शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

"…हा आमचा फायदा आहे का?’’, मनोज जरांगे पाटलांचा महायुती सरकारला बोचरा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 14:13 IST

Maharashtra Assembly Election 2024: देणारा कोण आणि फसवणारा कोण, हे समजून घ्यावं, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केला होता. त्याला आता मनोज जरांगे पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत महायुती सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुती आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आमने सामने आले आहेत. आज झालेल्या महायुती सरकारच्या संयुक्त पत्रकार परिषदेमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देणारा कोण आणि फसवणारा कोण, हे समजून घ्यावं, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांना केला होता. त्याला आता मनोज जरांगे पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत महायुती सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाबाबत प्रश्न विचारला असता त्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आता आम्हाला त्या विषयावर बोलायचंच नाही आहे. आता विषय वेगळा आहे. कारण आता मराठा आरक्षण विषयावर बोलून उपयोग नाही. आता समाजाला कळतंय, समाजाला सगळं माहिती आहे. सरकारने टाकलेल्या खटल्यांमधून किती फायदा झाला आहे. एक-दीड लाख तरुणांचा फायदा झाला आहे. आमच्या मुलांच्या नॉन क्रिमिनल निघेनात, हा पण त्यांनी मोठा फायदा केला आहे. काही खटले खूप मोठे केलेत, हा पण एक फायदाच आहे का? आमच्या हजारो मुलांवर केस झाल्या त्यांना आता नोकरीत जाता येईना, देवेंद्र फडणवीस यांनी हे मराठ्यांवर उपकार केले आहेत, अखा खोचक टोला जरांगे पाटील यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, आमच्यावर खटले दाखल केले हा आमचा फायदाच आहे का? आमच्यावर गोळ्या झाडल्या, हा आमचा फायदाच आहे का? सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी लागू नाही झाली, हा फायदाच आहे का? देवेंद्र फडणवीस यांनी आमची सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी होऊ दिली नाही, हा फायदा आहे का? सातारा संस्थानचं, बॉम्बे गव्हर्मेंटचं, हैदराबाद संस्थानचं गॅझेट फडणवीस यांनी लागू होऊ दिलं नाही, हा काय आमचा फायदा आहे का? अशी प्रश्नांची सरबत्तीच जरांगे पाटील यांनी यावेळी महायुती सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

जरांगे पाटील पुढे म्हणाले की, आम्हाला महाविकास आघाडीकडून लिहून आणा म्हणाले आणि आता १५ जाती ओबीसींच्या आरक्षणात घातल्या. आमच्या पोरांचं वाटोळं केलं, हा आमचा फायदा आहे का? आमच्या हजारो कुणबी नोंदी निघाल्यात, त्याची प्रमाणपत्रं आहेत. तिथले अधिकारी देत नाही आहेत, फडणवीस यांनी तेही रोखलंय, हा आमचा फायदा आहे का, अशी विचारणा जरांगे पाटील यांनी महायुती सरकारकडे केली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुतीMaratha Reservationमराठा आरक्षण