शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

ठाकरे सरकारचा मराठीबाणा! मराठी भाषा भवनासाठी १०० कोटी, प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकांचं गाव अन् बरंच काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 15:32 IST

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत राज्याचा २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प सादर केला.

मुंबई-राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत राज्याचा २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. यात शेती, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रांसाठी विविध घोषणा करण्यात आल्या. पण त्यासोबतच मराठी भाषा संवर्धनासाठीही ठाकरे सरकारनं काही महत्वाच्या घोषणा यावेळी केल्या आहेत. 

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मुंबईत १०० कोटी रुपये खर्चून मराठी भाषा भवन उभारलं जाणार आहे. यासाठी जागा निश्चित झाली असून येत्या २ एप्रिल रोजी सरकारच्यावतीनं त्यासाठीचं भूमिपूजन देखील केलं जाणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. तसंच राज्यातील सर्व दुकानांवरील फलक देवनागरी लिपीतच असतील असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं. 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून त्यासाठीचे १ लाखाहून अधिक पोस्टकार्ड केंद्र सरकारला पाठविण्यात आले आहेत. केंद्र सरकार याचा विचार करुन सकारात्मक प्रतिसाद देईल अशी आशा असल्याचं अजित पवार म्हणाले. 

नवी मुंबईत मराठी भाषा संवर्धन केंद्र उभारण्यात येणार असल्याचंही अजित पवार म्हणाले. तसंच प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकांचं गाव उभारून वाचन संस्कृती वाढावी आणि रुजावी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. 

मराठी भाषेसाठी कोणत्या घोषणा?- मुंबईत मराठी भाषा भवन उभारणार, त्यासाठी १०० कोटींचा निधी- येत्या २ एप्रिलला मराठी भाषा भवनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम- प्रत्येक जिल्ह्या पुस्तकांचं गावं उभारणार - वाचन संस्कृती वाढावी आणि रुजावी यासाठी प्रयत्न केले जाणार- नवी मुंबईत मराठी भाषा संवर्धन केंद्र उभारणार- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्राकडे पाठपुरावा, यासाठीची १ लाखाहून अधिक पोस्टकार्ड केंद्राला पाठविण्यात आलीत. 

 

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट २०२२Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसmarathiमराठी