शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
2
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
3
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
4
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
5
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
6
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
7
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
8
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
9
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
10
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
11
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
12
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
13
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
14
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
15
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
16
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
17
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
18
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
19
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
20
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल

मुस्लिम संघटनेच्या १७ मागण्या मान्य केल्याचे पत्र 'खोटं'; शरद पवार गटाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 18:49 IST

अखिल भारतीय उलेमा बोर्डाच्या १७ मागण्या मान्य केल्याचे पत्र खोटे असल्याची शरद पवार गटाची माहिती

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय उलेमा बोर्ड महाराष्ट्राने महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यासाठी १७ कलमी अट ठेवल्या आहेत. या अटींमध्ये वक्फ विधेयकाला विरोध, नोकऱ्या आणि शिक्षणात १० टक्के मुस्लिम आरक्षण, इमाम आणि मौलाना यांना १५,००० रुपये मासिक भत्ता यांचा समावेश आहे. यामध्ये आरएसएसवर बंदी घालण्याचीही अट आहे. यासंदर्भात अखिल भारतीय उलेमा बोर्ड महाराष्ट्राचे अध्यक्ष नायब अन्सारी यांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना पत्र लिहीले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांनी सर्व अटी मान्य केल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यावर आता शरद पवार गटाने याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

विधानसभा निवडणुकीत ऑल इंडिया उलेमा बोर्डाने महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यासाठी मुस्लिमांना १० टक्के आरक्षण, आरएसएसवर बंदी यांसारख्या १७ अटी घातल्या आहेत. ७ नोव्हेंबर रोजी ऑल इंडिया उलेमा बोर्डाने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहिले होते. पत्रात उलेमा बोर्डाने जर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तर त्यांनी वक्फ विधेयकाला विरोध करावा आणि मुस्लिमांविरोधात वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार नितीश राणेंसारख्या नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी मंडळाने केली.

मात्र आता या मागण्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने समर्थन दिल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रामध्ये ऑल इंडिया उलेमा बोर्डाने महाविकास आघाडीसाठी काम करावे असं म्हटलं आहे. मात्र आता हे पत्र खोटं असल्याची माहिती शरद पवार गटाने दिलं आहे. "भय पायउतार होण्याचे त्यासाठीच कारनामे लबाड लांडग्याचे. कटूनितीचा गुणधर्म विरोधकांनी कोळून प्यायलेला दिसतोय. समाजमाध्यमांवर प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या स्वाक्षरीचे प्रसिद्ध होणारे पत्रक याचे द्योतक आहे. ओढूनताणून एखाद्या प्रकरणाचा चिखलफेक करत समोरच्यावर बेछूट बिनबुडाचे आरोप करण्याचा हा प्रयत्न वेळीच ठेचून काढलाय. अशा खोट्या बातम्यांवर, फेक नरेटीव्हवर विश्वास ठेवून आपला अमूल्य वेळ दवडण्याची गरज नाही," असं म्हणत शरद पवार गटाने  हे पत्र खोटं असल्याचे म्हटलं आहे.

काय म्हटलंय पत्रात?

"महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये ऑल इंडिया उलमा बोर्ड आम्हाला पाठिंबा देण्यास तयार असल्याबाबतचे व आपल्या १७ मागण्यांबाबतचे निवेदन प्राप्त झाले. आपण दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. तसेच ऑल इंडिया उलमा बोर्डने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रचार करावा अशी अपेक्षा आहे. आपण व्यक्त केलेल्या १७ मागण्यांसंदर्भात आपणास सांगू इच्छितो की, महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाल्यानंतर आपल्या मागण्यांच्या अंमलबजावणी संदर्भात निश्चितपणे पाऊले उचलू, महाविकास आघाडीला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभारी आहोत," असं या पत्रामध्ये म्हटलं आहे. तसेच या पत्रावर जयंत पाटील यांनी खोटी स्वाक्षरीदेखील आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटील