शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

महाराष्ट्र निवडणूक २०१९: महाराष्ट्रात भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करणार नाही कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 11:37 IST

महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढणाऱ्या शिवसेना-भाजपाला राज्यात १६२ च्या वर जागा मिळाल्या आहेत

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा पेच वाढत चालला असून पुढील ४८ तासांत अनेक घडामोडी राज्यात घडतील असं चित्र दिसत आहे. निकाल लागून आठवडा झाला तरी अद्याप कोणत्याही पक्षाने सत्तास्थापनेचा दावा केला नाही. भाजपाने राज्यात १०५ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र भाजपाने सत्ता स्थापनेसाठी हालचाल केली नाही. 

महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढणाऱ्या शिवसेना-भाजपाला राज्यात १६२ च्या वर जागा मिळाल्या आहेत. मात्र मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षात सत्ता स्थापनेची बोलणीही सुरु झाली नाही. राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा दिवसेंदिवस वाढत असून अपक्षांना सोबत घेण्याची स्पर्धा शिवसेना-भाजपात लागली आहे. मात्र भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली असल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे. 

अमित शहा यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना लवकरच राज्यात नवीन सरकार येईल असं विधान केलं मात्र यामध्ये महायुतीचा उल्लेख टाळला. भाजपा आणखी काळ वाट बघण्याची मानसिकतेत आहे. मात्र विधानसभा बरखास्त होण्यापूर्वी नवीन सरकार स्थापन झालं पाहिजे अन्यथा राज्यात राष्ट्रपती राजवट येईल असं भाजपा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वक्तव्य केलं आहे. 

विधीमंडळ बरखास्त झाल्यानंतर राष्ट्रपती राजवटीची प्रक्रिया सुरु होईल. पुढील ६ महिने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर विरोधी पक्षाचे आमदार फुटण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे भाजपा अल्पमतात सरकार स्थापन करणार नाही असं सांगितले जात आहे. भाजपामध्येही सत्तास्थापनेवरुन मतप्रवाह आहेत. २०१४ प्रमाणे राज्यात भाजपाने सत्ता स्थापन करावी त्यानंतर शिवसेनेने सत्तेत सहभागी होऊ शकेल असं काही नेत्यांना वाटतं मात्र २०१४ ची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी भाजपाकडे पुरेसं संख्याबळ होतं. मात्र यंदाच्या निवडणुकीत आकड्यांची तफावत मोठी असल्याने फोडाफोडीचं राजकारण करणं शक्य नाही. त्यामुळे भाजपा सध्या वेट अॅन्ड वॉच या भूमिकेत असल्याने येणाऱ्या काळात शिवसेना-भाजपा काय निर्णय घेतं याकडे सर्वांचे लक्ष आहे.   

महत्वाच्या बातम्या

आमदार फुटण्याच्या भीतीने घडणार 'हे' समीकरण; पुढील ४८ तास महत्वाचे'

'होय, आमचं पवारांशी बोलणं झालं; मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचाच होणार'

मुख्यमंत्री शिवसेनेचा, उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचा?; फॉर्म्युला 95चाच, पण... नव्या चर्चेला जोर

'छ. शिवाजी महाराजांबद्दल प्रेम असेल तर शिवेंद्रराजे भोसले यांना मुख्यमंत्री करा'

'ही तर बौद्धिक दिवाळखोरी; दरबारी राज्य चालवित असेल तर राजाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह' 

...म्हणून मुख्यमंत्र्यांचे कौतुक करावं तेवढे थोडेच; शिवसेनेने घेतली मवाळ भूमिका? 

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना