शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

Maharashtra CM: सरकार स्थापनेचा पुन्हा दावा करू -उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 06:22 IST

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचा आमचा दावा आम्ही अजूनही सोडलेला नाही.

मुंबई : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचा आमचा दावा आम्ही अजूनही सोडलेला नाही. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसचा पाठिंबा मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने आता आमच्याकडे सहा महिन्यांचा वेळ आहे. सरकार कसे स्थापन करायचे, हे आमच्या तिघांमध्ये ठरल्यावर सरकार स्थापनेचा दावा पुन्हा केला जाईल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जाहीर केले.राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर उद्धव व आदित्य ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर, पत्रकार परिषदेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर उपरोधिक टीका करताना उद्धव म्हणाले की, बहुमताची संख्या दाखविण्यासाठी आम्हाला दोन दिवसांचीही मुदत वाढवून न देणाऱ्या दयावान राज्यपाल महोदयांनी आता (राष्ट्रपती राजवटीची शिफारस करून) आम्हाला सहा महिन्यांचा वेळ दिला आहे. असा मोठ्या मनाचा राज्यपाल सर्वांनाच मिळाला, तर त्या-त्या राज्यांचे व देशाचेही नक्कीच भले होईल!शिवसेनेला पाठिंबा देण्याचा राष्ट्रवादी व काँग्रेसचा अधिकृत निर्णय झाला नसला तरी त्यांनी नकार दिलेला नाही, हेही सत्य आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याचे सरकार स्थापन करायचे हे काही साधे काम नाही. तिघांनी एकत्र बसून त्यासाठी सामायिक किमान कार्यक्रम ठरवावा लागेल. त्यांच्या मनात काही मुद्दे आहेत. आमच्याही मनात काही मुद्दे आहे. येत्या काही दिवसांत एकत्र बसून या सर्व मुद्द्यांवर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. परस्परविरोधी विचारसरणीच्या पक्षांना सोबत घेऊन सरकारस्थापनेच्या आमच्या प्रयत्नांवर टीका केली जात आहे. पण भाजपाने काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती, बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासोबत व मोदींवर तोंडसुख घेणाºया चंद्राबाबू नायडूंसोबत आंध्र प्रदेशात कसे सरकार स्थापन केले याची माहिती मी मागविली आहे. त्यातून आताच्या या प्रयत्नांत आम्हाला नक्कीच मार्गदर्शन मिळेल, असेही ते म्हणाले. आतातरी भाजपासोबतची तुमची युती तुटली असे म्हणायचे का, असे विचारता ठाकरे यांनी युती आम्ही नाही, त्यांनी तोडली आहे, असे सांगितले. ते म्हणाले की, हिंदुत्ववादी विचाराने आम्ही एकत्र आलो होतो. अयोध्येतील राम मंदिर हाही त्याचाच एक सामायिक मुद्दा होता. पण एकीकडे एकवचनी रामाचे गोडवे गायचे व दुसरीकडे दिलेली वचने मोडायची असे वागणाऱ्यांशी युती सुरू ठेवण्यात अर्थ तरी काय आहे?

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस