शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

'चॅम्पियन' टीम इंडियाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन, 'या' ४ खेळाडूंचं केलं विशेष कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 13:14 IST

Devendra Fadnavis Team India, Champions Trophy Final Victory: सर्व खेळाडूंना महाराष्ट्र सरकारकडून दिले जाणार अभिनंदनाचे प्रशस्तीपत्रक

Devendra Fadnavis Team India, Champions Trophy Final Victory: चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकून भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. रविवारी न्यूझीलंडविरूद्ध ( IND vs NZ ) खेळताना भारताने ४ गडी आणि ६ चेंडू राखून विजय मिळवला. फायनलच्या सामन्यात न्यूझीलंडने ( New Zealand ) डॅरेल मिचेल (६३) आणि मायकल ब्रेसवेल (नाबाद ५३) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ५० षटकात ७ बाद २५१ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा (७६), श्रेयस अय्यर (४८) आणि केएल राहुल (नाबाद ३४) या तिघांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या विजयानंतर सर्व स्तरातून टीम इंडियाचे अभिनंदन होत आहे. त्यातच महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भारतीय संघाचे अभिनंदन केले. तसेच चार खेळाडूंचे विशेष कौतुक केले.

काय म्हणाले फडणवीस?

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "पाकिस्तान व दुबई येथे पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने विजेतेपदाची ट्रॉफी जिंकल्याबद्दल विशेष अभिनंदन. विशेष यासाठी कारण चॅम्पियन ट्रॉफी टीम इंडियाला अनेक वेळा हुलकावणी देत होती. अखेर २०२५ मध्ये भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. लागोपाठ ICCच्या दोन स्पर्धा जिंकणारा भारत हा एकमेव देश ठरला"

'या' चार खेळाडूंचे केले विशेष कौतुक

"स्पर्धेच्या सुरुवातीला विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या फॉर्मबाबत अनेक टीका करण्यात आल्या होत्या, पण दोघांनीही या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आणि अनुभव पणाला लावून 'क्लासी बॅटिंग' करत संघाला स्पर्धा जिंकून दिली. वरूण चक्रवर्ती याचेही विशेष कौतुक आहे. आधी क्रिकेट खेळल्यानंतर तो आर्किटेक्ट झाला, त्याने नोकरी केली पण पुन्हा तो क्रिकेटकडे वळला आणि या स्पर्धेत त्याने भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. कुलदीप यादवनेही आपल्या फिरकीने कमाल करून दाखवली आणि न्यूझीलंडला अडचणीत आणले," अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय संघाच्या चार खेळाडूंचे विशेष कौतुक केले.

सभागृहात ठराव मंजूर, सर्व खेळाडूंना देणार प्रशस्तीपत्रक

"युवा आणि अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या भारताने दमदार कामगिरी केली आणि चॅम्पियन्स ट्रॉफी तीन वेळा जिंकणारा भारत हा एकमेव देश ठरला. सध्याच्या भारतीय क्रिकेटमध्ये अनेक चांगले खेळाडू आहेत. मी अनेक जणांकडून असे ऐकले की भारताने सध्या अ आणि ब असे दोन संघ बनवले तरीही तेच दोन संघ फायनल मध्ये खेळतील इतके भारतीय क्रिकेट बहरलेले आहे. या चॅम्पियन संघातील खेळाडूंचे मी सभागृहाच्या वतीन मनापासून अभिनंदन करतो," असेही फडणवीस म्हणाले.

तसेच, हा अभिनंदनाचा ठराव प्रशस्तीपत्रकाच्या रूपाने चॅम्पियन संघाती प्रत्येक खेळाडूला पाठवावा, अशी विनंतीही त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChampions Trophyचॅम्पियन्स ट्रॉफी २०२५Indian Cricket Teamभारतीय क्रिकेट संघTeam Indiaभारतीय क्रिकेट संघRohit Sharmaरोहित शर्माVirat Kohliविराट कोहली