शहरं
Join us  
Trending Stories
1
अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
3
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
4
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
5
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
7
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
8
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
9
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
10
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
11
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
12
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
13
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
14
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?
15
कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'या' चार मराठी सिनेमांची झाली निवड, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
16
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
17
झारखंडच्या बोकारोमध्ये चकमक! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
18
सरकारी टेलिकॉम कंपनी MTNL नं ₹८,३४६ कोटींचं कर्ज केलं डिफॉल्ट; 'या' ७ बँकांकडून घेतलंय लोन
19
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
20
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध

“फडणवीसांनी मोठे काम काय केले? पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, फोडायला नाही”: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 18:04 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले. पक्ष फोडून सत्ता मिळवणे ही लोकशाही आहे का? अशी विचारणा शरद पवार यांनी केली आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारसभा, बैठका यांना वेग येत आहे. विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते आमचेच सरकार येणार असल्याचा दावा करताना पाहायला मिळत आहेत. शरद पवार राज्यभर दौरा करून विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. या प्रचारसभांमध्ये भाजपा महायुतीवर टीका करताना महाविकास आघाडीचे सरकार आणण्याचे आवाहन करत आहेत. 

एका प्रचारसभेत बोलताना, देशात सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. ४०० पारचा नारा उद्ध्वस्त करायचे ठरवले. संविधान बदलाचा डाव उद्ध्वस्थ करण्यासाठी एकत्र आले पाहिजे होते. ज्या महाराष्ट्रात काँग्रेसचा एक खासदार, राष्ट्रवादीचे ४ खासदार होते. तुम्ही आम्हाला ४८ पैकी ३१ खासदार दिले, त्यात राष्ट्रवादीचे ८ खासदार होते. लोकसभेच्या निकालानंतर यांची चिंता वाढली. नवीन योजना आणल्या. विधानसभा निवडणुकीच्या त्यातील काही योजना राबवल्या. महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत. महाराष्ट्रात अनेक बहिणींचा पत्ता लागत नाही. महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात ११०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक वाया गेले, शेतकऱ्याला कर्ज फेडता आले नाही. पीकाला भाव मिळाला नाही. भाजपाला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही, या शब्दांत शरद पवार यांनी निशाणा साधला.

पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, फोडायला नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ३० ते ४० आमदार गोळा केले. गुवाहाटीला जाऊन बसले. ही एक व्यक्ती देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होती. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात होती. असे असतानाही त्यांनी पक्ष फोडण्याची भूमिका घेतली. लोकांना हे पटले नाही. देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यात मोठे काम काय केले? असे विचारल्यानंतर पक्ष फोडला म्हणून सांगतात. पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही, अशी बोचरी टीका शरद पवार यांनी केली. 

दरम्यान, उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले. पक्ष फोडून सत्ता मिळवणे ही लोकशाही आहे का? आता भाजप आणि आमच्यातील फुटून गेलेल्या लोकांचे राज्य आहे. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवारांसह अनेक जण मंत्री होते, असे शरद पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसrahuri-acराहुरीnorth maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक