शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 18:23 IST

नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानावरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी भाष्य केलं आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधीच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेंच सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीबाबत केलेल्या दाव्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांना टोला लगावला होता. पुढील मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल हे मी मानत नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसच्या बड्या नेत्याने नाना पटोले यांना झापलं आहे. संयम बाळगण्याची गरज असल्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी १७० ते १७५ जागा जिंकेल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. तसेच काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार बनेल असं विधान केल्यानं मुख्यमंत्रि‍पद काँग्रेसकडे असेल असे सुतोवाच नाना पटोले यांनी दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि छत्तीसगडचे माजी उपमुख्यमंत्री टी.एस. सिंग देव यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत असल्याचा दावा केला आहे. "आपण संयम बाळगला पाहिजे. सध्या कोणाचे सरकार बनणार आहे हे देखील आपल्याला माहित नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी महाराष्ट्रात होतो आणि माझ्या माहितीनुसार ठोस आशा आहे की महाविकास आघाडीचे सरकार येईल. पण आधी सरकार तर स्थापन होऊ द्या," असं टी.एस. सिंग देव यांनी म्हटलं आहे.

"महाविकास आघाडीने सर्व काम एकत्र केले आहे. निवडणूक लढण्याचे, जागा वाटपाचे, जाहिरनाम्याचे सर्व निर्णय एकत्र घेतले आहेत. पुरंदर विधानसभा मतदारसंघात काम करताना मी पाहिलं की सगळ्या घटक पक्षाचे कार्यकर्ते मिळून काम करत होते. पुणे आणि इतरही मतदारसंघात सर्वांनी मिळून काम केलं आहे. त्यामुळे निवडणुकीचे निकाल आले की महाविकास आघाडीती घटक पक्षांनी एकत्र बसावे आणि प्रत्येक पक्षाच्या हायकमांडने एकत्रितपणे निर्णय घ्यावा," असंही सिंग म्हणाले.

काय म्हणाले संजय राऊत?

"पुढील मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल हे मी मानत नाही. महाविकास आघाडीचं सरकार असेल आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. जर नाना पटोले असं म्हणत असतील, पटोलेंना जर हायकमांडने सांगितले असेल तुम्ही मुख्यमंत्री बनणार आहात तर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर करायला हवं," असा टोला संजय राऊतांनी लगावला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी