शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपमध्ये अजूनही शिवसेनाविरोधीच सूर; पेच कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 06:19 IST

राज्यातील सत्ताकोंडी कशी फुटणार?

मुंबई : विधानसभा निवडणूक निकालाच्या २५ दिवसानंतरही राज्यात सत्तापेच कायम आहे. मुख्यमंत्रिपदाच्या प्रश्नावरून भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीशी संधान साधले आहे. मात्र, वाटाघाटींवरच अजून घोडे अडले आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याची जबाबदारी भाजप-शिवसेनेची आहे, असे सांगून शरद पवार यांनी गुगली टाकली आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार बनू शकत नाही, असे पवार यांनी सूचित केल्याचे म्हटले जात आहे. मात्र भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येतील का, याबाबतही साशंकता व्यक्त होत असल्याने राज्यातील सत्ताकोंडी कशी फुटणार, हा प्रश्न अजुनही अनुत्तरीच आहे.शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस हे सरकार मिळून सरकार स्थापन करण्याची शक्यता आता धूसर होत चालली आहे. अशावेळी शिवसेना भाजपसोबत जाईल का या बाबतही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवसेनेने गेल्या काही दिवसांत ज्या पद्धतीने भाजपच्या नेत्यांवर टीका केली आहे ती बघता शिवसेनेला आता सोबत घेऊच नका, असा मोठा सूर भाजपमध्ये आहे.युतीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसलेली शिवसेना आता तो दावा सोडून भाजपसोबत जाईल, अशी शक्यता कमी आहे. त्यातच शिवसेना एनडीएतून बाहेर पडली आहे आणि संसदेच्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी त्यांनी केंद्राविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे.आठवले यांनी सुचविला ‘तीन-दोन’चा फॉर्म्युला!भाजपला तीन वर्ष तर शिवसेनेला दोन वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद द्यावे, अशी आपली सूचना असून त्या बाबत शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांच्याशी चर्चा झाली आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री व रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.तीन-दोनबाबत मी राऊत यांना विचारल्यावर भाजपचा काय प्रस्ताव आहे ते बघू. आमची चर्चेची तयारी असेल, असे त्यांनी सांगितल्याचा दावाही आठवले यांनी केला.उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्दराज्यात सरकार स्थापनेचा घोळ कायम असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचा अयोध्या दौरा पुढे ढकलला आहे. ते २४ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार होते.रामजन्मभूमी प्रकरणी निकालानंतर प्रतिक्रिया देताना उद्धव यांनी ते २४ नोव्हेंबरला रामलल्लाच्या दर्शनासाठी जातील, असे सांगितले होते. तथापि, आता राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ते तूर्त अयोध्येला जाणार नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस