शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
5
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
6
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
7
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
8
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
9
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
10
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
11
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
12
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
13
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
14
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
15
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
16
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
17
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
18
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
19
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
20
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

"कुछ तो गडबड है, हा कौल कसा मानावा?’’ संजय राऊत यांनी निकालावर व्यक्त केली शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 11:25 IST

Maharashtra Assembly Election 2024 Result: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली आहे. हा कौल कसा मानावा, कुछ तो गडबड है असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.  

देशातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, आतापर्यंत समोर आलेल्या कलांमधून राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल असे संकेत मिळत आहेत. भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या महायुतीने २२१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीला केवळ ५६ जागांवर आघाडी मिळाली आहे. दरम्यान, या निकालांवर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली आहे. हा कौल कसा मानावा, कुछ तो गडबड है असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, हा निकाल पाहून माझ्या मनात एकच शब्द आला तो म्हणजे कुछ तो गडबड है. एकनाथ शिंदे यांना ५६ जागा कुठल्या भरोशावर मिळताहेत. अजित पवार यांना ४० पेक्षा अधिक जागा कुठल्या आधारावर मिळताहेत. तसेच देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी दिवे लावलेत की येथे त्यांना १२० पेक्षा अधिक जागा मिळताहेत. महाराष्ट्रातलं वातावरण आणि महाराष्ट्राचा कल ज्या पद्धतीने होता. आम्ही राज्यभर फिरलोय. हा निकाल हा लोकशाहीचा कौल मानण्याची प्रथा परंपरा आम्ही पाळलेली आहे. आम्ही ती मानतो, पण हा कौल कसा मानावा, हा प्रश्न राज्यातील जनतेलाही पडला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, शरद पवार यांनी महाराष्ट्रात तुफान उभं केलं होतं. तुम्ही त्यांना दहा जागाही द्यायला तयार नाहीत. हे महाराष्ट्रामध्ये शक्य आहे का? ही काय गडबड आहे हे सगळ्यांना कळेल. पण जरी हा निकाल आला असला तरी हा जनतेचा कौल आहे, असं आम्ही मानायला तयार नाही. जनतेचा कल हा नव्हता. मी १०० टक्के सांगतो, जय पराजय होत असतात. निवडणुकीमध्ये लोकशाहीमध्ये हारजीत होत असते. त्याच्याविषयी आम्हाला काही म्हणायचं नाही. पण हे निकाल लावून घेतलेले आहेत, या निकालांवर लोकशाही मानणाऱ्या माझ्यासारख्या माणसाचा विश्वास असू शकत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

हे निकाल लाडकी बहीण योजनेमुळे लागले असे मी मानत नाही. महाराष्ट्रामध्ये लाडके भाऊ, लाडके दादा, लाडके आजोबा नाही आहेत का? मी पुन्हा सांगतो काही तरी गडबड आहे आणि मोठी गडबड आहे. महाराष्ट्रावर अदानीचं बारीक लक्ष होतं. विशेषत: अदानींविरोधात काल अटक वॉरंट निघालं होतं. अशा प्रकारचे निकाल येतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. गौतम अदानींवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप हे अप्रत्यक्षपणे भाजपावर झालेले होते. शिंदे यांच्यावर होते. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक पैशांचा वापर आणि तादक ही अदानीने लावली होती. आताही या निकालांवर गौतम अदानीचा प्रभाव आहे का? कारण अदानी, मोदी आणि फडणवीस हे वेगळे नाहीत, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

दरम्यान, हा निकाल लावून घेतलेला, हा जनतेचा कौल नाही. अमित शाह, नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांनी हा निकाल लावून घेतला आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.   

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Sanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४