शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
"प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
4
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
5
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
6
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
7
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
8
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
9
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
10
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
11
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
12
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
13
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
14
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
15
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
16
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
17
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
18
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
19
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
20
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल

घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना

By दीपक भातुसे | Updated: October 26, 2024 06:01 IST

मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा फेटाळली

दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई/नवी दिल्ली: महाविकास आघाडीत सुरू असलेला वाद शुक्रवारीही शमला नाही. बुधवारी तीनही पक्षांना प्रत्येकी ८५ जागांच्या वाटपाची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी राहिलेल्या जागांचा वाद संपेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ६ जागांवरील तिढा कायम आहे. एकीकडे हा घोळ सुरू असताना तिकडे दिल्लीत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी मविआतील ९०-९०-९० चा नव्या फॉर्म्युल्याची घोषणा केली. तीन पक्ष मिळून २७० जागा लढवणार असून उरलेल्या १८ जागा लहान मित्र पक्षांना देऊन त्यांचे समाधान केले जाईल, असे थोरात यांनी सांगितले.

काँग्रेस, उद्धवसेना आणि शरद पवार गट या पक्षातील मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरूच आहेत. अशातच उद्धव सेनेने परस्पर उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरेंना पत्र लिहून नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, ज्या जागांवर मविआत वाद आहे तिथे मैत्रीपूर्ण लढत होणार अशी चर्चा होती. मात्र काँग्रेस नेते पटोले आणि थोरात यांनी ही चर्चा फेटाळली. आम्ही आघाडी म्हणूनच लढणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.

काही जागांची अदलाबदल होण्याचे संकेत

  • एकीकडे काँग्रेसचे नेते मातोश्रीवर जात असताना शुक्रवारी उद्धव सेनेचे नेते संजय राऊत यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे शरद पवारांची भेट घेतली. 
  • या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना उद्धव सेनेते जाहीर केलेल्या उमेदवार यादीत थोडा बदल होऊ शकतो, नावात किंवा जागेत बदल होऊ शकतो असे सांगत काँग्रेस -राष्ट्रवादी आणि आमच्यात एक-दोन जागांवर पुन्हा चर्चा होऊ शकतो, असे 
  • राऊत म्हणाले. 
  • काही जागांची अदलाबदल होईल, काँग्रेस १०० च्या वर जागा लढवेल, असे विजय वड्डेटीवार यांनी सांगितले.

कोणत्या जागांवर तिढा आणि कशासाठी?

  • वर्सोवा, भायखळा, रामटेक, परांडा, श्रीगोंदा, सांगोला या जागांवरून वाद आहे.
  • वर्सोवा व भायखळ्याची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.
  • रामटेकबाबत काँग्रेसचा आग्रह कायम आहे. उद्धवसेनेने तेथे विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली आहे. तेथे माजी मंत्री राजेंद्र मुळीक यांना निवडणूक लढवायची आहे.

नाना पटोलेंचे पत्र आणि ठाकरेंची नाराजी

  1. मविआत ज्या जागांवर तिढा कायम आहे अशा जागांवर उद्धव सेनेने परस्पर उमेदवार जाहीर करून एबी फॉर्मही दिल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त करणारे पत्र उद्धव ठाकरेंना लिहिले आहे. मात्र, पटोले यांच्या या पत्रामुळे उद्धव ठाकरे नाराज असल्याचे समजते. 
  2. त्यामुळे वादाच्या जागांबाबत चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर येणाऱ्या काँग्रेस नेत्यांना उद्धव यांच्या नाराजीचा सामना करावा लागत असल्याचे समजते. उद्धव ठाकरे हे काही जागा सोडायला आधी तयार झालेही होते, मात्र पटोले यांच्या या पत्रानंतर ते आता जागा न सोडण्यावर ठाम असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोले