शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 16:03 IST

Maharashtra News: महाराष्ट्रातील 288 पैकी महायुतीने 230+ जागांवर विजय मिळवला आहे, तर महाविकास आघाडीला फक्त 47 जागा मिळाल्या.

Maharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाने सर्वांनाच चकीत केले आहे. दरम्यान, या निकालाचे परिणाम केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता, इतर राज्यांच्या निवडणुकांमध्येही दिसू शकतात. या निकालांचा परिणाम भविष्यात राष्ट्रीय राजकारणावरही होऊ शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. प्रत्यक्षात 288 जागांपैकी महायुतीने 229 जागा जिंकल्या आहेत, तर MVA फक्त 47 पर्यंत मर्यादित राहिली. भाजपने 149 जागांवर निवडणूक लढवून 132 जागा जिंकल्या आहेत. भाजपचा हा 89% स्ट्राइक रेट विरोधकांनाही गोंधळात टाकणार आहे. हरियाणातील ऐतिहासिक विजयानंतर लगेचच महाराष्ट्रात भाजपच्या नेत्रदीपक कामगिरीमुळे केंद्र सरकारचा आत्मविश्वास वाढला आहे. दरम्यान, या निकालाचे भविष्यात काय परिणाम होतील, हे जाणून घ्या...

1. सुधारणांची रुपरेषा ठरवली जाईल, त्यात वक्फ विधेयकाचाही समावेश केला जाईलसलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकून भाजपने इतिहास रचला आहे. त्यांच्या जागा निश्चितपणे कमी झाल्या आहेत, मात्र मित्रपक्षांच्या मदतीने भाजप मजबूत स्थितीत आहे. दरम्यान, तज्ञांचे म्हणणे आहे की, मोदी सरकारने सुधारणांच्या दिशेने कोणताही ललगर्जीपणा दाखवला नाही. उलटपक्षी आयुष्मान भारत वैद्यकीय विमा संरक्षण वाढवणे आणि संयुक्त पेन्शन योजना सुरू करणे, यांसारख्या कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. सरकारने एक धाडसी वक्फ विधेयकही आणले आहे. मोदी सरकार आता वक्फ विधेयकावर पूर्ण विश्वास ठेवून पुढे जाईल, ज्याचे उद्दिष्ट वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन करण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्याचे आहे. हे समान नागरी संहिता (UCC) पुढे नेण्यास मदत करू शकते, ज्याला पंतप्रधान मोदींनी धर्मनिरपेक्ष नागरी संहिता म्हणून पुढे आणले आहे. 

2. हिंदू एकतेचे नवे सूत्रलोकसभा निवडणुकीत भाजपला चुरशीचा सामना करावा लागला. एकीकडे विरोधी पक्षांना मुस्लिम मते मिळाली, तर दुसरीकडे जात जनगणना आणि संविधान धोक्यात आहे, या काँग्रेसच्या प्रचारामुळे भाजपच्या मतांमध्ये घसरण झाली. 2014 आणि 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला सर्व जाती आणि समुदायांची मते मिळविण्यात यश आले, पण 2024 मध्ये भाजपला मोठा धक्का बसला. पण, या निवडणुकीत भाजपने बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है, यांसारख्या घोषणांमुळे सर्व हिंदूंना एकवटले. याशिवाय जातीच्या आधारावर हिंदू मतांचे विभाजन रोखण्यासाठी आरएसएसने आपल्या 'सजग रहो' (जागृत राहा) मोहिमेसाठी 65 संघटनांचा समावेश केला आहे.

3. काँग्रेसशी थेट स्पर्धेत भाजप खूप पुढेमहाराष्ट्रात काँग्रेसला सर्वाधिक नुकसान भाजपमुळे झाले आहेत. ज्या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत होती, तिथे काँग्रेसचा पराभव झाला आहे. 75 पैकी 65 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. यातील 36 जागा एकट्या विदर्भातील आहेत. भाजपचा उदय आणि काँग्रेसचे पतन, हे पक्षांच्या थेट लढतीतील कामगिरीवरून स्पष्ट होते. यावरुन पक्षाची संघटनात्मक ताकद आणि लोकप्रियता दिसून येते. भाजपशी थेट मुकाबला करताना, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा स्ट्राइक रेट 8% वरून 2024 मध्ये 30% पर्यंत वाढला होता, तर भाजपचा स्ट्राइक रेट 92% वरून 70% पर्यंत घसरला होता. मात्र, ऑक्टोबरमध्ये झालेल्या हरियाणा निवडणुकीने भाजपचे मनोबल वाढवले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी हा विश्वास दृढ केला आहे की, थेट लढतीत भाजप काँग्रेसपेक्षा खूप पुढे आहे.

4. मित्रपक्षांशी चर्चेत काँग्रेसची ताकद कमी झालीहरियाणात काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर इंडिया आघाडीतील मित्रपक्षांकडून काँग्रेसवर अनेक हल्ले करण्यात आले. महाराष्ट्राच्या निवडणुकीत पक्षाच्या दारुण पराभवानंतर पुन्हा एकदा मित्रपक्ष त्यावर हल्ला करू शकतात. महाराष्ट्रातील काँग्रेसचा स्ट्राइक रेट सुमारे 19% होता, जो अत्यंत वाईट आहे. हरियाणात काँग्रेसने आम आदमी पार्टीला इंडिया आघाडीत घेतले नाही. यासंदर्भात नंतर प्रश्नही उपस्थित करण्यात आले. शिवसेना उद्धव गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीयमध्ये हरियाणातील काँग्रेसच्या पराभवासाठी पक्षाचा "अतिआत्मविश्वास आणि राज्य नेतृत्वाचा अहंकार" याला जबाबदार धरले गेले. महाराष्ट्रातही काँग्रेसने मोठा भाऊ बनण्याचा प्रयत्न केला आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री चेहरा म्हणून सादर करू दिले नाही.

5. लोकाभिमुख योजना आणि पायाभूत सुविधा वाढीचे मिश्रणमहाराष्ट्रातील मोठे पायाभूत प्रकल्पही धोक्यात आले होते. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील MVA रोख मदतीचे आश्वासन देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असताना, महायुतीने लाडकी बेहन योजनेसारख्या रोख हमी योजनेचे आश्वासन दिले. पायाभूत सुविधांच्या विकासाची योग्य सांगड कायम ठेवत महायुतीने या निवडणुकीत विरोधकांचा मोठ्या प्रमाणात पराभव केल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. पुन्हा सत्तेत आल्यानंतर महायुतीने मुंबईतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, महालक्ष्मी रेसकोर्सवरील उद्याने सुरू करणे, गारगाई पिंजाळ जलप्रकल्प पुढे नेण्याच्या घोषणा केल्या. एमव्हीए आल्यास धारावी पुनर्विकास प्रकल्पात अडथळे निर्माण होऊ शकतात, अशीही लोकांमध्ये भावना निर्माण झाली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahayutiमहायुती