शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपमध्ये अजूनही शिवसेनाविरोधीच सूर; पेच कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 06:19 IST

राज्यातील सत्ताकोंडी कशी फुटणार?

मुंबई : विधानसभा निवडणूक निकालाच्या २५ दिवसानंतरही राज्यात सत्तापेच कायम आहे. मुख्यमंत्रिपदाच्या प्रश्नावरून भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीशी संधान साधले आहे. मात्र, वाटाघाटींवरच अजून घोडे अडले आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याची जबाबदारी भाजप-शिवसेनेची आहे, असे सांगून शरद पवार यांनी गुगली टाकली आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार बनू शकत नाही, असे पवार यांनी सूचित केल्याचे म्हटले जात आहे. मात्र भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येतील का, याबाबतही साशंकता व्यक्त होत असल्याने राज्यातील सत्ताकोंडी कशी फुटणार, हा प्रश्न अजुनही अनुत्तरीच आहे.शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस हे सरकार मिळून सरकार स्थापन करण्याची शक्यता आता धूसर होत चालली आहे. अशावेळी शिवसेना भाजपसोबत जाईल का या बाबतही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवसेनेने गेल्या काही दिवसांत ज्या पद्धतीने भाजपच्या नेत्यांवर टीका केली आहे ती बघता शिवसेनेला आता सोबत घेऊच नका, असा मोठा सूर भाजपमध्ये आहे.युतीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसलेली शिवसेना आता तो दावा सोडून भाजपसोबत जाईल, अशी शक्यता कमी आहे. त्यातच शिवसेना एनडीएतून बाहेर पडली आहे आणि संसदेच्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी त्यांनी केंद्राविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे.आठवले यांनी सुचविला ‘तीन-दोन’चा फॉर्म्युला!भाजपला तीन वर्ष तर शिवसेनेला दोन वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद द्यावे, अशी आपली सूचना असून त्या बाबत शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांच्याशी चर्चा झाली आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री व रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.तीन-दोनबाबत मी राऊत यांना विचारल्यावर भाजपचा काय प्रस्ताव आहे ते बघू. आमची चर्चेची तयारी असेल, असे त्यांनी सांगितल्याचा दावाही आठवले यांनी केला.उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्दराज्यात सरकार स्थापनेचा घोळ कायम असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचा अयोध्या दौरा पुढे ढकलला आहे. ते २४ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार होते.रामजन्मभूमी प्रकरणी निकालानंतर प्रतिक्रिया देताना उद्धव यांनी ते २४ नोव्हेंबरला रामलल्लाच्या दर्शनासाठी जातील, असे सांगितले होते. तथापि, आता राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ते तूर्त अयोध्येला जाणार नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस