शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

“महाभ्रष्ट भाजपायुती सरकारला सत्तेतून खाली खेचणे हेच मविआचे ध्येय”; नाना पटोलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 16:14 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: नाना पटोले यांनी साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नाना पटोले यांनी भाजपासह महायुतीवर जोरदार टीका केली.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपा सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली, शेतकरी उद्ध्वस्त झाला, महिला सुरक्षित नाहीत पण भाजपा महायुती सरकारला त्याची काळजी नाही. गरिबांना हक्काची जमीन देण्यापेक्षा भ्रष्ट भाजपा सरकारने अदानी, अंबानीला जमीन देण्यास प्राधान्य दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान संपवण्याचे काम भाजपा सरकार करत आहे. राज्यात शासकीय व निमशासकीय कर्माचाऱ्यांची भरती आता ठेकेदारी पद्धतीने सुरु करून मागासवर्गीयांचे नोकऱ्यातील आरक्षण संपवले जात आहे. श्रीमंतापेक्षा गरिबांना जास्त कर द्यावा लागतो, हे सर्व पाप भाजपा सरकारचे आहे. महाभ्रष्ट भाजपायुती सरकारला सत्तेतून खाली खेचणे हेच महाविकास आघाडीचे ध्येय आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या रॅलीत हजारो लोक उपस्थित होते. नाना पटोले यांनी चारभट्टीचा बजरंगबली आणि गोपीपुरी बाबाच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतले तसेच आईचे आशीर्वाद घेतले. अर्ज दाखल करण्यास जाण्याआधी पत्नीने नाना पटोले यांचे औक्षण केले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर एमपीएससी मार्फत सर्व जागा भरल्या जातील तसेच परिक्षेसाठी नाममात्र शुल्क आकारले जाईल. परिक्षेच्या नावाखाली विद्यार्थ्यांना लुटले जाणार नाही. महिलांना भाजपा सरकार जी मदत करत आहे त्याच्यापेक्षा जास्त मदत देऊ. महागाई कमी करण्याचा प्रयत्न करु. छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराला गाडणाऱ्या भाजपा महायुती सरकाला गाडणे हाच आमचा उद्देश आहे. या सरकारला सत्तेतून खाली खेचून मविआचे सरकार आणण्याचे ध्येय आहे, असे सांगत नाना पटोले यांनी साकोलीतून रणशिंग फुंकले.

भाजपाच्या अत्याचारी सरकारला सत्तेतून खाली खेचावे

महागाईने गृहिणींचे प्रचंड हाल होत असताना केवळ १५०० रुपये देऊन भाजपा सरकार मदत केल्याचे सोपस्कार पार पाडत आहे. केवळ पैसे देऊन महिलांचा सन्मान होत नाही. काँग्रेस सरकारने वडिलांच्या संपत्तीत मुलीचा हिस्सा देण्याचा कायदा करुन महिलांचा सन्मान केला. राज्यातील ६७ हजार महिला बेपत्ता आहेत, त्यावर सरकारला प्रश्न विचारला तर सरकार उत्तर देऊ शकले नाही, महिलांवर अन्याय, अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. आता राज्यातील भगिनींनीच दुर्गा अवतार घेऊन भाजपाच्या अत्याचारी सरकारला सत्तेतून खाली खेचावे, असे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे.  

दरम्यान, बदलापुरात भाजपाच्या शाळेत ३-४ वर्षांच्या लहान मुलींवर अत्याचार करण्यात आले, लोकांनी रस्त्यावर उतरून आवाज उठवला तरीही शाळेच्या संचालकांवर कारवाई केली नाही. कोर्टाने झापल्यानंतर शाळेच्या संचालकांना अटक केली. भाजपा युतीचे सरकार महिलांना न्याय देऊ शकले नाही. मविआचे सरकार आल्यावर महिला सक्षमिकरणावरही भर देऊ, असे नाना पटोले म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sakoli-acसाकोलीcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेNana Patoleनाना पटोलेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी