शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

५ महिन्यात उलटलात, नियती तुम्हाला धडा शिकवेल; ठाकरे गटाचा काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 11:08 IST

रामटेक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात काँग्रेस जिल्हाध्यक्षांनीच बंडखोरी केली आहे. त्यांच्या उमेदवारीमागे स्थानिक काँग्रेस नेते आहेत त्यामुळे ठाकरे गट संतापला आहे. 

रामटेक - आज विधानसभेला काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी बंडखोरी केली. मात्र त्यांच्या बंडखोरीमागे काँग्रेस नेते सुनील केदार, खासदार श्यामकुमार बर्वे हे त्यांना पाठिंबा देतात. तुम्ही माणसं आहात की जनावरे, तुम्ही आहात कोण...? ५ महिन्यापूर्वी या शिवसैनिकांनी, जनतेने तुम्हाला रक्ताचं पाणी करून निवडून आणले पण तुम्ही ५ महिन्यात उलटलात अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला आहे.

रामटेक इथं विशाल बरबटे यांच्या प्रचारासाठी भास्कर जाधव यांनी सभा घेतली. या मतदारसंघात काँग्रेसचे राजेंद्र मुळीक यांनी बंडखोरी केली आहे. मात्र मुळीकांच्या बंडखोरीला सुनील केदार, खासदार श्यामकुमार बर्वे यांचा पाठिंबा आहे. त्यावरून भास्कर जाधव म्हणाले की, या भागात काँग्रेसला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मग इथं काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी बंडखोरी केली आहे. लोक महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मानतात. व्यक्ती मान्य करत नाही. मविआचे मतदार इथं मोठ्या प्रमाणात दिसतायेत. विशाल बरबटे यांच्या कार्यालयासमोर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले होते. ५ महिन्यापूर्वी या भागात काँग्रेसचा उमेदवार आपण लोकसभेसाठी उभा केला. त्याला रक्ताचे पाणी करून सर्वांनी निवडून आणलं. पक्ष बघितला नाही. ती निवडणूक एका ध्येयासाठी होती. अबकी बार ४०० पार देशाचे पंतप्रधान म्हणाले होते, कुठलाही पक्ष काहीही बोलत नव्हता. तेव्हा महाराष्ट्रातून सह्याद्रीच्या सुपुत्राची डरकाळी फुटली. उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणाले इसबार ४०० पार नाही तडीपार. तडीपार म्हणताना ठाकरेंनी कोणत्या पक्षाला किती उमेदवार याचा विचार केला नाही असं त्यांनी सांगितले. 

तर लोकसभेला पहिल्या टप्प्यातील पाचही जागा काँग्रेसने लढवल्या. रामटेक मतदारसंघाची जागा शिवसेनेची होती. मात्र मोठ्या मनाने ती जागा ठाकरेंनी काँग्रेसला दिली. कारण भाजपाला तडीपार करायचं म्हणून दिली. माझी जागा, तुझी जागा हा विचार उद्धव ठाकरेंनी केला नाही. तडीपार केले नाही तर देशाच्या संविधानाला धोका आहे. लोकशाहीला धोका आहे. देशाच्या अखंडतेला धोका आहे. हा धोका लक्षात घेता उमेदवार कोण, पक्ष कोण याचा विचार न करता वर्षानुवर्षे निवडून आलेली जागा काँग्रेसला दिली. मात्र विधानसभेला काँग्रेस नेत्यांचा काय एवढा मोठा आग्रह..२८ जागापैकी फक्त १ जागा पूर्व विदर्भात आम्ही लढवतोय. एक जागा लढवण्याइतपत शिवसेनेची ताकद आहे? भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, चंद्रपूरात ताकद नाही असं कोणाला वाटत असेल तर भल्याभल्यांनी शिवसेनेशी टक्कर घेतली आणि शिवसेनेने त्यांना माती दाखवली. शिवसेनेच्या स्वाभिमानाला कुणी हात घालू नका. आमच्या स्वाभिमानाला कुणी आव्हान देऊ नका. एकदा शिवसैनिक पेटला तर कुणाच्या बापाला ऐकत नाही असा इशारा भास्कर जाधवांनी काँग्रेसला दिला. 

दरम्यान, मला सुनील केदार यांना विचारायचं आहे, एक जागा आम्ही लढवतोय. मागे सुनील केदार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उद्धव ठाकरेंना शब्द दिला. या रामटेक विधानसभा मतदारसंघातील सहाच्या सहा जागा महाविकास आघाडीच्या निवडून आणेन असा विश्वास दिला. मात्र आज तुम्ही छत्रपतींचाही विश्वासघात करायला निघालात. महाविकास आघाडीचा आणि पक्षप्रमुखांचा विश्वासघात केला. नियती अशा लोकांना माफ करत नाही. तुम्हाला  एवढेच राजेंद्र मुळीकांबद्दल प्रेम आले होते, विधानसभेत निवडून जायचे होते मग त्यांना कामठीतून का उभे केले नाही. जर सुनील केदार यांना मविआत मिठाचा खडा व्हायचं नव्हते मग बँकेच्या घोटाळ्याबद्दल तुमच्यावर आरोप आहे. तुम्ही निवडणूक लढवू शकत नव्हता. पक्षाबद्दल एवढे प्रेम होते, तर पत्नीला उमेदवारी देण्याऐवजी राजेंद्र मुळीक यांना सावनेरची जागा का दिली नाही. तुमच्या भ्रष्टाचारामुळे तुम्हाला निवडणूक लढवता येत नाही. इतके कसे तुम्ही उलटे फिरता, नियती यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा घणाघात जाधवांनी सुनील केदार आणि खासदार श्यामकुमार बर्वे यांच्यावर केला.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ramtek-acरामटेकvidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Bhaskar Jadhavभास्कर जाधवcongressकाँग्रेसSunil Kedarसुनील केदारUddhav Thackerayउद्धव ठाकरे