शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम संघटनेच्या १७ मागण्या मान्य केल्याचे पत्र 'खोटं'; शरद पवार गटाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 18:49 IST

अखिल भारतीय उलेमा बोर्डाच्या १७ मागण्या मान्य केल्याचे पत्र खोटे असल्याची शरद पवार गटाची माहिती

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय उलेमा बोर्ड महाराष्ट्राने महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यासाठी १७ कलमी अट ठेवल्या आहेत. या अटींमध्ये वक्फ विधेयकाला विरोध, नोकऱ्या आणि शिक्षणात १० टक्के मुस्लिम आरक्षण, इमाम आणि मौलाना यांना १५,००० रुपये मासिक भत्ता यांचा समावेश आहे. यामध्ये आरएसएसवर बंदी घालण्याचीही अट आहे. यासंदर्भात अखिल भारतीय उलेमा बोर्ड महाराष्ट्राचे अध्यक्ष नायब अन्सारी यांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना पत्र लिहीले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांनी सर्व अटी मान्य केल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यावर आता शरद पवार गटाने याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

विधानसभा निवडणुकीत ऑल इंडिया उलेमा बोर्डाने महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यासाठी मुस्लिमांना १० टक्के आरक्षण, आरएसएसवर बंदी यांसारख्या १७ अटी घातल्या आहेत. ७ नोव्हेंबर रोजी ऑल इंडिया उलेमा बोर्डाने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहिले होते. पत्रात उलेमा बोर्डाने जर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तर त्यांनी वक्फ विधेयकाला विरोध करावा आणि मुस्लिमांविरोधात वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार नितीश राणेंसारख्या नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी मंडळाने केली.

मात्र आता या मागण्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने समर्थन दिल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रामध्ये ऑल इंडिया उलेमा बोर्डाने महाविकास आघाडीसाठी काम करावे असं म्हटलं आहे. मात्र आता हे पत्र खोटं असल्याची माहिती शरद पवार गटाने दिलं आहे. "भय पायउतार होण्याचे त्यासाठीच कारनामे लबाड लांडग्याचे. कटूनितीचा गुणधर्म विरोधकांनी कोळून प्यायलेला दिसतोय. समाजमाध्यमांवर प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या स्वाक्षरीचे प्रसिद्ध होणारे पत्रक याचे द्योतक आहे. ओढूनताणून एखाद्या प्रकरणाचा चिखलफेक करत समोरच्यावर बेछूट बिनबुडाचे आरोप करण्याचा हा प्रयत्न वेळीच ठेचून काढलाय. अशा खोट्या बातम्यांवर, फेक नरेटीव्हवर विश्वास ठेवून आपला अमूल्य वेळ दवडण्याची गरज नाही," असं म्हणत शरद पवार गटाने  हे पत्र खोटं असल्याचे म्हटलं आहे.

काय म्हटलंय पत्रात?

"महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये ऑल इंडिया उलमा बोर्ड आम्हाला पाठिंबा देण्यास तयार असल्याबाबतचे व आपल्या १७ मागण्यांबाबतचे निवेदन प्राप्त झाले. आपण दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. तसेच ऑल इंडिया उलमा बोर्डने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रचार करावा अशी अपेक्षा आहे. आपण व्यक्त केलेल्या १७ मागण्यांसंदर्भात आपणास सांगू इच्छितो की, महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाल्यानंतर आपल्या मागण्यांच्या अंमलबजावणी संदर्भात निश्चितपणे पाऊले उचलू, महाविकास आघाडीला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभारी आहोत," असं या पत्रामध्ये म्हटलं आहे. तसेच या पत्रावर जयंत पाटील यांनी खोटी स्वाक्षरीदेखील आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटील