शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

राज्य मंत्रिमंडळात समतोल साधणार; 'या' ५ जणांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 08:25 IST

शिंदे-भाजपा युतीत अपक्ष आणि इतर घटक पक्षांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न आहेत. त्यामुळे सर्व आमदारांना खुश ठेवण्यासोबतच मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई यासारख्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मंत्रिपदाच्या यादीत काही नवीन नावे दिसतील. 

मुंबई - राज्यात २ आठवड्यांच्या पॉलिटिकल ड्रामानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सरकार स्थापन होऊन १५ दिवसांहून अधिक दिवस गेले तरीही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. आमदारांच्या अपात्रेबाबत याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्याचा निर्णय झाल्यानंतर कॅबिनेट विस्तार होईल असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

शिंदे-फडणवीस सरकारने विधानसभेत १६४ मतांनी बहुमत ठराव जिंकला. यावेळी विरोधकांच्या बाजूने केवळ ९९ सदस्यांनी मतदान केले. आता मंत्रिमंडळ विस्ताराचं आव्हान नवीन सरकारपुढे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळात भाजपाला २८ तर एकनाथ शिंदे गटाला १५ मंत्रिपदे मिळणार आहेत. भाजपाच्या २८ मध्ये उपमुख्यमंत्र्यासह २० कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश असेल तर ८ राज्यमंत्रिपदे असतील. तर शिंदे गटात मुख्यमंत्र्यासह ११ कॅबिनेट मंत्रिपदे आणि ४ राज्यमंत्रिपदे असतील. फ्री प्रेस जनरलनं याबाबत वृत्त दिले आहे.

रिपोर्टनुसार, ११ जुलै रोजी मंत्रिपदांची यादी जाहीर होणार होती. परंतु त्यादिवशी आमदारांच्या अपात्रेबद्दल याचिकेवर सुनावणी होणार होती. त्यानंतर या यादीची घोषणा राष्ट्रपती निवडणुकीपर्यंत पुढे ढकलण्यात आली. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देऊन भाजपानं धक्कातंत्र अवलंबलं. आता गृह, अर्थ, जलसंपदा खात्यासाठी भाजपाकडून दबाव वाढला आहे. त्याचसोबत शिंदे-भाजपा युतीत अपक्ष आणि इतर घटक पक्षांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न आहेत. त्यामुळे सर्व आमदारांना खुश ठेवण्यासोबतच मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई यासारख्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मंत्रिपदाच्या यादीत काही नवीन नावे दिसतील. 

मंत्रिमंडळ वाटपात समतोल साधण्यासाठी ५ जणांवर जबाबदारी? 

चंद्रकांत पाटील : भाजपराज्य भाजपचे प्रमुख आणि २०१४ च्या फडणवीस सरकारमधील माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री, चंद्रकांत पाटील हे फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. मूळचे कोल्हापुरचे आणि पुण्याचे आमदार असलेले मंत्रिमंडळात जातीय समीकरणावर भाजपचे लक्ष असेल. पाटील यांना खरोखरच मंत्रिमंडळात स्थान मिळाले, तर त्यांना ‘एक व्यक्ती, एक पद’ या धोरणानुसार महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्षपद सोडावं लागेल. 

संजय कुटे : भाजपजळगावचे आमदार, कुटे हे फडणवीस यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात, तसेच प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सुधीर मुनगंटीवार इत्यादी नेत्यांसह कुटे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडात मोलाची भूमिका बजावली होती, शिंदे आणि त्यांच्या आमदारांसोबत सुरतच्या हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. रणनीती आणि पुढील व्यूहरचना तयार करणे हे काम त्यांनी केले. त्यानंतर ते बंडखोर आमदारांसोबत गुवाहाटीला गेले. ते भाजपच्या कोट्यातील प्रमुख मंत्र्यांपैकी ते एक असण्याची शक्यता आहे.

हितेंद्र ठाकूर : बहुजन विकास आघाडीपालघर जिल्ह्यातील वसई मतदारसंघातील आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडे वसई, नालासोपारा आणि बोईसरमधून तीन आमदार आहेत. माजी काँग्रेस सदस्य, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे मानले जातात. बविआने 2019 च्या विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीला पाठिंबा देण्याचे वचन दिले होते. नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांमध्ये बविआचे महत्त्व दिसून आले, जिथे अटीतटीची स्पर्धा असते तिथे प्रत्येक मताला महत्त्व असते. राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे आणि भाजपचे प्रवीण दरेकर यांनी पाठिंबा देण्यासाठी त्यांच्याशी स्वतंत्र बंद दाराआड बैठका घेतल्या होत्या.

याशिवाय, वसई-विरार महानगरपालिका (VVMC) निवडणुका जवळ आल्या आहेत, जिथे बविआने गेल्या वेळी ११५ पैकी १०९ प्रभागात विजय मिळवला होता, हितेंद्र ठाकूर किंवा त्यांचा मुलगा क्षितीज यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने ते स्थानिक निवडणुकात त्यास मदत होईल असं बोललं जात आहे. 

रवी राणाअमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेले अपक्ष आमदार राणा आणि त्यांची पत्नी नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा वाचण्याची धमकी दिल्याने प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यानंतर या जोडप्याला अटक करण्यात आली आणि आठवडाभरानंतर ते जामिनावर बाहेर आले. रवी राणा हे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर खासकरून गेल्या अडीच वर्षांत जोरदार टीका करत आहेत

रवी राणा यांनी २००९ मध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार म्हणून विजय मिळवला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर, त्यांनी भाजपला पाठिंबा दिला, परंतु मविआने राजकीय समीकरणे बदलल्यानंतर ते तटस्थ राहिले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या बाजूने मतदान केले. भाजप पुन्हा सत्तेत आल्याने ते मंत्र्यांच्या यादीत असतील का हे पाहणं गरजेचे आहे. 

बच्चू कडू : प्रहार जनशक्ती पार्टीमाजी जलसंपदा, शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारमधील अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री, कडू हे राज्यातील २०१९ च्या राजकीय समीकरणात मविआला पाठिंबा देणारे पहिले होते. चार वेळा आमदार राहिलेले कडू हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक परिचित चेहरा आहेत आणि यापूर्वी राज्यमंत्री असल्याने ते अपक्षांच्या मंत्रिमंडळाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा