शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्रातील सूर धमकीवजा; राज्यपाल कोश्यारींनी व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 6:06 AM

Bhagat Singh Koshyari : राज्यपालांनी पत्रात असेही म्हटले आहे की, मी घटनेशी प्रामाणिक राहण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत आपण जी सुधारणा केली आहे ती मला प्रथमदर्शनी घटनाबाह्य आणि अनधिकृत वाटते.

मुंबई : ‘आपल्या पत्रातील असंतुलित आणि धमकीवजा सूर बघून मी खूपच दु:खी झालो. अशा पत्रामुळे राज्यपालांच्या उच्चतम संवैधानिक कार्यालयाची प्रतिमा खालावली गेली, तिचे अध:पतन झाले,’ या शब्दात राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात नाराजी व्यक्त केली आहे.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी राज्य सरकारने राज्यपालांकडे संमती मागितली होती. त्यानंतर महाविकास आघाडीचे तीन ज्येष्ठ मंत्री राज्यपालांना गेल्या रविवारी जाऊन भेटले आणि त्यांनीही साकडे घातले. त्यावर कायदेशीर बाबींचा अभ्यास करून मी निर्णय देईन, असे राज्यपाल म्हणाल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले होते.

राज्य सरकारने सोमवारी सकाळी राज्यपालांना पुन्हा स्मरणपत्र पाठविले. सायंकाळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी खरमरीत पत्र पाठविले. ‘राज्यपालांनी अभ्यासात अनावश्यक वेळ घालवू नये. विधानमंडळाने केलेले कायदे तपासण्याचा अधिकार आपल्याला नाही,’ असे ठाकरे यांनी पत्रात सुनावले होते. याच पत्राचा संदर्भ देत राज्यपालांनी मंगळवारी राज्य सरकारला पाठविलेल्या पत्रात ही नाराजी बोलून दाखविली.

राज्यपालांनी पत्रात असेही म्हटले आहे की, मी घटनेशी प्रामाणिक राहण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत आपण जी सुधारणा केली आहे ती मला प्रथमदर्शनी घटनाबाह्य आणि अनधिकृत वाटते. अध्यक्ष निवडीबाबतची प्रक्रिया ठरवायला तुम्ही ११ महिने घेतले आणि नियम आमूलाग्र बदलले. याचे दूरगामी परिणाम काय होतील, याचा कायदेशीर अभ्यास करणे गरजेचे आहे. संमती देण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जाऊ शकत नाही.

राज्य सरकारदेखील राज्यपालांवर नाराज- राज्य सरकार पण राज्यपालांवर नाराज आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबद्दलचा संघर्ष कालही टोकाला जावू शकला असता, पण राज्य सरकारने संयम बाळगला. - राज्यपाल जेव्हा राजी होतील आणि अनुमती देतील तेव्हा विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल, अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीUddhav Thackerayउद्धव ठाकरे