणावर झालेल्या बंडखोरीमुळे महायुतीला काही जागा गमवाव्या लागल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  विधानसभेच्या निकालात महायुतीच्या झालेल्या पिछेहाटीचे विश्लेषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी सांगितले की, ''राज्यात महायुतीच्या उमेदवारांविरोधात दोन्ही पक्षातून मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. मात्र या बंडखोरांपैकी काही जण निवडून आले आहेत. पैकी १५ जणांनी माझ्याशी संपर्क साधला आहे. तसेच अजून काही बंडखोर महायुतीसोबत येतील अशी अपेक्षा आहे.'' त्यामुळे महायुती भक्कम संख्याबळासह राज्यात सत्ता स्थापन करेल  असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, राज्यातील सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंचा झालेला पराभव हा पक्षासाठी धक्कादायक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच आमचे इतर काही मंत्रीसुद्धा पराभूत झाले आहेत, या पराभवाचे आम्ही विश्लेषण करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा