शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 20:06 IST

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळावले आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. आजच्या निकालानंतर महाराष्ट्रात कोणाचे सरकार येणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. पण, अद्याप मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत कोणतीही स्पष्टता आलेली नाही. दरम्यान, महायुतीला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर शिंदे गटाकडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले जात आहे, तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांचे नाव घेत आहेत. आता मुख्यमंत्री नेमकं कोण होणार, याचा निर्णय एनडीएच्या बैठकीत होणार असल्याचं शिंदे यांनी म्हटले आहे.

एनडीएच्या बैठकीत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाबाबत आपला दावा सांगू शकतात. शिंदेंकडे मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याचे एक नाही, तर पाच कारणे आहेत. शिंदे भाजपसोबत बार्गेनिंग करण्यात यशस्वी ठरले, तर भाजपला पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते. शिंदेंकडे असे कोणती पाच कारणे आहेत, पाहा...

1. शिंदेगटाला मिळालेला जनादेशमहाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत एनडीएचा दारुण पराभव झाला. मात्र, भाजपच्या बरोबरीने जागा जिंकण्यात शिंदेसेनेला यश आले. विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळवले, त्यात एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा वाटाही मोठा आहे. मुख्यमंत्री बदलल्यास शिवसेनेचे कार्यकर्ते दुखावतील आणि भविष्यात त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो, असा युक्तिवाद शिंदे करू शकतात. याशिवाय, शिंदेगटाचे जवळपास 58 उमेदवार निवडून आले आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे भाजपवर दबाव टाकू शकतात. 

2. भाजपकडे स्पष्ट बहुमत नाहीमुख्यमंत्रीपदासाठी भाजपवर दबाव टाकण्यासाठी एकनाथ शिंदेंकडे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे, भाजपला स्वबळावर बहुमत मिळालेले नाही. भाजपने 136-137 जागा जिंकल्या आहेत, पण बहुमताचा आकडा 145 आहे. त्यामुळे भाजपला इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.

3. अजित पवार विश्वासार्ह नेते नाहीअजित पवार महायुतीत सामील झाले असले तरी, त्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. 2019 पासून आतापर्यंत अजित पवारांनी तीनदा यू-टर्न घेतलेला आहे. अजित पवारांची विचारधाराही भाजपशी जुळत नाही. बटेंगे तो कटेंगेसारख्या मुद्द्यावरुन अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तणाव निर्माण झाला होता. याउलट शिवसेनेची विचारधारा आधीपासून भाजपशी मिळतीजुळती आहे. 

4. अडीच वर्षांच्या कामावर शिक्कामोर्तबएकनाथ शिंदे यांनी आपल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात कामांचा धडाका लावला होता. आमच्या कामाला जनतेने मतदान केल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी टोल फ्री, लाडकी बहिण अशा योजनांच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली होती. मुख्यमंत्री असताना त्यांनी या योजना जोरदारपणे राबवल्या होत्या. अशा स्थितीत शिंदे या आधारावरही सौदेबाजी करू शकतात.

5. भाजपसाठी पक्ष तोडलाएकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षासाठीच शिवसेनेत बंडखोरी केली. 2022 च्या बंडाच्या वेळी भाजप त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. बंडखोरीमुळे उद्धव गट आजही त्यांना देशद्रोही म्हणतो. दरम्यान, भाजपसोबत बोलणी करताना हा मुद्द्याही शिंदेंसाठी महत्वाचा आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारBJPभाजपाShiv Senaशिवसेना