शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
5
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
6
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
7
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
8
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
9
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
10
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
11
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
14
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
15
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
16
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
17
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
18
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
19
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
20
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु

"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 14:37 IST

आपल्याला एकजूट राहून काँग्रेसचा हा धोकादायक डाव अयशस्वी करायचा आहे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला केले. 

धुळे - काँग्रेसकडून एका जातीला दुसऱ्या जातीशी संघर्ष करण्याचा धोकादायक खेळ खेळला जातोय. हा खेळ यासाठी आहे कारण काँग्रेस कधीही दलित, मागासवर्गीय, आदिवासी यांना पुढे येताना पाहू शकत नाही. हाच काँग्रेसचा इतिहास आहे. स्वातंत्र्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषितांना, वंचितांना आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत होते. मात्र नेहरू त्याला विरोध करत होते. अनेक अडचणींचा सामना करून बाबासाहेबांनी दलित, आदिवासींना आरक्षण लागू केले, त्यांना संघर्ष करावा लागला असं सांगत काँग्रेस जातीजातीत भेद निर्माण करण्याचा डाव रचत आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

धुळे येथील जाहीर सभेत मोदींनी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांवर घणाघात केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, SC, ST आणि OBC कमकुवत राहावा असेच काँग्रेसला नेहमी वाटते. राजीव गांधी यांनी ओबीसी आरक्षणाचा उघडपणे विरोध केला होता. जर एससी, एसटी आणि ओबीसी हा समाज एकजूट झाला तर काँग्रेसच्या राजकीय दुकानदारीचं शटर बंद होईल असं त्यांना वाटत होते. राजीव गांधीनंतर आता कुटुंबाची चौथी पिढी या धोकादायक प्रवृत्तीने त्यांचे युवराज काम करत आहेत. काँग्रेसचा एकमेव अजेंडा आहे, कुठल्याही प्रकारे एससी, एसटी, ओबीसी समाजाची एकजूट तोडावी असंही त्यांनी म्हटलं. 

त्याशिवाय SC समाज विविध जातीत विखुरला जावा, जेणेकरून त्यांची सामुहिक शक्ती कमी पडेल. ओबीसी समाजही वेगवेगळ्या जातीत विभागला जावा जेणेकरून ओबीसींची एकजुटता कायम राहिली तर त्यांची ताकद वाढेल. ही ताकद वाढू नये म्हणून ओबीसी समाजाला जाती जातीत विखुरण्याचा प्रयत्न केला जात आहे. एसटी समाजही वेगवेगळ्या जातीत विभागला जावा. आदिवासी, दलित, मागासवर्गीय समाज एकत्रितपणे एकजूट पुढे आले आहे. ते मजबुतीने त्यांचा आवाज उचलू नये त्यासाठी त्यांना जातीत विखुरले जावे हा काँग्रेसचा डाव असल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

दरम्यान, काँग्रेस छोट्या छोट्या जातींना एकमेकांशी लढवत आहे. आदिवासींची ओळख, दलितांची एकता हे तोडण्यामागे काँग्रेस लागली आहे. आदिवासी समाजाची एकजूटता काँग्रेसला पाहवत नाही. देशातील आदिवासी समुह एकमेकांशी संघर्ष करावा. त्यातून त्यांचा सामुहिक ताकद कमी व्हावी. काँग्रेसने धर्माच्या नावावर असे षडयंत्र रचले तेव्हा देशाचे विभाजन झाले. आता काँग्रेस एससी, एसटी, ओबीसीतल्या जातींना एकमेकांविरोधात लढवत आहे. भारताविरोधात इतकं मोठं षडयंत्र दुसरं असू शकत नाही. आदिवासी एकजूट राहिला तर त्याची ताकद वाढेल. वेगवेगळ्या जातीत विभागला गेला तर कमकुवत व्हाल, त्यामुळे एक आहात तर सेफ आहात असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४dhule-city-acधुळे शहरnorth maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसOBCअन्य मागासवर्गीय जातीSC STअनुसूचित जाती जमाती