शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
दिल्लीत तक्रार अन् मुंबईत डिल? उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेचा नेता भाजपशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, अंधारेंचा दावा
3
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
4
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
5
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
6
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
7
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
8
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
9
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
10
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
11
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
12
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
13
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
14
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
15
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
16
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
17
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
18
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
19
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
20
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं; गडकरींचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 22:08 IST

राज्याच्या राजकारणावर बोलताना गडकरींचं विधान

मुंबई: क्रिकेट आणि राजकारणात काहीही घडू शकतं. आपण सामना गमावत आहोत, असं कधी कधी वाटू लागतं. मात्र त्यानंतर वेगळाच निकाल समोर येतो, अशा शब्दांमध्ये केंद्रीय भूपृष्ठमंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरींनी राज्यातल्या सद्यस्थितीवर भाष्य केलं. मात्र राज्यात कोणाचं सरकार येईल, याबद्दल मला कल्पना नसल्याचं ते म्हणाले. भाजपानं राज्यात सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीनं सरकार स्थापनेच्या दृष्टीनं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर गडकरींनी केलेलं विधान महत्त्वपूर्ण आणि सूचक मानलं जातं आहे.मुंबईतील एका कार्यक्रमात नितीन गडकरींना सत्ता स्थापनेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तुमचा प्रश्न योग्य आहे. मात्र तो तुम्ही चुकीच्या व्यक्तीला विचारला आहे, असं गडकरी म्हणाले. सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत सहभागी असलेले नेतेच यावर भाष्य करू शकतात, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं. या प्रश्नावर बोलताना त्यांनी क्रिकेटचा संदर्भ देत सूचक भाष्य केलं. 'राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. कधी कधी तुम्हाला वाटतं, तुम्ही सामना गमावत आहात. पण सामनाचा निकाल बरोबर उलट लागतो,' असं गडकरी म्हणाले. मी आताच दिल्लीहून आलोय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करणार नाही. दिल्लीत सक्रीय असल्यानं मला राज्याच्या राजकारणाबद्दल फारशी माहिती नाही. त्यामुळे राज्यात कोणाचं सरकार येईल, याबद्दल मी काहीच सांगू शकत नाही, असं गडकरी म्हणाले. राज्यात भाजपा व्यतिरिक्त कोणत्याही पक्षाचं सरकार आल्यास विकासकामांवर परिणाम होईल का, असा प्रश्न यावेळी उपस्थितांपैकी एकानं गडकरींना विचारला. त्यावर सरकारं बदलत असतात. पण प्रकल्प सुरूच राहतात. त्यामुळे त्यात समस्या येणार नाहीत. राज्यात कोणतंही सरकार आलं. मग ते भाजपाचं असो, काँग्रेसचं असो, राष्ट्रवादीचं असो किंवा मग शिवसेनेचं असो, ते सकारात्मक आणि विकासाच्या धोरणांना आणि मोठ्या प्रकल्पांना सहकार्य करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस