शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Cabinet Expansion: "अखेर भाजपासाठी संजय राठोड..."; काँग्रेसच्या नाना पटोलेंची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 21:58 IST

"ईडी’ सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला परंतु.."; वाचा पटोलेंचे ट्वीट

Sanjay Rathod Maharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी अखेर आज मंत्रिमंडळ विस्तार झाला. महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये आज भाजपाच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी शपथ घेतली. यात सर्वाधिक चर्चा रंगली ती शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांच्या मंत्रिपदाची. पूजा चव्हाण या तरूणीच्या मृत्यूप्रकरणी मविआ सरकारच्या मंत्रिमंडळातून संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी हा मुद्दा आक्रमकपणे लावून धरल्यामुळेच संजय राठोडांना राजीनामा द्यावा लागला होता. पण नव्या सरकारमध्ये भाजपाच्या साक्षीने पुन्हा एकदा त्यांना मंत्रीपद देण्यात आले. यावरून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची टीका केली होतीच. त्या पाठोपाठ आता काँग्रेसनेही या मुद्द्यावरून भाजपावर बोचरी टीका केली.

संजय राठोड यांची मंत्रिपदी वर्णी लागेल की नाही, याबद्दल साऱ्यांनाच साशंकता होती. पण अखेर आज सकाळी त्यांच्या नावाचाही यादीत समावेश करण्यात आला. अनेकांनी या निर्णयावरून नव्या शिंदे-भाजपा सरकारवर निशाणा साधला. खुद्द भाजपाच्या चित्रा वाघ यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आणि न्यायालयीन लढाई सुरूच राहिल असं स्पष्ट केलं. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीका करण्याची संधी सोडली नाही. "अखेर भाजपासाठी संजय राठोड पवित्र झाले", अशा शीर्षकाखाली त्यांनी एक ट्वीट केले. "तब्बल एका महिन्याच्या प्रतीक्षेनंतर ‘ईडी’ सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. परंतु कालपर्यंत भाजपासाठी कलंकित असलेले संजय राठोड हे आज पवित्र झाले, त्यामुळेच त्यांचा समावेश बहुदा मंत्रिमंडळात करण्यात आला असावा", अशा बोचऱ्या शब्दात त्यांनी भाजपावर टीका केली.

दरम्यान, संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळाच्या समावेशाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचक प्रतिक्रिया दिली. "मला अतिशय आनंद आहे, मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. सर्व सक्षम मंत्री आहेत, लवकरच पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. जे विनाकारण आरोप करत आहेत त्यांना हे उत्तर आहे. खातेवाटप लवकरच केले जाईल. संजय राठोडांच्या विषयावर आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे आणि ते पुरेसे आहे", अशी सावध व सूचक प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली. त्यामुळे, आता विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक या मुद्द्यावरून सरकारला घेरणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारNana Patoleनाना पटोलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस