शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

"…हा आमचा फायदा आहे का?’’, मनोज जरांगे पाटलांचा महायुती सरकारला बोचरा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 14:13 IST

Maharashtra Assembly Election 2024: देणारा कोण आणि फसवणारा कोण, हे समजून घ्यावं, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केला होता. त्याला आता मनोज जरांगे पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत महायुती सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुती आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आमने सामने आले आहेत. आज झालेल्या महायुती सरकारच्या संयुक्त पत्रकार परिषदेमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देणारा कोण आणि फसवणारा कोण, हे समजून घ्यावं, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांना केला होता. त्याला आता मनोज जरांगे पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत महायुती सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाबाबत प्रश्न विचारला असता त्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आता आम्हाला त्या विषयावर बोलायचंच नाही आहे. आता विषय वेगळा आहे. कारण आता मराठा आरक्षण विषयावर बोलून उपयोग नाही. आता समाजाला कळतंय, समाजाला सगळं माहिती आहे. सरकारने टाकलेल्या खटल्यांमधून किती फायदा झाला आहे. एक-दीड लाख तरुणांचा फायदा झाला आहे. आमच्या मुलांच्या नॉन क्रिमिनल निघेनात, हा पण त्यांनी मोठा फायदा केला आहे. काही खटले खूप मोठे केलेत, हा पण एक फायदाच आहे का? आमच्या हजारो मुलांवर केस झाल्या त्यांना आता नोकरीत जाता येईना, देवेंद्र फडणवीस यांनी हे मराठ्यांवर उपकार केले आहेत, अखा खोचक टोला जरांगे पाटील यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, आमच्यावर खटले दाखल केले हा आमचा फायदाच आहे का? आमच्यावर गोळ्या झाडल्या, हा आमचा फायदाच आहे का? सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी लागू नाही झाली, हा फायदाच आहे का? देवेंद्र फडणवीस यांनी आमची सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी होऊ दिली नाही, हा फायदा आहे का? सातारा संस्थानचं, बॉम्बे गव्हर्मेंटचं, हैदराबाद संस्थानचं गॅझेट फडणवीस यांनी लागू होऊ दिलं नाही, हा काय आमचा फायदा आहे का? अशी प्रश्नांची सरबत्तीच जरांगे पाटील यांनी यावेळी महायुती सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

जरांगे पाटील पुढे म्हणाले की, आम्हाला महाविकास आघाडीकडून लिहून आणा म्हणाले आणि आता १५ जाती ओबीसींच्या आरक्षणात घातल्या. आमच्या पोरांचं वाटोळं केलं, हा आमचा फायदा आहे का? आमच्या हजारो कुणबी नोंदी निघाल्यात, त्याची प्रमाणपत्रं आहेत. तिथले अधिकारी देत नाही आहेत, फडणवीस यांनी तेही रोखलंय, हा आमचा फायदा आहे का, अशी विचारणा जरांगे पाटील यांनी महायुती सरकारकडे केली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुतीMaratha Reservationमराठा आरक्षण