शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मोठा ट्विस्ट! देवेंद्र फडणवीस यांनी घेतली विनोद पाटील यांची भेट; चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 20:28 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मराठा समाजाला आरक्षण द्यायचे प्रामाणिक प्रयत्न केले. आरक्षण दिले, टिकवले. मराठा समाजाच्या विकासासाठी प्रयत्न केला, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: एकीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पाडापाडीचे धोरण जवळपास निश्चित केल्याचे सांगितले जात आहे. तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके हेही आक्रमक आहेत. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही जरांगे फॅक्टर प्रभावी ठरणार असल्याची चर्चा आहे. जरांगे फॅक्टरचा प्रभाव कमी करण्यासाठी महायुतीकडून अनेकविध प्रयत्न होताना पाहायला मिळत आहेत. यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची भेट घेतली. या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे. 

मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विनोद पाटील यांच्या भेटीबाबत माहिती दिली. विनोद पाटील आमचे मित्र आहेत. मराठा समाजाला आरक्षण द्यायचा विषय होता, त्यावेळेस विनोद पाटील यांची विशेष मदत झाली. मराठा समाजाला आरक्षण कसे द्यायचे, कसे टिकवायचे याबाबत त्यांची मदत झाली. उच्च आणि सर्वोच्च न्यायालाय याचिका असताना विनोद पाटील यांनी मदत केली. त्यामुळे संभाजीनगरमध्ये असताना त्यांची भेट घ्यायला आलो. ही राजकीय भेट नाही तर कौटुंबिक भेट आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

मराठा समाजाच्या विकासासाठी प्रयत्न केला

भाजपाचे उमेदवार पाडण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील अनेकदा देतात. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, आमचा दृष्टीकोन स्पष्ट आहे. संधी मिळाली, त्यावेळेस मराठा समाजाच्या विकासासाठी प्रयत्न केला. त्यांनी भूमिका मांडल्यानंतरच आमची भूमिका मांडू. आम्ही आमचे काम करत आहोत. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे प्रामाणिक प्रयत्न केले. आरक्षण दिले आणि टिकवले. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून एक लाख तरुणांना रोजगार दिले. सारथीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेसाठी मदत केली. त्यामुळे कुणी किती टीका केली, वाद केला तरी त्याकडे दुर्लक्ष करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आमच्या समोर जे लोक आहे, त्यांनी मराठा समाजासाठी काही केले नाही. ४० वर्षे जे सत्तेत होते, त्यांनी कधी मराठा आरक्षणाच्या विषयाला हात घातला नाही, कधीही प्रयत्न केला नाही. उलट मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही, असे ते म्हणाले. राजकारणात एक निवडणूक कुणाचे भविष्य ठरवत नाही. योग्य वेळी योग्य गोष्टी घडतात. विनोद पाटील यांच्यामध्ये नेतृत्व गुण आहेत. त्यांनी सातत्याने राजकीय पेक्षा सामाजिक भूमिका स्वीकारली. जर पूर्णपणे राजकीय भूमिका स्वीकारली त्यावेळी चित्र वेगळे असेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMahayutiमहायुती