शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra day: 'कोणालाही माझ्यासारखं जगायला लागू नये म्हणून हा अट्टाहास'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 11:56 IST

लैगिक शिक्षणावर काम करणाऱ्या चांदनी गोरे यांची कहाणी 

पुणे : जन्माला येताना आपण कोणत्या घरात यायचं, हे जसं आपल्या हातात नसतं. तसं पुरुष म्हणून जन्म घ्यावा की स्त्री म्हणून, हेदेखील आपल्या हातात नसतं. पण म्हणून तृतीयपंथीयांनी कायम पिळवणूकच सहन करायची असा अर्थ होत नाही असं तत्वज्ञान आहे चांदणी गोरे यांचं. स्वतः तृतीयपंथी असणाऱ्या आणि लैंगिक शिक्षणासाठी काम करणाऱ्या चांदनी या लहान मुलांमध्ये लैंगिक शिक्षणाविषयी जागरुकता निर्माण करण्याचं काम करतात. सुरुवातीला आपली मुलगी ही स्त्री  किंवा पुरुषापेक्षा काहीतरी वेगळी आहे हे घरचेदेखील स्वीकारत नव्हते. त्यांनी चांदनी यांनी जमेल तेवढे समजवण्याचा, वेळप्रसंगी मारून, धमकी देऊन मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. पण मी वेगळी आहे आणि हे  नैसर्गिक आहे या मतापासून त्या ढळल्या नाहीत. अखेर घरच्यांनी ते मान्य केले. आज त्या निर्भया आनंदी जीवन नावाची संस्था चालवतात. त्या माध्यमातून लहान मुलांना लैंगिक शिक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अनेक ठिकाणी जाऊन, मुलांना एकत्र करून चांगला स्पर्श, वाईट स्पर्श याबद्दल त्या सांगतात. वयात येणाऱ्या मुलांच्या समस्या समजून त्यांची मानसिक गुंतागुंत दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. यावेळी अनेक लहान मुलांच्या शारीरिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या असून त्यातूनही त्या मार्ग काढत असतात. याकरता मुलांचे, पालकांचे मतपरिवर्तन करावे लागते. वेळप्रसंगी वाईटपणा घ्यावा लागला तरी चालेल, पण कोणावरही शारीरिक अत्याचार होऊ नये, असा त्यांचा प्रयत्न असतो. यासोबतच तृतीयपंथीयांसाठी त्या बचतगट चालवतात. त्यांना शिक्षणाचे, बचतीचे महत्व पटावे, त्यांनी समाजात सन्मानाने वावरावे असा त्यांचा प्रयत्न असतो. त्या सांगतात की, तृतीयपंथीयांना बाकी काही नको असते. ते आसुसलेले असतात ते प्रेमासाठी. समाजाने त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. असे झाले नाही तर कायम समाजव्यवस्थेच्या बाहेरच राहतील असे त्यांना वाटते. आज समाज वेगाने बदलत असला, तरी जे माझ्यासारखे पुढे आले त्यांनाच स्वीकारले गेले. जे कायम मागे राहिले त्यांना काळाने मागेच ठेवले असे त्या दुर्दैवाने नमूद करतात. चांदनी या पुण्यातल्या गरीब लोकवस्तीत राहतात. जिथे हातातोंडाशी गाठ पडत नाही, तिथे लैंगिक शिक्षणाचे काय महत्त्व असणार? मात्र तरीही, माझे शरीर, माझा अधिकार हा हक्क प्रत्येकाला हवा असे त्यांचे स्पष्ट मत आहे. आजही चांदनी दुवामध्ये नाचतात. तृतीयपंथी म्हणून करण्यात येणारे काम त्यांनी कधीच लपवले नाही. पण माणूस म्हणून त्यांचे काम अधिक स्तिमित करणारे आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास मी स्वतःला स्वीकारलं, तेव्हा जगाने मला स्वीकारलं. जे माझा वेगळेपणा बघून हसतात, त्यांच्या विचारात असणारे मागासलेपण बघून मीही त्यांना हसते. शेवटी समाजाने आम्हाला मोठ्या मनाने स्वीकारलं तर त्यात सगळ्यांचं हित आहे. तसं  झालं नाही तरी आमचं अस्तित्व नाकारून चालणार नाही, हेदेखील सत्य समाजाला स्वीकारावं लागणारच आहे. चांदनी यांचे शब्द अधिक टोचतात, कारण त्यांना सत्याची धार आहे. आकाशातल्या चांदणीप्रमाणे उपेक्षितांच्या आयुष्यात लखलखणाऱ्या चांदनी यांच्या कामाला खूप खूप सदिच्छा ! 

टॅग्स :Maharashtra Dayमहाराष्ट्र दिनMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे