शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

Maharashtra Cabinet Expansion : भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी?, गुजरात पॅटर्नची दिग्गजांना धडकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 10:16 IST

मंत्रिपदासाठी आता नवीन चेहऱ्यांची जोरदार चर्चा होत आहे. वाचा कोणाच्या नावांची आहे चर्चा.

मुंबई - सरकार स्थापन होऊन महिनाभराचा कालावधी उलटला असला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार मात्र अद्यापही झाला नाहीये. मात्र, आता मंत्रिमंडळाच्या विस्तारात दिग्गजांचा पत्ता कापून भाजपकडून नव्यांना संधी दिली जाणार असल्याच्या वृत्ताने अनेकांना धडकी भरली आहे. मंत्रिपदासाठी आता नवीन चेहऱ्यांची जोरदार चर्चा होत आहे.

मुंबईतून आशिष शेलार, अतुल भातखळकर आणि राम कदम यांची नावे समोर आली आहेत. ठाणे जिल्ह्यातील रवींद्र चव्हाण, वर्धेचे समीर कुणावार, अकोल्याचे रणधीर सावरकर, वाशिमचे राजेंद्र पाटणी, नंदूरबारचे डॉ.विजयकुमार गावित, अहमदनगरचे राधाकृष्ण विखे पाटील, जालना जिल्ह्यातील नारायण कुचे, नागपूरचे प्रवीण दटके, नाशिकच्या देवयानी फरांदे, चंद्रपूरचे बंटी भांगडिया, साताऱ्याचे शिवेंद्रराजे भोसले, पुण्याच्या माधुरी मिसाळ अशा नावांची जोरदार चर्चा होत आहे. मंत्रिमंडळाला नवीन चेहरा देण्याचा भाजपच्या श्रेष्ठींचा आग्रह असल्याने या नावांना बळ आले आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,सुधीर मुनगंटीवार,गिरीश महाजन, जयकुमार रावल, संभाजी पाटील निलंगेकर,  डॉ.संजय कुटे, बबनराव लोणीकर,सुभाष देशमुख, गिरीश महाजन, जयकुमार रावल, विजय देशमुख या अनुभवी नेत्यांना संधी मिळणार की नाही या बाबत अनिश्चितता आहे. मदन येरावार, परिणय फुके, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हेही अनिश्चिततेच्या झुल्यावर आहेत. चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांना संधी देताना प्रदेशाध्यक्ष अन्य व्यक्तीकडे देण्याची अट असेल असे मानले जाते. बहुतांश चेहरे नवीन दिले तर सरकारची घडी बसवून गतिमान कारभार देणे कठीण जाईल, असे सांगत अनुभवी लोकांना संधी देत जुन्या-नव्यांचे संतुलन साधावे असा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह असल्याचे म्हटले जाते. त्या बाबत अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींकडून अद्यापही न होणे हे मंत्रिमंडळ विस्तार लांबण्याचे प्रमुख कारण मानले जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काही वेगळा निकाल दिला तर भाजप-शिंदे यांच्याकडून विधान परिषदेच्या १२ जागांसाठी राज्यपालांकडे लगेच नावे पाठवायची आणि नियुक्त्या करवून घ्यायच्या अशीही रणनीती असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र