शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

"कुछ तो गडबड है, हा कौल कसा मानावा?’’ संजय राऊत यांनी निकालावर व्यक्त केली शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 11:25 IST

Maharashtra Assembly Election 2024 Result: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली आहे. हा कौल कसा मानावा, कुछ तो गडबड है असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.  

देशातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, आतापर्यंत समोर आलेल्या कलांमधून राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल असे संकेत मिळत आहेत. भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या महायुतीने २२१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीला केवळ ५६ जागांवर आघाडी मिळाली आहे. दरम्यान, या निकालांवर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली आहे. हा कौल कसा मानावा, कुछ तो गडबड है असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, हा निकाल पाहून माझ्या मनात एकच शब्द आला तो म्हणजे कुछ तो गडबड है. एकनाथ शिंदे यांना ५६ जागा कुठल्या भरोशावर मिळताहेत. अजित पवार यांना ४० पेक्षा अधिक जागा कुठल्या आधारावर मिळताहेत. तसेच देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी दिवे लावलेत की येथे त्यांना १२० पेक्षा अधिक जागा मिळताहेत. महाराष्ट्रातलं वातावरण आणि महाराष्ट्राचा कल ज्या पद्धतीने होता. आम्ही राज्यभर फिरलोय. हा निकाल हा लोकशाहीचा कौल मानण्याची प्रथा परंपरा आम्ही पाळलेली आहे. आम्ही ती मानतो, पण हा कौल कसा मानावा, हा प्रश्न राज्यातील जनतेलाही पडला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, शरद पवार यांनी महाराष्ट्रात तुफान उभं केलं होतं. तुम्ही त्यांना दहा जागाही द्यायला तयार नाहीत. हे महाराष्ट्रामध्ये शक्य आहे का? ही काय गडबड आहे हे सगळ्यांना कळेल. पण जरी हा निकाल आला असला तरी हा जनतेचा कौल आहे, असं आम्ही मानायला तयार नाही. जनतेचा कल हा नव्हता. मी १०० टक्के सांगतो, जय पराजय होत असतात. निवडणुकीमध्ये लोकशाहीमध्ये हारजीत होत असते. त्याच्याविषयी आम्हाला काही म्हणायचं नाही. पण हे निकाल लावून घेतलेले आहेत, या निकालांवर लोकशाही मानणाऱ्या माझ्यासारख्या माणसाचा विश्वास असू शकत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

हे निकाल लाडकी बहीण योजनेमुळे लागले असे मी मानत नाही. महाराष्ट्रामध्ये लाडके भाऊ, लाडके दादा, लाडके आजोबा नाही आहेत का? मी पुन्हा सांगतो काही तरी गडबड आहे आणि मोठी गडबड आहे. महाराष्ट्रावर अदानीचं बारीक लक्ष होतं. विशेषत: अदानींविरोधात काल अटक वॉरंट निघालं होतं. अशा प्रकारचे निकाल येतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. गौतम अदानींवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप हे अप्रत्यक्षपणे भाजपावर झालेले होते. शिंदे यांच्यावर होते. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक पैशांचा वापर आणि तादक ही अदानीने लावली होती. आताही या निकालांवर गौतम अदानीचा प्रभाव आहे का? कारण अदानी, मोदी आणि फडणवीस हे वेगळे नाहीत, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

दरम्यान, हा निकाल लावून घेतलेला, हा जनतेचा कौल नाही. अमित शाह, नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांनी हा निकाल लावून घेतला आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.   

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Sanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४