शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

"प्रचंड अपेक्षा असताना कुणाचा भ्रमनिरास झाला त्या कहाण्या ८-१० दिवसात समोर येतील"; राष्ट्रवादीचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 19:04 IST

मंत्रिमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

Jayant Patil on Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज अखेर मार्गी लागला. आज सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा पार पडला. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाचे ९ आणि शिंदे गटाचे ९ अशी एकूण १८ आमदारांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिली. मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा पावसाळी अधिवेशन पूर्ण झाल्यानंतर करण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. भाजपा आणि शिंदे गटातील अनेक आमदारांना अपेक्षा असूनही मंत्रिपदे मिळाली नाहीत. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला टोला लगावला.

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे सहकारी निवडले आहेत त्यांनी चांगलं काम करावं. आम्ही महाराष्ट्रात विरोधी पक्ष म्हणून उत्तम काम करू आणि जनतेचे प्रश्न विरोधात बसून सोडवू. ज्यांच्या विरोधात संघर्ष केला, त्यांनाच बरोबर घेऊन जाणं हे सोपं काम नाही. आज पुन्हा एकदा भाजपाने ते करुन दाखवलं. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मंत्रीमंडळात कुणाला घ्यायचं आणि कुणाला नाही हा त्यांचा चॉईस असतो मात्र बघणार्‍यांना ते मंत्रीमंडळ कसं दिसतं हा जनतेचा चॉईस आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सहकारी निवडून आपली कामगिरी बजावली आहे, आता जे सहकारी आहेत त्यांच्यात काय-काय अभाव आहे. कोणत्या प्रकारचे, कोणत्या पध्दतीचे, कोण बाहेर राहिले आणि कुणाच्या प्रचंड अपेक्षा असताना भ्रमनिरास झाला आहे याच्या कहाण्या येत्या आठ-दहा दिवसात समोर येतील", असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

आज झालेल्या विस्तारात भाजपाकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, विजयकुमार गावित, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, सुरेश खाडे, मंगलप्रभात लोढा यांना संधी देण्यात आली. तर शिंदे गटाकडून उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभुराज देसाई, अब्दुल सत्तार, संजय राठोड, तानाजी सावंत, संदीपान भुमरे, दीपक केसरकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ३९ दिवसानंतर मंत्रीमंडळ अस्तित्वात आले आहे. त्यामुळे आता जनतेच्या प्रश्नाकडे सरकारने लक्ष द्यावे, असेही जयंत पाटील म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळJayant Patilजयंत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस