शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 06:24 IST

अमित शाहांसोबत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली, त्यात काय निर्णय झाला हे अद्याप समोर आलं नाही. नरेंद्र मोदी-अमित शाह निर्णय घेतील तेव्हाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे कळेल असं शिरसाट यांनी सांगितले. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडा उलटला तरीही राज्यात सरकार स्थापन झाले नाही. महायुतीला या निवडणुकीत भरघोस यश मिळाले त्यात १३२ जागा मिळवून भाजपा सर्वात मोठा पक्ष बनला आहे. शिवसेनेला ५७ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४१ जागांवर विजय मिळाला. निकालानंतर मुख्यमंत्री कोण हा पेचप्रसंग निर्माण झाला असून भाजपा नेतृत्व देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्रि‍पदाची सूत्रे देण्याचा निर्णय घेत आहे. मात्र यामुळे नाराज एकनाथ शिंदे शुक्रवारी महायुतीच्या बैठका रद्द करून त्यांच्या सातारा जिल्ह्यातील मूळ दरे गावी पोहचले आहेत. त्यातच शिंदेंचे जवळचे सहकारी संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे.

संजय शिरसाट म्हणाले की, एकनाथ शिंदे हे जेव्हाही असा राजकीय पेचप्रसंग येतो किंवा त्यांना वाटतं आपल्याला विचार करायला वेळ हवा तेव्हा ते त्यांच्या गावाला प्राधान्य देतात. दरे गावात जातात, तिथे ना त्यांचा मोबाईल लागतो, ना संपर्क होतो, तिथे आरामात विचार करतात. एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा ते दरे गावी गेलेले असतात. कदाचित ते आज गावी गेलेत. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत काही तरी मोठा निर्णय ते घेऊ शकतात. सध्या ज्या राजकीय हालचाली सुरू आहेत त्यात काय करायला हवं, काय नाही याबाबत ते निर्णय घेतील असं त्यांनी सांगितले.

तसेच अमित शाहांसोबत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली, त्यात काय निर्णय झाला हे अद्याप समोर आलं नाही. नरेंद्र मोदी-अमित शाह निर्णय घेतील तेव्हाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे कळेल. एकदा मुख्यमंत्रिपदाचं नाव घोषित झाले तर त्यानंतर कोण मंत्री बनणार, मंत्रिमंडळ कसं असणार, किती मंत्रि‍पदे शिवसेनेला, किती राष्ट्रवादीला आणि किती भाजपाला मिळणार हे कळेल. पहिला प्रश्न मुख्यमंत्रि‍पदाचा आहे. २ डिसेंबरला शपथविधी सोहळा होईल अशी माहिती आहे. सध्या कुठलीही एकमेकांमध्ये चर्चा नाही. महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी मोदी-शाहांना निर्णय घेण्यास सांगितले आहे. ते जो काही निर्णय घेतील ते इथं अंमलात आणलं जाईल अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली.

दरम्यान, आमच्यात कुठलीही रस्सीखेच नाही. कोण मुख्यमंत्री होणार हा अजून निर्णय झालेला नाही. वरिष्ठ निर्णय घेतील त्याचे अंमलबजावणी इथं केली जाईल. एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार नाहीत, दिल्लीच्या राजकारणाऐवजी त्यांना महाराष्ट्रातील राजकारणात रस आहे. महाराष्ट्रात पक्षाचा जो पाया आहे तो मजबूत करण्याचं काम शिंदे करत आहेत. मंत्रिपद घ्यायचे की नाही याबाबत एकनाथ शिंदे निर्णय घेतील. हा निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदेंचा असेल असं शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले. 

जितेंद्र आव्हाडांनी घेतली शिंदेंची भेट

राज्यातील राजकीय घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या. तासभर ही बैठक झाली. नेमकी कशासाठी ही भेट होती हे समोर आले नाही. या भेटीनंतर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सध्या माध्यमांनी राजकीय वैमनस्याला वैयक्तिक संघर्षाचं चित्र दिले आहे. राजकीय विचारधारा वेगळी असते, त्यावर आम्ही लढत असतो. आम्ही काही चर्चा केली ते सांगायला हवं का, सरकार बनलं किंवा नाही याचं माझ्याशी काही देणेघेणं नाही. माझी मुलाखत ही वैयक्तिक आहे. मी सरकारमध्ये सामील होण्यासाठी गेलो नाही असं त्यांनी म्हटलं.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Eknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Shirsatसंजय शिरसाटBJPभाजपाAmit Shahअमित शाहDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदी