शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

"एक हैं तो सेफ हैं "; PM मोदींच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरे म्हणाले, "आम्हाला काय शिकवता आम्ही सगळे एकत्र"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 18:35 IST

एक हैं तो सेफ हैं या घोषणेवरुन उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या बटेंगे तो कटेंगेची जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धुळ्यातल्या सभेतून एक हैं तो सेफ हैं ची घोषणा दिली. काँग्रेस आणि विरोधक जातीजातींमध्ये मतभेद करुन त्यांना वेगवेगळं करण्याचा डाव आखत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. पंतप्रधान मोदींच्या आरोपांना आता उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.  आम्हाला काय शिकवता, आम्ही सगळे एकत्र आहोत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्यातल्या सभेतून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्याची सुरुवात केली. यावेळी काँग्रेसवर आरोप करताना पंतप्रधान मोदी यांनी एक हैं तो सेफ हैं ची घोषणा दिली. याआधीही योगी आदित्यनाथ यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बटेंगे तो कटेंगेची घोषणा दिली होती. या घोषणेला आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बुलढाण्यातल्या सभेत बोलताना कटेंगेंची गोष्ट करणाऱ्यांना आम्ही भुईसपाट करणार आहोत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

"त्यांनी सांगितलं आहे की एक हैं तो सेफ हैं, बटेंगे तो कटेगें. कोण कापणार आहे, कुणाची हिम्मत आहे. कटेंगेंची गोष्ट करणाऱ्यांना आम्ही भुईसपाट करणार आहोत. आम्हाला काय शिकवता. आम्ही सगळे एकत्र आहोत.  बारा बलुतेदार समाज माझ्यासोबत आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

"काँग्रेस अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी समाजाच्या जातींना एकमेकांविरुद्ध उभं करत आहे. भारताच्या विरुद्ध यापेक्षा मोठा कट कुठलाही असू शकत नाही. आदिवासी जेव्हा एकत्र राहतील तेव्हाच त्यांची ताकद वाढेल. वेगवेगळ्या जातींमध्ये विभागले गेल्यानंतर तुमची ताकद कमी होईल. त्यामुळेच मी म्हणत आहे एक हैं तो सेफ हैं. आपल्याला एकजूट राहून काँग्रेसचा धोकादायक खेळ हाणून पाडून विकासाच्या वाटेवर पुढे जात राहायचे आहे," असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं.

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या घोषणेवरुन अजित पवार यांनीही रोष व्यक्त केला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेला महाराष्ट्रातील जनता स्वीकारणार नाही, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. "महाराष्ट्राची तुलना इतर राज्यांशी कोणी करू नये. येथील लोकांनी नेहमीच जातीय सलोखा राखला आहे. बाहेरून काही लोक इथे येऊन घोषणा देतात. पण महाराष्ट्राने जातीय विभाजन कधीच मान्य केले नाही. येथील लोक छत्रपती शाहूजी महाराज, ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे पालन करतात," असं अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरे