शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 18:18 IST

रुसला असाल, नाराज असाल तर सोडून द्या, नवीन परिवर्तनाकडे चला. महाराष्ट्रातले जे राजकारणावरचे अभ्यासक आहे, नियोजन करणारे त्यांनीही या असं जरांगे यांनी सांगितले. 

जालना - दलित, मुस्लीम अन् मराठा एकत्र आलाय हे फायनल...ही आनंदाची वार्ता मराठ्यांमध्ये गेली. मुस्लीम आणि दलित एकत्र आहेत, मराठ्यांचे मतदान विभागले जात होते. आता मराठा, मुस्लीम आणि दलित एकत्र झाल्याने कुणी आपल्या जागा पाडू शकणार नाही. नेत्याला आणि पक्षाला मतदान करायचं नाही. आमचा शिक्का चालणारच...तुम्हाला शेतकरी, गोरगरिब ओबीसी, मराठा मोठा करायचाय तर एकही मत वाया जाता कामा नये. मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदानाच्या दुसऱ्या दिवशी ३ दिवस सुट्टी काढायची, गावात मतदानाला यायचे, शांततेत मतदान करायचे आणि माघारी यायचे. ७५ वर्षातून ही संधी मिळाली ती वाया जाऊन द्यायची नाही असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लीम, दलित आणि मराठा समाजाला केले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, एका जातीवर राज्यात कुणीही निवडणूक जिंकू शकत नाही, मग मराठा असो वा कुणीही..राजकारण ही सोपी गोष्ट नाही. समाजकारणात ठीक आहे. एखादा समुदाय जमवंणं, मागणी करणं हे वेगळे. आता राजकीय प्रवास करायचा असला तर सगळ्या जातीधर्मांशिवाय पर्याय नाही. त्यासाठी हे समीकरण जुळवण्याचा प्रयत्न सुरू होता. काही जुळवून देत नव्हते. फूट पाडायचा प्रयत्न करत होते. शेवटच्या टप्प्यात आम्ही एकत्र आलोय. आम्हाला आरक्षण देत नाही. या लोकांना मराठा नको, केवळ मराठा मतदानापुरता हवाय. कारखाने, शाळा सगळे या लोकांचे आहेत. आजच नाही पहिल्यापासून आम्हाला हे जगू देत नाही. नेता नको, पक्ष नको, आम्ही कुणाला मोठे करणार नाही. ट्रोलिंगचा फरक नाही. मराठ्यांची पोरं कच्ची नाहीत, मुस्लीम आणि दलित पोरंही आता रपारप सुरू होणार...तुम्ही जे करतायेत तेच आम्ही करतो. निवडणुकीला तुम्हाला अधिकार आहे उभं राहण्याचा तसा आम्हालाही आहे. कोण कुणाला हरवतं ते बघायचं असं चॅलेंजही मनोज जरांगे पाटलांनी महायुती आणि महाविकास आघाडीला दिले. 

तसेच  एक शिक्का चालवायचा. आपल्या जातीची पोरं वाचवायची. एकमेकांच्या अंगावर जायचं नाही. जर शिव्या दिल्या तर लहान भावाने दिल्या समजून पुढे जायचं. दलितांनाही एक शिक्का चालू द्या. वाद घालत बसायचं नाही. तुम्ही एकदिलाने एकत्र राहिला तर ७० वर्षात बघितलेले स्वप्न आता साकार होणार. ४ तारखेपर्यंत मराठा बांधवांना विनंती आहे, कुणीही अंतरवालीकडे येऊ नका. मला मोकळा वेळ द्या. इच्छुकांनी जास्त ताणू नका, एक इच्छुक उभा करायचा आणि इतरांना अनेक संधी आहेत. जिल्हा परिषद, नगरपरिषद, मार्केट, महामंडळे सगळे पुढे आहे. २-२ मंत्री करू, ७-८ उपमुख्यमंत्री करू, मुस्लीम, दलित, धनगर, मराठा, लिंगायत, ओबीसी सर्वांचा उपमुख्यमंत्री करूया. रुसला असाल, नाराज असाल तर सोडून द्या, नवीन परिवर्तनाकडे चला. महाराष्ट्रातले जे राजकारणावरचे अभ्यासक आहे, नियोजन करणारे त्यांनीही या. आजपासून सावध राहा. मुस्लीम, मराठा आणि दलित एकत्र आल्याने घराघरात मराठ्यांना आनंद आहे. आमचं आरक्षण हिसकवणाऱ्यांना सुट्टी नाही. आमच्यावर गोळ्या घालणाऱ्यांना सुट्टी नाही असा इशारा जरांगेंनी दिला. 

दरम्यान, मला आधी १०० एकर सभेला पुरत नव्हते, आता ५०० एकर लागेल, सगळं लफडं एकत्र, सगळी कामं बंद जिथं सभा असेल तिथे सर्वांनी यायचं. एवढी शक्ती दाखवायची. पहिल्याच सभेत अख्खा महाराष्ट्र जळमळून गेला पाहिजे. पहिली सभा जिथं असेल तिथल्या जिल्ह्यातील एकही मराठा, दलित, मुस्लीम घरी नको. जातीवंत मुस्लीम, जातीवंत दलित असाल तर सभेला यायचं. १०० किमी वाहतूक कोंडी झाली पाहिजे. तुफान गर्दी करायची असं आवाहन जरांगेंनी केले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलmarathaमराठाMuslimमुस्लीमMaratha Reservationमराठा आरक्षण