शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

Maharashtra Cabinet Expansion: "अखेर भाजपासाठी संजय राठोड..."; काँग्रेसच्या नाना पटोलेंची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 21:58 IST

"ईडी’ सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला परंतु.."; वाचा पटोलेंचे ट्वीट

Sanjay Rathod Maharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी अखेर आज मंत्रिमंडळ विस्तार झाला. महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये आज भाजपाच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी शपथ घेतली. यात सर्वाधिक चर्चा रंगली ती शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांच्या मंत्रिपदाची. पूजा चव्हाण या तरूणीच्या मृत्यूप्रकरणी मविआ सरकारच्या मंत्रिमंडळातून संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी हा मुद्दा आक्रमकपणे लावून धरल्यामुळेच संजय राठोडांना राजीनामा द्यावा लागला होता. पण नव्या सरकारमध्ये भाजपाच्या साक्षीने पुन्हा एकदा त्यांना मंत्रीपद देण्यात आले. यावरून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची टीका केली होतीच. त्या पाठोपाठ आता काँग्रेसनेही या मुद्द्यावरून भाजपावर बोचरी टीका केली.

संजय राठोड यांची मंत्रिपदी वर्णी लागेल की नाही, याबद्दल साऱ्यांनाच साशंकता होती. पण अखेर आज सकाळी त्यांच्या नावाचाही यादीत समावेश करण्यात आला. अनेकांनी या निर्णयावरून नव्या शिंदे-भाजपा सरकारवर निशाणा साधला. खुद्द भाजपाच्या चित्रा वाघ यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आणि न्यायालयीन लढाई सुरूच राहिल असं स्पष्ट केलं. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीका करण्याची संधी सोडली नाही. "अखेर भाजपासाठी संजय राठोड पवित्र झाले", अशा शीर्षकाखाली त्यांनी एक ट्वीट केले. "तब्बल एका महिन्याच्या प्रतीक्षेनंतर ‘ईडी’ सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. परंतु कालपर्यंत भाजपासाठी कलंकित असलेले संजय राठोड हे आज पवित्र झाले, त्यामुळेच त्यांचा समावेश बहुदा मंत्रिमंडळात करण्यात आला असावा", अशा बोचऱ्या शब्दात त्यांनी भाजपावर टीका केली.

दरम्यान, संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळाच्या समावेशाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचक प्रतिक्रिया दिली. "मला अतिशय आनंद आहे, मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. सर्व सक्षम मंत्री आहेत, लवकरच पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. जे विनाकारण आरोप करत आहेत त्यांना हे उत्तर आहे. खातेवाटप लवकरच केले जाईल. संजय राठोडांच्या विषयावर आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे आणि ते पुरेसे आहे", अशी सावध व सूचक प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली. त्यामुळे, आता विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक या मुद्द्यावरून सरकारला घेरणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारNana Patoleनाना पटोलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस