शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

"गेल्या अडीच वर्षापासून..."; महायुतीवर टीका करत अजित पवारांच्या आमदाराने दिले पक्ष सोडण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 09:05 IST

मराठवाड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुका जशा जशा जवळ येऊ लागल्या आहेत तसे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांना धक्के बसत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर अनेक दिग्गजांनी अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार यांच्या प्रक्षात प्रवेश केला आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरही पक्षातून गळती सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.  सतीश चव्हाण यांनी एक पत्र लिहून महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे आता सतीश चव्हाण  यांनी सुद्धा पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत. तसेच सतीश चव्हाण हे सुद्धा शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे.

राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होताच इच्छुक उमेदवारांकडून बंडखोरीस सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसात नाराज असलेल्या अनेकांनी अजित पवार यांना रामराम करत शरद पवार गटात प्रवेश केला आहे. अशातच मराठवाड्यातही अजित पवार यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी पत्रातून नाराजी व्यक्त करत महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता ते देखील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे म्हटलं जात आहे. 

पदवीधर आमदार असलेले सतीश चव्हाण यांना गंगापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. मात्र सतीश चव्हाण यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला. आमदार सतिश चव्हाण यांनी पत्र लिहून महायुती सरकारच्या कारभारावर केली सडकून टीका आहे. गेल्या अडीच वर्षात मराठा मुस्लिम धनगर आणि आदिवासी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्या बाबत सरकारला अपयश आल्याची टीका सतीश चव्हाण यांनी केली आहे.

"मागील अडीच वर्षांपासून राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार आहे. मागील दीड वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सरकारमध्ये सहभागी झाला. राज्यातील बहुजनांचे प्रश्न सुटतील या उद्देशाने आम्ही या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालो होतो. मराठा, धनगर, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार मार्ग काढेल अशी अपेक्षा होती, मात्र महायुतीचे सरकार यावर मार्ग काढू शकले नाही, बहुजनांचे प्रश्न हे महायुतीचे सरकार सोडवू शकले नाही," असे सतीश चव्हाण यांनी म्हटलं आहे. 

"मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात गेल्यावर्षी नवी मुंबईतील वाशी येथे मोर्चा धडकल्यानंतर राज्य सरकारने मनोज जरांगे यांची भेट घेऊन ५४ लाख कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा बांधवांना आरक्षण देणार, कुणबी नोंदी सापडलेल्यांना सगेसोयरे प्रमाणपत्र देणार, अशा मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र त्यानंतर मराठा आंदोलनाचा प्रश्न हाताळण्यात सरकारला यश आले नाही. आजही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. आज मराठवाड्यासह महाराष्ट्रात अनेक मराठा तरुण आत्महत्या करत आहेत, या गोष्टींकडे सरकारने गांभीर्याने पाहिले नाही," अशीही टीका सतीश चव्हाण यांनी केली आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार