शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 15:53 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: हा विरोधकांचा खोटारडेपणा आहे. ते हरले आहेत. परंतु, पराभव स्वीकारत नाहीत. त्यांनी त्यांचा पराभव स्वीकारावा आणि आत्मचिंतन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हे सर्वांनाच धक्कादायक होते. महाविकास आघाडीचे नेते अद्यापही त्यातून सावरताना दिसत नाहीत. तर दुसरीकडे महायुतीचे मुख्यमंत्री कोण होणार, यावर घोडे अडलेले दिसत आहे. नवे सरकार कधी स्थापन होणार, मंत्रिमंडळ कसे असणार, कोणाकडे कोणती खाती जाणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यातच महायुतीला मिळालेल्या एवढ्या मोठ्या यशानंतर आता विरोधकांनी ईव्हीएमवर संशय घेतला आहे. तसेच अनेक ठिकाणी तफावत असल्याचे दावेही केले आहेत. याबाबत भाजपाकडून आता थेट प्रतिक्रिया देण्यात आली आहे. 

सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा करून, हॅक करून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जिंकल्याचा आरोप विरोधक सातत्याने करताना दिसत आहेत. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांनी तशी तयारी करण्याच्या सूचना दिल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गटाकडूनही याबाबत विचार केला जात आहे. ईव्हीएमविरोधात मोठे आंदोलन उभारण्याच्या हालचाली विरोधकांकडून सुरू आहेत. या सगळ्यावर भाजपाचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य करताना विरोधकांना सुनावले आहे. 

लोकसभेतही तुम्ही मोठे यश मिळवले तेव्हा ईव्हीएम चांगले होते का?

नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक काँग्रेसने जिंकली, तिथे ईव्हीएम चांगले होते का? लोकसभेतही तुम्ही मोठे यश मिळवले तेव्हा ईव्हीएम चांगले होते का? जर ईव्हीएम हॅक करून मते घेता आली असती तर आम्ही नांदेड लोकसभेतही तशी मते घेतली नसती का? हा विरोधकांचा खोटारडेपणा आहे. ते हरले आहेत. परंतु, पराभव स्वीकारत नाहीत. त्यांनी त्यांचा पराभव स्वीकारावा आणि आत्मचिंतन करावे, असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आम्ही आत्मचिंतन केले. त्या पराभवातून आम्ही शिकलो. लोकसभा निवडणुकीत आम्हाला जे अपयश आले, त्यानंतर आम्ही काही नव्या गोष्टी शिकलो. त्या पराभवानंतर आम्ही आत्मचिंतन केले. पुढे काय करायचे ते ठरले. रणनीती ठरवली. आम्ही प्रत्येक बूथवर जाऊन काम केले. मतदान केंद्रांवर जाऊन जनतेला भेटलो. त्यानंतर मतदानाचे प्रमाण वाढले. विरोधकांना चार दिवस त्यांना झोप लागणार नाही. जेव्हा त्यांची झोप होईल, त्यानंतर त्यांचे डोक शांत राहील, असा खोचक टोला बावनकुळे यांनी लगावला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाEVM Machineईव्हीएम मशीन