शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
2
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
3
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
4
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
5
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
6
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
7
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
8
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
9
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
10
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
11
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
12
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
13
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
14
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
15
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
16
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
17
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
18
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
19
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
20
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

माघार, अश्रूसंताप अन् अंत्ययात्रा... नाट्यमय घडामोडींनी गाजला सोमवार; कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसने उमेदवार बदलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 06:55 IST

Maharashtra Assembly Election 2024 : उद्धवसेनेच्या उमेदवाराची छ.संभाजीनगरमध्ये माघार, लगेच दिला दुसरा पर्याय

मुंबई : सोमवारचा दिवस राज्याच्या राजकारणात नाट्यमय घटनांचा अनुभव देणारा ठरला. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवार शेवटचा दिवस  असून नेत्यांची लगबग आणि धावाधाव बघायला मिळणार आहे. बारामतीत उमेदवारी अर्ज भरताना उपमुख्यमंत्री अजित पवार भावूक झाले.

औरंगाबाद मध्य मतदारसंघात उद्धव सेनेच्या उमेदवाराने माघार घेतली, दोन तासात नवीन उमेदवार दिला गेला. काटोलमध्ये अनिल देशमुख यांच्याऐवजी शरद पवार गटाने पुत्र सलिल यांना उमेदवारी दिली. कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसने उमेदवार बदलत मधुरिमा छत्रपती यांना संधी दिली. शिंदेसेनेने उमेदवारी नाकारलेले श्रीनिवास वनगा आणि त्यांच्या पत्नीने संतापाला वाट मोकळी करून दिली. लातूर शहरात एका अपक्ष उमेदवाराने स्वत:ची ‘अंत्ययात्रा’ काढली.

...अन् अजित पवारांचे डाेळे पाणावलेबारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराचा नारळ फोडला त्यावेळी भावूक होत लोकसभेला माझं चुकलं अशी कबुली देत ‘लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा’, अशी साद मतदारांना घातली. आई सांगत होती, माझ्या ‘दादा’च्या विरोधात कोणीही फॉर्म भरू नका...असे सांगताना त्यांनी आवंढा गिळत मनाला सावरले.

औरंगाबाद ‘मध्य’तून तनवाणींची माघारऔरंगाबाद मध्य मतदारसंघातून उद्धवसेनेचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत घेत निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. उद्धवसेनेने तडकाफडकी बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी घोषित केली. 

पत्ता कट झाल्याने आमदार वनगा ढसाढसा रडले उमेदवारीचा पत्ता कट झाल्याने पालघरचे शिंदेसेनेचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांनी माध्यमांपुढे ओक्साबोक्सी रडतच मनातील संतापाला वाट मोकळी करुन दिली. प्लॅनिंग करून माझा घात केला. यांना प्रामाणिक काम करणारा माणूस नको, तर लबाडी करणारा, हप्ते गोळा करणारा माणूस हवा होता, पण मी ते करू शकणार नसल्यानेच माझा पत्ता कट केला, असे त्यांनी रडत रडतच सांगितले.पालघर, बोईसर आणि डहाणू या तीन ठिकाणी महायुतीने उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आपला पत्ता कट झाल्याने पालघरचे आ. वनगा रविवारपासून नैराश्यामध्ये असून सारखे आत्महत्या करण्याच्या गोष्टी करत असल्याची माहिती वनगा यांच्या पत्नीने पत्रकार परिषदेत दिली.

स्वत:ची काढली अंत्ययात्रालातूर शहर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार लालासाहेब शेख यांनी अर्ज दाखल करताना सोमवारी स्वतःची अंत्ययात्रा काढून काँग्रेस आणि भाजपला विरोध दर्शविला. उमेदवार लालासाहेब शेख म्हणाले, मी जनतेसमोर समस्या मांडत आहे. माझा मोर्चा काँग्रेस आणि भाजपच्या विरोधात आहे. आमदार अमित देशमुख आमची मते घेतात; पण आमच्यासाठी काम करत नाहीत. मुस्लिमांच्या प्रश्नांवर त्यांचे मौन आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी