शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना

By दीपक भातुसे | Updated: October 26, 2024 06:01 IST

मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा फेटाळली

दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई/नवी दिल्ली: महाविकास आघाडीत सुरू असलेला वाद शुक्रवारीही शमला नाही. बुधवारी तीनही पक्षांना प्रत्येकी ८५ जागांच्या वाटपाची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी राहिलेल्या जागांचा वाद संपेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ६ जागांवरील तिढा कायम आहे. एकीकडे हा घोळ सुरू असताना तिकडे दिल्लीत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी मविआतील ९०-९०-९० चा नव्या फॉर्म्युल्याची घोषणा केली. तीन पक्ष मिळून २७० जागा लढवणार असून उरलेल्या १८ जागा लहान मित्र पक्षांना देऊन त्यांचे समाधान केले जाईल, असे थोरात यांनी सांगितले.

काँग्रेस, उद्धवसेना आणि शरद पवार गट या पक्षातील मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरूच आहेत. अशातच उद्धव सेनेने परस्पर उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरेंना पत्र लिहून नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, ज्या जागांवर मविआत वाद आहे तिथे मैत्रीपूर्ण लढत होणार अशी चर्चा होती. मात्र काँग्रेस नेते पटोले आणि थोरात यांनी ही चर्चा फेटाळली. आम्ही आघाडी म्हणूनच लढणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.

काही जागांची अदलाबदल होण्याचे संकेत

  • एकीकडे काँग्रेसचे नेते मातोश्रीवर जात असताना शुक्रवारी उद्धव सेनेचे नेते संजय राऊत यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे शरद पवारांची भेट घेतली. 
  • या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना उद्धव सेनेते जाहीर केलेल्या उमेदवार यादीत थोडा बदल होऊ शकतो, नावात किंवा जागेत बदल होऊ शकतो असे सांगत काँग्रेस -राष्ट्रवादी आणि आमच्यात एक-दोन जागांवर पुन्हा चर्चा होऊ शकतो, असे 
  • राऊत म्हणाले. 
  • काही जागांची अदलाबदल होईल, काँग्रेस १०० च्या वर जागा लढवेल, असे विजय वड्डेटीवार यांनी सांगितले.

कोणत्या जागांवर तिढा आणि कशासाठी?

  • वर्सोवा, भायखळा, रामटेक, परांडा, श्रीगोंदा, सांगोला या जागांवरून वाद आहे.
  • वर्सोवा व भायखळ्याची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.
  • रामटेकबाबत काँग्रेसचा आग्रह कायम आहे. उद्धवसेनेने तेथे विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली आहे. तेथे माजी मंत्री राजेंद्र मुळीक यांना निवडणूक लढवायची आहे.

नाना पटोलेंचे पत्र आणि ठाकरेंची नाराजी

  1. मविआत ज्या जागांवर तिढा कायम आहे अशा जागांवर उद्धव सेनेने परस्पर उमेदवार जाहीर करून एबी फॉर्मही दिल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त करणारे पत्र उद्धव ठाकरेंना लिहिले आहे. मात्र, पटोले यांच्या या पत्रामुळे उद्धव ठाकरे नाराज असल्याचे समजते. 
  2. त्यामुळे वादाच्या जागांबाबत चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर येणाऱ्या काँग्रेस नेत्यांना उद्धव यांच्या नाराजीचा सामना करावा लागत असल्याचे समजते. उद्धव ठाकरे हे काही जागा सोडायला आधी तयार झालेही होते, मात्र पटोले यांच्या या पत्रानंतर ते आता जागा न सोडण्यावर ठाम असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोले