शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

महाराष्ट्र बजेट 2019: निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणांचा वर्षाव !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 05:10 IST

वंचित घटकांसाठी कोट्यवधी; संजय गांधी निराधार व ‘श्रावण बाळ’चे अनुदान वाढले

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग हाती घेत, राज्य सरकारने मंगळवारी सादर केलेल्या २०१९-२० च्या अर्थसंकल्पात ओबीसी, धनगर, अल्पसंख्यांक आदी समाजघटकांच्या कल्याणासाठी भरीव आर्थिक तरतूद केली. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पात लोककल्याणकारी घोषणांचा पाऊस पाडला.समाजातील शेवटच्या माणसांसाठी असलेल्या संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेतील मानधन दरमहा ६०० वरून एक हजार रुपये करण्यात येणार आहे. धनगर समाजाच्या कल्याणासाठी एक हजार कोटी रुपये, इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी ७०० कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. अल्पसंख्यांक महिला व युवकांच्या रोजगारनिर्मितीसाठीह १०० कोटी रुपयांची तरतूद असून, मालेगाव (जि.नाशिक) येथे नवे सरकारी आयटीआय सुरू करण्यात येणार आहे. त्यात १० अभ्यासक्रम असतील व प्रवेश क्षमता ४६० असेल.धनगर समाजासाठी १ हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली असून, आदिवासींसाठीच्या तरतुदींना अजिबात धक्का लावला जाणार नाही, अशी ग्वाही मुनगंटीवार यांनी दिली. ओबीसींचे कल्याण समोर ठेवून, इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळास २०० कोटी रुपये देण्यात आले.या प्रवर्गातील मुलामुलींसाठी प्रत्येकी १८ वसतिगृहे उभारण्यासाठी २०० कोटी रुपये ठेवले आहेत. पाचवी ते दहावीतील ओबीसी मुलींना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने दरमहा ६० रुपये तर इयत्ता आठवी ते दहावीच्या मुलींना दरमहा १०० रुपये शिष्यवत्ती दिली जाणार असून त्याचा फायदा २ लाख २० हजार विद्यार्थीनींना मिळेल.आदिवासी स्तनदा व गरोदर मातांसाठी आठवड्यातून सहावेळा चौरस आहारासाठी १४० कोटी रुपये, नामांकित शाळांमध्ये आदिवासी मुलांच्या प्रवेशासाठी ३५० कोटी, शासकीय वसतिगृहांमध्ये मोफत निवास, भोजन व इतर शैक्षणिक साहित्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.सामाजिक न्याय, विजाभज, महिला व बालविकास आणि आदिवासी विकास विभागांतर्गतच्या अनुदानित शिक्षण संस्थांमधील परिपोषण आहारापोटी देण्यात येणाऱ्या रकमेत ९०० रुपयांवरून १५०० रु.इतकी वाढ. एचआयव्हीबाधित निवासी विद्याथ्यांचे अनुदान ९९० रुपयांवरुन १६५० करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अर्थसंकल्पातील महत्त्वाची आकडेवारी20,293 कोटींची तूट 12,697 कोटी सिंचन16,000 कोटी बांधकाम विभागगोपीनाथ मुंडे योजनेची व्याप्ती वाढविलीशेतकऱ्यांसाठी भरीव तरतुदीइयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत राज्य व विभागातून सर्वप्रथम येणाऱ्या ओबीसी विद्यार्थी, विद्यार्थिनींना अनुक्रमे एक लाख व ५१ हजार रुपये रोख बक्षीस दिले जाणार आहे.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी 150 कोटी.वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली या दारूबंदी असलेल्या जिल्ह्यांमध्ये व्यसनमुक्ती कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी 50 कोटी.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम राबविण्यासाठी 100कोटी.

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019