शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"…हा आमचा फायदा आहे का?’’, मनोज जरांगे पाटलांचा महायुती सरकारला बोचरा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 14:13 IST

Maharashtra Assembly Election 2024: देणारा कोण आणि फसवणारा कोण, हे समजून घ्यावं, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केला होता. त्याला आता मनोज जरांगे पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत महायुती सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुती आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आमने सामने आले आहेत. आज झालेल्या महायुती सरकारच्या संयुक्त पत्रकार परिषदेमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देणारा कोण आणि फसवणारा कोण, हे समजून घ्यावं, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांना केला होता. त्याला आता मनोज जरांगे पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत महायुती सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाबाबत प्रश्न विचारला असता त्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आता आम्हाला त्या विषयावर बोलायचंच नाही आहे. आता विषय वेगळा आहे. कारण आता मराठा आरक्षण विषयावर बोलून उपयोग नाही. आता समाजाला कळतंय, समाजाला सगळं माहिती आहे. सरकारने टाकलेल्या खटल्यांमधून किती फायदा झाला आहे. एक-दीड लाख तरुणांचा फायदा झाला आहे. आमच्या मुलांच्या नॉन क्रिमिनल निघेनात, हा पण त्यांनी मोठा फायदा केला आहे. काही खटले खूप मोठे केलेत, हा पण एक फायदाच आहे का? आमच्या हजारो मुलांवर केस झाल्या त्यांना आता नोकरीत जाता येईना, देवेंद्र फडणवीस यांनी हे मराठ्यांवर उपकार केले आहेत, अखा खोचक टोला जरांगे पाटील यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, आमच्यावर खटले दाखल केले हा आमचा फायदाच आहे का? आमच्यावर गोळ्या झाडल्या, हा आमचा फायदाच आहे का? सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी लागू नाही झाली, हा फायदाच आहे का? देवेंद्र फडणवीस यांनी आमची सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी होऊ दिली नाही, हा फायदा आहे का? सातारा संस्थानचं, बॉम्बे गव्हर्मेंटचं, हैदराबाद संस्थानचं गॅझेट फडणवीस यांनी लागू होऊ दिलं नाही, हा काय आमचा फायदा आहे का? अशी प्रश्नांची सरबत्तीच जरांगे पाटील यांनी यावेळी महायुती सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

जरांगे पाटील पुढे म्हणाले की, आम्हाला महाविकास आघाडीकडून लिहून आणा म्हणाले आणि आता १५ जाती ओबीसींच्या आरक्षणात घातल्या. आमच्या पोरांचं वाटोळं केलं, हा आमचा फायदा आहे का? आमच्या हजारो कुणबी नोंदी निघाल्यात, त्याची प्रमाणपत्रं आहेत. तिथले अधिकारी देत नाही आहेत, फडणवीस यांनी तेही रोखलंय, हा आमचा फायदा आहे का, अशी विचारणा जरांगे पाटील यांनी महायुती सरकारकडे केली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुतीMaratha Reservationमराठा आरक्षण