शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 16:03 IST

Maharashtra News: महाराष्ट्रातील 288 पैकी महायुतीने 230+ जागांवर विजय मिळवला आहे, तर महाविकास आघाडीला फक्त 47 जागा मिळाल्या.

Maharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाने सर्वांनाच चकीत केले आहे. दरम्यान, या निकालाचे परिणाम केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता, इतर राज्यांच्या निवडणुकांमध्येही दिसू शकतात. या निकालांचा परिणाम भविष्यात राष्ट्रीय राजकारणावरही होऊ शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. प्रत्यक्षात 288 जागांपैकी महायुतीने 229 जागा जिंकल्या आहेत, तर MVA फक्त 47 पर्यंत मर्यादित राहिली. भाजपने 149 जागांवर निवडणूक लढवून 132 जागा जिंकल्या आहेत. भाजपचा हा 89% स्ट्राइक रेट विरोधकांनाही गोंधळात टाकणार आहे. हरियाणातील ऐतिहासिक विजयानंतर लगेचच महाराष्ट्रात भाजपच्या नेत्रदीपक कामगिरीमुळे केंद्र सरकारचा आत्मविश्वास वाढला आहे. दरम्यान, या निकालाचे भविष्यात काय परिणाम होतील, हे जाणून घ्या...

1. सुधारणांची रुपरेषा ठरवली जाईल, त्यात वक्फ विधेयकाचाही समावेश केला जाईलसलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकून भाजपने इतिहास रचला आहे. त्यांच्या जागा निश्चितपणे कमी झाल्या आहेत, मात्र मित्रपक्षांच्या मदतीने भाजप मजबूत स्थितीत आहे. दरम्यान, तज्ञांचे म्हणणे आहे की, मोदी सरकारने सुधारणांच्या दिशेने कोणताही ललगर्जीपणा दाखवला नाही. उलटपक्षी आयुष्मान भारत वैद्यकीय विमा संरक्षण वाढवणे आणि संयुक्त पेन्शन योजना सुरू करणे, यांसारख्या कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. सरकारने एक धाडसी वक्फ विधेयकही आणले आहे. मोदी सरकार आता वक्फ विधेयकावर पूर्ण विश्वास ठेवून पुढे जाईल, ज्याचे उद्दिष्ट वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन करण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्याचे आहे. हे समान नागरी संहिता (UCC) पुढे नेण्यास मदत करू शकते, ज्याला पंतप्रधान मोदींनी धर्मनिरपेक्ष नागरी संहिता म्हणून पुढे आणले आहे. 

2. हिंदू एकतेचे नवे सूत्रलोकसभा निवडणुकीत भाजपला चुरशीचा सामना करावा लागला. एकीकडे विरोधी पक्षांना मुस्लिम मते मिळाली, तर दुसरीकडे जात जनगणना आणि संविधान धोक्यात आहे, या काँग्रेसच्या प्रचारामुळे भाजपच्या मतांमध्ये घसरण झाली. 2014 आणि 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला सर्व जाती आणि समुदायांची मते मिळविण्यात यश आले, पण 2024 मध्ये भाजपला मोठा धक्का बसला. पण, या निवडणुकीत भाजपने बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है, यांसारख्या घोषणांमुळे सर्व हिंदूंना एकवटले. याशिवाय जातीच्या आधारावर हिंदू मतांचे विभाजन रोखण्यासाठी आरएसएसने आपल्या 'सजग रहो' (जागृत राहा) मोहिमेसाठी 65 संघटनांचा समावेश केला आहे.

3. काँग्रेसशी थेट स्पर्धेत भाजप खूप पुढेमहाराष्ट्रात काँग्रेसला सर्वाधिक नुकसान भाजपमुळे झाले आहेत. ज्या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत होती, तिथे काँग्रेसचा पराभव झाला आहे. 75 पैकी 65 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. यातील 36 जागा एकट्या विदर्भातील आहेत. भाजपचा उदय आणि काँग्रेसचे पतन, हे पक्षांच्या थेट लढतीतील कामगिरीवरून स्पष्ट होते. यावरुन पक्षाची संघटनात्मक ताकद आणि लोकप्रियता दिसून येते. भाजपशी थेट मुकाबला करताना, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा स्ट्राइक रेट 8% वरून 2024 मध्ये 30% पर्यंत वाढला होता, तर भाजपचा स्ट्राइक रेट 92% वरून 70% पर्यंत घसरला होता. मात्र, ऑक्टोबरमध्ये झालेल्या हरियाणा निवडणुकीने भाजपचे मनोबल वाढवले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी हा विश्वास दृढ केला आहे की, थेट लढतीत भाजप काँग्रेसपेक्षा खूप पुढे आहे.

4. मित्रपक्षांशी चर्चेत काँग्रेसची ताकद कमी झालीहरियाणात काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर इंडिया आघाडीतील मित्रपक्षांकडून काँग्रेसवर अनेक हल्ले करण्यात आले. महाराष्ट्राच्या निवडणुकीत पक्षाच्या दारुण पराभवानंतर पुन्हा एकदा मित्रपक्ष त्यावर हल्ला करू शकतात. महाराष्ट्रातील काँग्रेसचा स्ट्राइक रेट सुमारे 19% होता, जो अत्यंत वाईट आहे. हरियाणात काँग्रेसने आम आदमी पार्टीला इंडिया आघाडीत घेतले नाही. यासंदर्भात नंतर प्रश्नही उपस्थित करण्यात आले. शिवसेना उद्धव गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीयमध्ये हरियाणातील काँग्रेसच्या पराभवासाठी पक्षाचा "अतिआत्मविश्वास आणि राज्य नेतृत्वाचा अहंकार" याला जबाबदार धरले गेले. महाराष्ट्रातही काँग्रेसने मोठा भाऊ बनण्याचा प्रयत्न केला आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री चेहरा म्हणून सादर करू दिले नाही.

5. लोकाभिमुख योजना आणि पायाभूत सुविधा वाढीचे मिश्रणमहाराष्ट्रातील मोठे पायाभूत प्रकल्पही धोक्यात आले होते. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील MVA रोख मदतीचे आश्वासन देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असताना, महायुतीने लाडकी बेहन योजनेसारख्या रोख हमी योजनेचे आश्वासन दिले. पायाभूत सुविधांच्या विकासाची योग्य सांगड कायम ठेवत महायुतीने या निवडणुकीत विरोधकांचा मोठ्या प्रमाणात पराभव केल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. पुन्हा सत्तेत आल्यानंतर महायुतीने मुंबईतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, महालक्ष्मी रेसकोर्सवरील उद्याने सुरू करणे, गारगाई पिंजाळ जलप्रकल्प पुढे नेण्याच्या घोषणा केल्या. एमव्हीए आल्यास धारावी पुनर्विकास प्रकल्पात अडथळे निर्माण होऊ शकतात, अशीही लोकांमध्ये भावना निर्माण झाली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahayutiमहायुती