शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

"एक हैं तो सेफ हैं "; PM मोदींच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरे म्हणाले, "आम्हाला काय शिकवता आम्ही सगळे एकत्र"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 18:35 IST

एक हैं तो सेफ हैं या घोषणेवरुन उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या बटेंगे तो कटेंगेची जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धुळ्यातल्या सभेतून एक हैं तो सेफ हैं ची घोषणा दिली. काँग्रेस आणि विरोधक जातीजातींमध्ये मतभेद करुन त्यांना वेगवेगळं करण्याचा डाव आखत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. पंतप्रधान मोदींच्या आरोपांना आता उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.  आम्हाला काय शिकवता, आम्ही सगळे एकत्र आहोत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्यातल्या सभेतून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्याची सुरुवात केली. यावेळी काँग्रेसवर आरोप करताना पंतप्रधान मोदी यांनी एक हैं तो सेफ हैं ची घोषणा दिली. याआधीही योगी आदित्यनाथ यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बटेंगे तो कटेंगेची घोषणा दिली होती. या घोषणेला आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बुलढाण्यातल्या सभेत बोलताना कटेंगेंची गोष्ट करणाऱ्यांना आम्ही भुईसपाट करणार आहोत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

"त्यांनी सांगितलं आहे की एक हैं तो सेफ हैं, बटेंगे तो कटेगें. कोण कापणार आहे, कुणाची हिम्मत आहे. कटेंगेंची गोष्ट करणाऱ्यांना आम्ही भुईसपाट करणार आहोत. आम्हाला काय शिकवता. आम्ही सगळे एकत्र आहोत.  बारा बलुतेदार समाज माझ्यासोबत आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

"काँग्रेस अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी समाजाच्या जातींना एकमेकांविरुद्ध उभं करत आहे. भारताच्या विरुद्ध यापेक्षा मोठा कट कुठलाही असू शकत नाही. आदिवासी जेव्हा एकत्र राहतील तेव्हाच त्यांची ताकद वाढेल. वेगवेगळ्या जातींमध्ये विभागले गेल्यानंतर तुमची ताकद कमी होईल. त्यामुळेच मी म्हणत आहे एक हैं तो सेफ हैं. आपल्याला एकजूट राहून काँग्रेसचा धोकादायक खेळ हाणून पाडून विकासाच्या वाटेवर पुढे जात राहायचे आहे," असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं.

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या घोषणेवरुन अजित पवार यांनीही रोष व्यक्त केला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेला महाराष्ट्रातील जनता स्वीकारणार नाही, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. "महाराष्ट्राची तुलना इतर राज्यांशी कोणी करू नये. येथील लोकांनी नेहमीच जातीय सलोखा राखला आहे. बाहेरून काही लोक इथे येऊन घोषणा देतात. पण महाराष्ट्राने जातीय विभाजन कधीच मान्य केले नाही. येथील लोक छत्रपती शाहूजी महाराज, ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे पालन करतात," असं अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरे