शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 13:56 IST

Maharashtra Assembly Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विरोधी पक्षांकडून पुन्हा एकदा इव्हीएमविरोधात शंका उपस्थित केली जात आहे. त्यात आता राज ठाकरे यांच्या मनसेनेही इव्हीएमविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

नुकत्याच लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये सत्ताधारी महायुतीला बंपर बहुमत मिळालं आहे. तर विरोधी पक्षातील महाविकास आघाडीसह इतर पक्षांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून पुन्हा एकदा इव्हीएमविरोधात शंका उपस्थित केली जात आहे. त्यात आता राज ठाकरे यांच्या मनसेनेही इव्हीएमविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांना या विधानसभा निवडणुकीत महायुतीने फसवल्याचा तसेच इव्हीएममुळेच महायुतीचा विजय झाल्याचा दावा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे.

अविनाश जाधव विधानसभा निवडणुकीच्या निकालांबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मागच्या काही दिवसांपासून काही व्हिडीओ येत आहेत. ते पाहिले तर तुम्हाला कशा प्रकारे निकाल तयार करण्यात आले हे लक्षात येईल. आम्हाला एवढा वाईट निकाल लागेल, याची अपेक्षा नव्हती. हा निकाल आम्हाला मान्यच नाही आहे. आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी कोरोना काळात खूप काम केलं होतं. मात्र मागच्या दहा वर्षांपासून कुठेही न गेलेले आमदार लाख लाख मतांनी निवडून येतात, हे अशक्य आहे, अनाकलनीय आहे आणि मी खात्रीने सांगतो की, इव्हीएमशिवाय ही गोष्ट अशक्य होती. या निकालंमध्ये ईव्हीएमची खूप मोठी भूमिका आहे, असा आरोप अविनाश जाधव यांनी केला. 

यावेळी महायुतीच्या नेत्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना फसवल्याचा आरोपही त्यांनी केला. राज ठाकरे हे विधानसभेच्या निकालांबाबत राज ठाकरे हे आपली भूमिका लवकच मांडतील. मात्र कार्यकर्ते म्हणून विचाराल तर अनेक मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदारांबाबत नाराजी होती. लोक ती नाराजी बोलून दाखवत होते, असं असतानाही लोकांनी भाजपाला मत दिलं असं वाटत असेल तर ती बाब खोटी आहे. राज ठाकरे यांनी परवा झालेल्या बैठकीत उमेदवारांचं म्हणणं ऐकून घेतलं. आता ते लवकरच आपली भूमिका मांडतील. तसेच त्यामधून महाराष्ट्रात काय घडलं, याची माहिती सर्वांना मिळेल, असेही अविनाश जाधव यांनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024EVM Machineईव्हीएम मशीनMNSमनसेAvinash Jadhavअविनाश जाधवRaj Thackerayराज ठाकरेMahayutiमहायुती