शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
3
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
4
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
5
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
6
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
7
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
8
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
9
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
10
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
11
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
12
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
13
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
14
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
15
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
16
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
17
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
18
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
19
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल

"कुछ तो गडबड है, हा कौल कसा मानावा?’’ संजय राऊत यांनी निकालावर व्यक्त केली शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 11:25 IST

Maharashtra Assembly Election 2024 Result: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली आहे. हा कौल कसा मानावा, कुछ तो गडबड है असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.  

देशातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, आतापर्यंत समोर आलेल्या कलांमधून राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल असे संकेत मिळत आहेत. भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या महायुतीने २२१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीला केवळ ५६ जागांवर आघाडी मिळाली आहे. दरम्यान, या निकालांवर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली आहे. हा कौल कसा मानावा, कुछ तो गडबड है असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, हा निकाल पाहून माझ्या मनात एकच शब्द आला तो म्हणजे कुछ तो गडबड है. एकनाथ शिंदे यांना ५६ जागा कुठल्या भरोशावर मिळताहेत. अजित पवार यांना ४० पेक्षा अधिक जागा कुठल्या आधारावर मिळताहेत. तसेच देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी दिवे लावलेत की येथे त्यांना १२० पेक्षा अधिक जागा मिळताहेत. महाराष्ट्रातलं वातावरण आणि महाराष्ट्राचा कल ज्या पद्धतीने होता. आम्ही राज्यभर फिरलोय. हा निकाल हा लोकशाहीचा कौल मानण्याची प्रथा परंपरा आम्ही पाळलेली आहे. आम्ही ती मानतो, पण हा कौल कसा मानावा, हा प्रश्न राज्यातील जनतेलाही पडला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, शरद पवार यांनी महाराष्ट्रात तुफान उभं केलं होतं. तुम्ही त्यांना दहा जागाही द्यायला तयार नाहीत. हे महाराष्ट्रामध्ये शक्य आहे का? ही काय गडबड आहे हे सगळ्यांना कळेल. पण जरी हा निकाल आला असला तरी हा जनतेचा कौल आहे, असं आम्ही मानायला तयार नाही. जनतेचा कल हा नव्हता. मी १०० टक्के सांगतो, जय पराजय होत असतात. निवडणुकीमध्ये लोकशाहीमध्ये हारजीत होत असते. त्याच्याविषयी आम्हाला काही म्हणायचं नाही. पण हे निकाल लावून घेतलेले आहेत, या निकालांवर लोकशाही मानणाऱ्या माझ्यासारख्या माणसाचा विश्वास असू शकत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

हे निकाल लाडकी बहीण योजनेमुळे लागले असे मी मानत नाही. महाराष्ट्रामध्ये लाडके भाऊ, लाडके दादा, लाडके आजोबा नाही आहेत का? मी पुन्हा सांगतो काही तरी गडबड आहे आणि मोठी गडबड आहे. महाराष्ट्रावर अदानीचं बारीक लक्ष होतं. विशेषत: अदानींविरोधात काल अटक वॉरंट निघालं होतं. अशा प्रकारचे निकाल येतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. गौतम अदानींवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप हे अप्रत्यक्षपणे भाजपावर झालेले होते. शिंदे यांच्यावर होते. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक पैशांचा वापर आणि तादक ही अदानीने लावली होती. आताही या निकालांवर गौतम अदानीचा प्रभाव आहे का? कारण अदानी, मोदी आणि फडणवीस हे वेगळे नाहीत, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

दरम्यान, हा निकाल लावून घेतलेला, हा जनतेचा कौल नाही. अमित शाह, नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांनी हा निकाल लावून घेतला आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.   

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Sanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४