शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 15:53 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: हा विरोधकांचा खोटारडेपणा आहे. ते हरले आहेत. परंतु, पराभव स्वीकारत नाहीत. त्यांनी त्यांचा पराभव स्वीकारावा आणि आत्मचिंतन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हे सर्वांनाच धक्कादायक होते. महाविकास आघाडीचे नेते अद्यापही त्यातून सावरताना दिसत नाहीत. तर दुसरीकडे महायुतीचे मुख्यमंत्री कोण होणार, यावर घोडे अडलेले दिसत आहे. नवे सरकार कधी स्थापन होणार, मंत्रिमंडळ कसे असणार, कोणाकडे कोणती खाती जाणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यातच महायुतीला मिळालेल्या एवढ्या मोठ्या यशानंतर आता विरोधकांनी ईव्हीएमवर संशय घेतला आहे. तसेच अनेक ठिकाणी तफावत असल्याचे दावेही केले आहेत. याबाबत भाजपाकडून आता थेट प्रतिक्रिया देण्यात आली आहे. 

सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा करून, हॅक करून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जिंकल्याचा आरोप विरोधक सातत्याने करताना दिसत आहेत. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांनी तशी तयारी करण्याच्या सूचना दिल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गटाकडूनही याबाबत विचार केला जात आहे. ईव्हीएमविरोधात मोठे आंदोलन उभारण्याच्या हालचाली विरोधकांकडून सुरू आहेत. या सगळ्यावर भाजपाचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य करताना विरोधकांना सुनावले आहे. 

लोकसभेतही तुम्ही मोठे यश मिळवले तेव्हा ईव्हीएम चांगले होते का?

नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक काँग्रेसने जिंकली, तिथे ईव्हीएम चांगले होते का? लोकसभेतही तुम्ही मोठे यश मिळवले तेव्हा ईव्हीएम चांगले होते का? जर ईव्हीएम हॅक करून मते घेता आली असती तर आम्ही नांदेड लोकसभेतही तशी मते घेतली नसती का? हा विरोधकांचा खोटारडेपणा आहे. ते हरले आहेत. परंतु, पराभव स्वीकारत नाहीत. त्यांनी त्यांचा पराभव स्वीकारावा आणि आत्मचिंतन करावे, असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आम्ही आत्मचिंतन केले. त्या पराभवातून आम्ही शिकलो. लोकसभा निवडणुकीत आम्हाला जे अपयश आले, त्यानंतर आम्ही काही नव्या गोष्टी शिकलो. त्या पराभवानंतर आम्ही आत्मचिंतन केले. पुढे काय करायचे ते ठरले. रणनीती ठरवली. आम्ही प्रत्येक बूथवर जाऊन काम केले. मतदान केंद्रांवर जाऊन जनतेला भेटलो. त्यानंतर मतदानाचे प्रमाण वाढले. विरोधकांना चार दिवस त्यांना झोप लागणार नाही. जेव्हा त्यांची झोप होईल, त्यानंतर त्यांचे डोक शांत राहील, असा खोचक टोला बावनकुळे यांनी लगावला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाEVM Machineईव्हीएम मशीन