महाराष्ट्राच्या मागण्या सायडिंगला!
By Admin | Updated: July 9, 2014 02:31 IST2014-07-09T02:31:35+5:302014-07-09T02:31:35+5:30
पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा करणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लिहिलेले पत्र केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी सायडिंगला टाकून दिले.

महाराष्ट्राच्या मागण्या सायडिंगला!
मुंबई : रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील जनतेच्या रेल्वेविषयक अपेक्षा पूर्ण कराव्यात आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा करणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लिहिलेले पत्र केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी सायडिंगला टाकून दिले.
मुख्यमंत्र्यांनी जानेवारी महिन्यात रेल्वे मंत्रलयाला पत्र लिहिले होते. निवडणुकानंतर मोदी सरकार आले. त्यानंतर त्यांनी त्या पत्रची एक प्रत केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांना देऊन यासंदर्भात पाठपुरावा करण्याची विनंती केली होती. या पत्रत त्यांनी, राज्य शासनाने एकंदर 8 प्रकल्पांमध्ये आपला 5क् टक्के हिस्सा देण्यास मान्यता दिली असून त्यापैकी अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ, तसेच वर्धा-यवतमाळ-नांदेड या नवीन दोन रेल्वेमार्गाचे काम पुरेशा निधीअभावी रेंगाळले आहे तर वडसा-गडचिरोली, आदिलाबाद-माणिकगड, कराड-चिपळूण, मनमाड-इंदौर, पुणो-नाशिक आणि नागपूर-नागभिड हे सहा प्रकल्प प्रलंबित आहेत असे सांगितले होते. राज्य शासन पुढील तीन वर्षात आपला हिस्सा देण्यास कटिबद्ध असून रेल्वे मंत्रलयानेदेखील यासाठी निधी द्यावा, जेणोकरून हे प्रकल्प तातडीने सुरू होऊ शकतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. मात्र यातील एकाही प्रकल्पाच्या वाटय़ाला काही आलेले नाही.
महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्र लक्षात घेता इतर राज्यांच्या तुलनेत या ठिकाणी रेल्वेचे जाळे अपुरे आहे, त्यामुळे नवीन रेल्वेमार्गाचे प्रकल्प सुरू करणो आवश्यक आहे. यासाठी राज्य सरकार आपला आर्थिक भार उचलण्यासही तयार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी कळवले होते. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय लोकल रेल्वेसेवेच्या पायाभूत सुविधांमध्येदेखील अजून वाढ होणो आवश्यक आहे. मध्यंतरी मुंबईमध्ये फ्लॅटफॉर्म आणि लोकलचा दरवाजा यातील मोठय़ा अंतरामुळे काही दुर्दैवी अपघात झाले. फ्लॅटफॉर्मची उंची अनेक स्थानकांवर कमी-जास्त आहे. त्यामुळे महिला, विद्यार्थी आणि वृद्ध प्रवाशांना चढण्याउतरण्यास त्रस होतो. यासंदर्भातदेखील प्रवाशांची सुरक्षा कशी होईल हे पाहणो आवश्यक आहे. मात्र त्यासाठी वेगळी तरतूद झालेली नाही. मुंबईतील उपनगरीय रेल्वेतून दररोज 75 लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, अद्यापही मध्य रेल्वेवरील हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील बोरीवली, विरार, डहाणू या भागातून अधिकाधिक लोकल सेवा सुरू व्हावी या मागणीलादेखील यश मिळालेले नाही. एमयूटीपी-2 या प्रकल्पासाठी 375 कोटी रुपये अंतरिम अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले होते. ते 5क्क् कोटी रुपयांर्पयत वाढवावे. त्याचप्रमाणो एमयूटीपी-3 या टप्प्यात पनवेल-कर्जत कॉरिडॉर आणि ऐरोली-कळवा या दरम्यान रेल्वेमार्गासाठी 1क्क् कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणीदेखील पत्रतच दडून राहिलेली आहे.
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे वॅगन दुरुस्ती कार्यशाळेस रेल्वे मंत्रलयाकडूनही लवकरात लवकर मंजुरी मिळावी. या ठिकाणी जमीन संपादनाची कार्यवाही वेगाने सुरू आहे. हा प्रकल्प लवकर सुरू झाल्यास या भागात मोठय़ा प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊन आर्थिक चालना मिळेल असे राज्याला वाटत असताना केंद्राला मात्र तसे वाटत नाही हे स्पष्ट झाले आहे.
पुढील वर्षी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ‘अर्धमहाकुंभमेळा’ आहे. संपूर्ण देशातील लाखो भाविक यासाठी येतील. सध्याच्या नाशिक रोड, देवळाली आणि ओढा या स्थानकांवर होणारी गर्दी लक्षात घेता या ठिकाणी नवीन वाढीव सुविधा निर्माण करणो आवश्यक आहे. (प्रतिनिधी)
58 नव्या गाडय़ांपैकी 15 महाराष्ट्राच्या वाटय़ाला
च्रेल्वेमंत्र्यांनी विविध प्रकारच्या 58 नव्या रेल्वेगाडय़ा सुरू करण्याची व सध्या धावणा:या 11 गाडय़ांच्या प्रवासाचा विस्तार करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली. नव्या गाडय़ांपैकी 15 गाडय़ा महाराष्ट्रातून सुरू होतील किंवा बाहेरून महाराष्ट्रात येतील किंवा बाहेर जाताना महाराष्ट्रातून मार्गस्थ होतील.
च्नव्या गाडय़ांमध्ये पाच जनसाधारण गाडय़ा, पाच प्रीमियम गाडय़ा, सहा वातानुकूलित एक्स्प्रेस गाडय़ा, 27 एक्स्प्रेस गाडय़ा, आठ पॅसेंजर गाडय़ा, दोन ‘मेमू’ आणि पाच ‘डेमू’ गाडय़ा असतील.
महाराष्ट्राशी संबंधित नव्या गाडय़ा अशा असतील
अ) जनसाधारण गाडय़ा : जयनगर-मुंबई आणि मुंबई-गोरखपूर.
ब) प्रीमियम गाडय़ा : मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली आणि जयपूर-मदुराई.
क) वातानुकूलित एक्स्प्रेस गाडय़ा : लोकमान्य टिळक टर्मिनस-लखनऊ (साप्ताहिक), नागपूर-पुणो (साप्ताहिक), नागपूर-अमृतसर (साप्ताहिक) आणि हजरत निजामुद्दीन-पुणो (साप्ताहिक).
ड) एक्स्प्रेस गाडय़ा : अहमदाबाद-पाटणा वाराणसीमार्गे (साप्ताहिक), अहमदाबाद-चेन्नई वसईरोडमार्गे (आठवडय़ातून दोनदा), वांद्रे टर्मिनस- जयपूर नागदा, कोटा मार्गे (साप्ताहिक), बिदर-मुंबई (साप्ताहिक), लोकमन्य टिळक टर्मिनस-आझमगढ (साप्ताहिक), मुंबई-काझीपेठ बल्लारशामार्गे (साप्ताहिक) आणि मुंबई-पालिताना (साप्ताहिक)
o्रीमंतांचा अर्थसंकल्प
काँग्रेसने रेल्वे अर्थसंकल्प ‘श्रीमंतांचा’ असल्याचे म्हटले आहे. माजी रेल्वेमंत्री आणि काँग्रेस नेते मल्लिकाजरुन खरगे यांनी यात कोणताही नवी प्रकल्प, योजना किंवा रेल्वे मार्ग नाही. यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गृहराज्याला खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची टीका केली आहे.
- मल्लिकाजरुन खरगे, माजी रेल्वेमंत्री
प्रस्ताव आधीचाच
बंदरांना रेल्वे मार्गाला जोडण्याची योजना आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) वापर वाढण्याची योजनांचा प्रस्ताव आधीपासून तयार आहे. गौडा यांच्या रेल्वे अर्थसंकल्पात नवीन असे काहीच नाही.
- पवनकुमार बंसल,
माजी रेल्वेमंत्री
जनतेची फसवणूक
रेल्वे अर्थसंकल्प दुसरे तिसरे काही नसून, जनतेची फसवणूक आहे. हे रेल्वे बजेट नसून, मोदी गॅङोट आहे. - लालूप्रसाद यादव, माजी रेल्वेमंत्री
सुरक्षितता बळकट करा
बुलेट ट्रेनची कल्पना चांगली आहे, पण रुळांवरील सुरक्षितता आधी बळकट करणो आवश्यक आहे.
- दिनेश त्रिवेदी, माजी रेल्वेमंत्री
रेल्वे अर्थसंकल्पात खासगीकरण आणि खासगी गुंतवणूक आणण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. पण, असे करतेवेळी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या लोकांना आरक्षण मिळायला पाहिजे.
- मायावती,
माजी मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश
रेल्वे प्रकल्पांना मिळणार गती
मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर सुरू असलेल्या रेल्वे प्रकल्पांना यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात आर्थिक निधी मंजूर केला आहे. यामध्ये एमयूटीपी-2मधील प्रकल्पांसाठी 373 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने
केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी मांडलेला रेल्वे अर्थसंकल्प व्यर्थ असून बुलेट ट्रेनचा प्रस्ताव ही निव्वळ धूळफेक आहे, असा दावा करीत दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदरसिंग लव्हली यांच्या नेतृत्वाखाली शेकडो काँग्रेस कार्यकत्र्यानी येथे रेल्वेमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. तसेच मुंबईतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्र्यानी भाजपा कार्यालयाबाहेर निदर्शने केली.
तीर्थयात्रंसाठी खास ‘रेल्वे पॅकेज’
देशांतर्गत पर्यटन विकासास असलेला मोठा वाव लक्षात घेऊन रेल्वे धार्मिक स्थळांना भेट देणा:या भाविकांच्या सोयीसाठी खास रेल्वेगाडय़ांचे पॅकेज सुरु करणार आहे. यासाठी रेल्वेने देवी सर्किट, ज्योतिर्लिग सर्किट, जैन सर्किट, ािश्चन सर्किट, मुस्लिम/सुफी सर्किट, शीख सर्किट, बौद्ध सर्किट, प्रसिद्ध मंदिरांचे सर्किट अशा विविध सहलींचे कार्यक्रम तयार केले आहेत. या सहलींना जाण्यासाठी रेल्वेकडून विशेष ‘पॅकेज्ड ट्रेन’ चालविल्या जातील. यात खासगी व्यावसायिकांना सहभागी होण्यासही प्रोत्साहन दिले जाईल. यानुसार कर्नाटक व महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे व पर्यटन स्थळांना जाण्यासठी गदगहून पंढरपूर्पयत (बागलकोट, विजापूर व सोलापूरमार्गे) एक रेल्वेगाडी चालविली जाईल. अशाच प्रकारे रामेश्वरहून सुटणारी पॅकेज्ड रेल्वेगाडी पर्यटकांना बेंगळुरु, चेन्नई, अयोध्या, वाराणसी व हरिद्वारला घेऊन जाईल. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाशी संबंधित स्थळांना घेऊन जामारी विशेष गाडी चालविण्याचाही मानस असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.
रेल्वेसाठी 65445 कोटींचा व्यय प्रस्ताव
नवी दिल्ली : केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात रेल्वेसाठी 65445 कोटी रुपयांचा आतार्पयतचा सर्वाधिक योजनागत व्यय प्रस्ताव सादर केला आहे. यात 3क्क्क्क् कोटी रुपयांचा अर्थसंकल्पीय सहयोग सामील आहे.
आतार्पयतच्या सर्वाधिक योजनागत व्ययामध्ये 1179क् कोटी रुपयांचे बाजारातील कर्ज आणि 1535क् कोटी रुपयांच्या आंतरिक संसाधनांचा समावेश राहील, असे रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी 2क्14-15 या वर्षाचा रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना सांगितले. अन्य 6क्क्5 कोटी रुपये सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) गोळा केले जातील. तर रेल्वे 22क्क् कोटी रुपयांचा सुरक्षा कोष स्थापन करेल, असे गौडा म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प - पंतप्रधान
रेल्वे अर्थसंकल्प भविष्याचा वेध घेणारा आणि विकासोन्मुख असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेमंत्र्यांचे अभिनंदन केले. हा रेल्वे अर्थसंकल्प सामान्य जनतेसाठी आहे. यामध्ये चांगली सेवा, वेग आणि सुरक्षितता पुरविण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी टि¦ट केले.
महाराष्ट्राचा अपेक्षाभंग
नव्या सरकारमध्ये मुंबई आणि राज्याचे अनेक खासदार असूनही रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या दृष्टीने काही भरीव तरतूद झाली नाही हे त्यांचे अपयश आहे. गेल्या महिन्यात रेल्वेच्या तिकीट दरांमध्ये अचानक 14.5क् टक्के वाढ केली होती. ही वाढ मागे घेण्याबाबत काही ठोस निर्णय होतील, अशी अपेक्षा होती.
- पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री
महाराष्ट्राची घोर निराशा
रेल्वे अर्थसंकल्पाने महाराष्ट्राची घोर निराशा केली आहे. मुंबईच्या रेल्वे प्रश्नांसंदर्भात शिवसेना-भाजपाच्या उमेदवारांनी आणि नेत्यांनीही लोकसभा निवडणुकीच्या काळात फारच गाजावाजा केला होता; परंतु त्याचे प्रतिबिंब रेल्वे अर्थसंकल्पात उमटलेले दिसत नाही.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री
राज्याला वाटाण्याच्या अक्षता
रेल्वे भाववाढीला महाराष्ट्राने प्रचंड विरोध केला. त्यामुळे मोदींनी यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राला वाटाण्याच्या अक्षता लावून वचपा काढला. राज्यातील आठ प्रस्तावित रेल्वे प्रकल्पांतील निम्मा खर्च उचलण्यास काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने अगोरदच मंजुरी दिली आहे.
- माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
महाराष्ट्राला भरघोस लाभ
नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या रेल्वे अर्थसंकल्पात मुंबई व महाराष्ट्राला भरघोस लाभ झाला आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ‘पीपीपी’ व थेट परकीय गुंतवणुकीच्या (एफडीआय) उपायांमुळे रेल्वेच्या विकासाला प्रचंड चालना मिळेल.
- देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष, भाजपा
अभ्यासपूर्ण बजेट
रेल्वे बजेट अनेक सुधारणा सुचवण्यात आल्या असल्या तरीही ठाणो जिल्ह्यातील प्रवाशांना काही मिळाले नाही असे सांगण्यात येत आहे, मात्र तसे नसून जे 864 रेक्स देण्यात आले आहेत त्यातून प्रवाशांनाच मदत होणार आहे. त्याचबरोबर अनेक सोयी स्थानकात देण्यात येणार आहेत. अत्यंत अभ्यासपूर्ण आणि कमी वेळात हे बजेट त्यांनी सादर केले आहे.
- एकनाथ शिंदे,
शिवसेना आमदार - ठाणो जिल्हा प्रमुख
हेच का अच्छे दिन?
रेल्वेची खासगीकरणाकडे वाटचाल दिसून येत आहे. त्यातच एकीकडे भाजपा स्वदेशीचा पुरस्कार करणारा पक्ष मात्र आजच्या बजेटमध्ये एफडीएची घोषणा करून ते त्यांचा संकल्प विसरत आहेत की काय? अन् हेच त्यांचे अच्छे दिन आहेत का?
- आनंद परांजपे, माजी खासदार
सर्वसमावेशक अर्थसंकल्प
हा रेल्वे अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून त्यामध्ये प्रवाशांना सुविधा, स्वच्छता आणि सुरक्षितता प्रदान करण्याबरोबरच आधुनिकीकरणासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत.
- एकनाथ खडसे, विरोधी पक्षनेते
विकासाची मोदी एक्स्प्रेस
रेल्वे अर्थसंकल्पाने सर्व स्तरातील जनतेला न्याय आणि चांगल्या सोयीसुविधा दिल्या आहेत. रेल्वेच्या विकासाला चालना देणारा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणारा असा हा अर्थसंकल्प आहे.
- विनोद तावडे, विरोधी पक्षनेते,
विधान परिषद
रेल्वेच्या खाजगीकरणाचा घाट
या अथर्संकल्पाकडे गांभीर्याने पाहिल्यास मोदी सरकारने भारतीय रेल्वेचे खाजगीकरण करण्याचा घाट घातल्याचे दिसून येते. परकीय गुंतवणूक, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीपचे फंडे याचीच प्रचीती देतात. मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे.
- नवाब मलिक , प्रवक्ते, राष्ट्रवादी