शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
2
बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी...
3
NSE Holidays 2025: उद्या शेअर बाजारात कामकाज सुरू राहणार का? स्टॉक मार्केटला कधी-कधी आहेत सुट्ट्या, पाहा यादी
4
Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
5
'आमचा विश्वास कायद्यावर आहे, पण...' : जुबिन गर्ग यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, तरीही गूढ कायम!
6
Laxmi Pujan 2025 Puja Vidhi: लक्ष्मीपूजन कसे करावे? पहा साहित्याची यादी, शुभ मुहूर्त आणि विधी
7
Bank FD मध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा २ लाखांपेक्षा अधिक व्याज; ही बँक देतेय जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
8
न भूतो न भविष्यति! दीपिका पादुकोण-ॲटलीच्या आगामी सिनेमावर रणवीर सिंहची प्रतिक्रिया
9
Cough Syrup : "पप्पा, हॉस्पिटलवाले सोडत नाहीत, पोलिसांना बोलवा...", कफ सिरपमुळे मृत्यू, शेवटची इच्छा अपूर्ण
10
मालक असावा तर असा... या व्यक्तीनं दिवाळीला कर्मचाऱ्यांना वाटल्या ५१ लक्झरी कार्स
11
गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती...
12
दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स ३१७ तर निफ्टीमध्ये ११५ अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
13
VIRAL : भीती नाही, थरार! एका व्यक्तीने १००हून अधिक विषारी सापांचा वाचवला जीव; Video पाहून नेटकरी हैराण
14
विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं
15
कतारने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
16
'दीया और बाती' फेम अभिनेत्रीने ११ वर्षांचा संसार मोडल्यानंतर घेतला संन्यास, पदरात आहे एक मुलगा
17
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
18
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
19
"जेव्हा हिचे हिरोईन म्हणून करिअर चालले नाही, तेव्हा...", राखी सावंतचा तमन्ना भाटियावर हल्लाबोल, म्हणाली - "लाज बाळग..."
20
Delhi AQI: दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...

महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपमध्ये अजूनही शिवसेनाविरोधीच सूर; पेच कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 06:19 IST

राज्यातील सत्ताकोंडी कशी फुटणार?

मुंबई : विधानसभा निवडणूक निकालाच्या २५ दिवसानंतरही राज्यात सत्तापेच कायम आहे. मुख्यमंत्रिपदाच्या प्रश्नावरून भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीशी संधान साधले आहे. मात्र, वाटाघाटींवरच अजून घोडे अडले आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याची जबाबदारी भाजप-शिवसेनेची आहे, असे सांगून शरद पवार यांनी गुगली टाकली आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार बनू शकत नाही, असे पवार यांनी सूचित केल्याचे म्हटले जात आहे. मात्र भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येतील का, याबाबतही साशंकता व्यक्त होत असल्याने राज्यातील सत्ताकोंडी कशी फुटणार, हा प्रश्न अजुनही अनुत्तरीच आहे.शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस हे सरकार मिळून सरकार स्थापन करण्याची शक्यता आता धूसर होत चालली आहे. अशावेळी शिवसेना भाजपसोबत जाईल का या बाबतही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवसेनेने गेल्या काही दिवसांत ज्या पद्धतीने भाजपच्या नेत्यांवर टीका केली आहे ती बघता शिवसेनेला आता सोबत घेऊच नका, असा मोठा सूर भाजपमध्ये आहे.युतीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसलेली शिवसेना आता तो दावा सोडून भाजपसोबत जाईल, अशी शक्यता कमी आहे. त्यातच शिवसेना एनडीएतून बाहेर पडली आहे आणि संसदेच्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी त्यांनी केंद्राविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे.आठवले यांनी सुचविला ‘तीन-दोन’चा फॉर्म्युला!भाजपला तीन वर्ष तर शिवसेनेला दोन वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद द्यावे, अशी आपली सूचना असून त्या बाबत शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांच्याशी चर्चा झाली आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री व रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.तीन-दोनबाबत मी राऊत यांना विचारल्यावर भाजपचा काय प्रस्ताव आहे ते बघू. आमची चर्चेची तयारी असेल, असे त्यांनी सांगितल्याचा दावाही आठवले यांनी केला.उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्दराज्यात सरकार स्थापनेचा घोळ कायम असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचा अयोध्या दौरा पुढे ढकलला आहे. ते २४ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार होते.रामजन्मभूमी प्रकरणी निकालानंतर प्रतिक्रिया देताना उद्धव यांनी ते २४ नोव्हेंबरला रामलल्लाच्या दर्शनासाठी जातील, असे सांगितले होते. तथापि, आता राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ते तूर्त अयोध्येला जाणार नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस