शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

Maharashtra Cabinet Expansion: "अखेर भाजपासाठी संजय राठोड..."; काँग्रेसच्या नाना पटोलेंची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 21:58 IST

"ईडी’ सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला परंतु.."; वाचा पटोलेंचे ट्वीट

Sanjay Rathod Maharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी अखेर आज मंत्रिमंडळ विस्तार झाला. महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये आज भाजपाच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी शपथ घेतली. यात सर्वाधिक चर्चा रंगली ती शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांच्या मंत्रिपदाची. पूजा चव्हाण या तरूणीच्या मृत्यूप्रकरणी मविआ सरकारच्या मंत्रिमंडळातून संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी हा मुद्दा आक्रमकपणे लावून धरल्यामुळेच संजय राठोडांना राजीनामा द्यावा लागला होता. पण नव्या सरकारमध्ये भाजपाच्या साक्षीने पुन्हा एकदा त्यांना मंत्रीपद देण्यात आले. यावरून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची टीका केली होतीच. त्या पाठोपाठ आता काँग्रेसनेही या मुद्द्यावरून भाजपावर बोचरी टीका केली.

संजय राठोड यांची मंत्रिपदी वर्णी लागेल की नाही, याबद्दल साऱ्यांनाच साशंकता होती. पण अखेर आज सकाळी त्यांच्या नावाचाही यादीत समावेश करण्यात आला. अनेकांनी या निर्णयावरून नव्या शिंदे-भाजपा सरकारवर निशाणा साधला. खुद्द भाजपाच्या चित्रा वाघ यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आणि न्यायालयीन लढाई सुरूच राहिल असं स्पष्ट केलं. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीका करण्याची संधी सोडली नाही. "अखेर भाजपासाठी संजय राठोड पवित्र झाले", अशा शीर्षकाखाली त्यांनी एक ट्वीट केले. "तब्बल एका महिन्याच्या प्रतीक्षेनंतर ‘ईडी’ सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. परंतु कालपर्यंत भाजपासाठी कलंकित असलेले संजय राठोड हे आज पवित्र झाले, त्यामुळेच त्यांचा समावेश बहुदा मंत्रिमंडळात करण्यात आला असावा", अशा बोचऱ्या शब्दात त्यांनी भाजपावर टीका केली.

दरम्यान, संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळाच्या समावेशाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचक प्रतिक्रिया दिली. "मला अतिशय आनंद आहे, मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. सर्व सक्षम मंत्री आहेत, लवकरच पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. जे विनाकारण आरोप करत आहेत त्यांना हे उत्तर आहे. खातेवाटप लवकरच केले जाईल. संजय राठोडांच्या विषयावर आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे आणि ते पुरेसे आहे", अशी सावध व सूचक प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली. त्यामुळे, आता विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक या मुद्द्यावरून सरकारला घेरणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारNana Patoleनाना पटोलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस