शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक २०१९: महाराष्ट्रात भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करणार नाही कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 11:37 IST

महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढणाऱ्या शिवसेना-भाजपाला राज्यात १६२ च्या वर जागा मिळाल्या आहेत

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा पेच वाढत चालला असून पुढील ४८ तासांत अनेक घडामोडी राज्यात घडतील असं चित्र दिसत आहे. निकाल लागून आठवडा झाला तरी अद्याप कोणत्याही पक्षाने सत्तास्थापनेचा दावा केला नाही. भाजपाने राज्यात १०५ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र भाजपाने सत्ता स्थापनेसाठी हालचाल केली नाही. 

महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढणाऱ्या शिवसेना-भाजपाला राज्यात १६२ च्या वर जागा मिळाल्या आहेत. मात्र मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षात सत्ता स्थापनेची बोलणीही सुरु झाली नाही. राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा दिवसेंदिवस वाढत असून अपक्षांना सोबत घेण्याची स्पर्धा शिवसेना-भाजपात लागली आहे. मात्र भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली असल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे. 

अमित शहा यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना लवकरच राज्यात नवीन सरकार येईल असं विधान केलं मात्र यामध्ये महायुतीचा उल्लेख टाळला. भाजपा आणखी काळ वाट बघण्याची मानसिकतेत आहे. मात्र विधानसभा बरखास्त होण्यापूर्वी नवीन सरकार स्थापन झालं पाहिजे अन्यथा राज्यात राष्ट्रपती राजवट येईल असं भाजपा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वक्तव्य केलं आहे. 

विधीमंडळ बरखास्त झाल्यानंतर राष्ट्रपती राजवटीची प्रक्रिया सुरु होईल. पुढील ६ महिने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर विरोधी पक्षाचे आमदार फुटण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे भाजपा अल्पमतात सरकार स्थापन करणार नाही असं सांगितले जात आहे. भाजपामध्येही सत्तास्थापनेवरुन मतप्रवाह आहेत. २०१४ प्रमाणे राज्यात भाजपाने सत्ता स्थापन करावी त्यानंतर शिवसेनेने सत्तेत सहभागी होऊ शकेल असं काही नेत्यांना वाटतं मात्र २०१४ ची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी भाजपाकडे पुरेसं संख्याबळ होतं. मात्र यंदाच्या निवडणुकीत आकड्यांची तफावत मोठी असल्याने फोडाफोडीचं राजकारण करणं शक्य नाही. त्यामुळे भाजपा सध्या वेट अॅन्ड वॉच या भूमिकेत असल्याने येणाऱ्या काळात शिवसेना-भाजपा काय निर्णय घेतं याकडे सर्वांचे लक्ष आहे.   

महत्वाच्या बातम्या

आमदार फुटण्याच्या भीतीने घडणार 'हे' समीकरण; पुढील ४८ तास महत्वाचे'

'होय, आमचं पवारांशी बोलणं झालं; मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचाच होणार'

मुख्यमंत्री शिवसेनेचा, उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचा?; फॉर्म्युला 95चाच, पण... नव्या चर्चेला जोर

'छ. शिवाजी महाराजांबद्दल प्रेम असेल तर शिवेंद्रराजे भोसले यांना मुख्यमंत्री करा'

'ही तर बौद्धिक दिवाळखोरी; दरबारी राज्य चालवित असेल तर राजाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह' 

...म्हणून मुख्यमंत्र्यांचे कौतुक करावं तेवढे थोडेच; शिवसेनेने घेतली मवाळ भूमिका? 

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना