शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

"आमचे १० आमदार निवडून आले तर..."; १० वर्षांनी महाराष्ट्रात आलेल्या अकबरुद्दीन ओवैसींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 15:20 IST

छत्रपती संभाजीनगर येथे एमआयएम उमेदवारांच्या प्रचारासाठी अकबरुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा घेण्यात आली. या सभेतून ओवैसींनी महायुतीसह महाविकास आघाडीवर टीका केली. 

छत्रपती संभाजीनगर - महाराष्ट्राच्या राजकारणात इम्तियाज जलील यांच्यासह अकबरुद्दीनही खांद्याला खांदा लावून उभा राहणार. औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर असो वा मुंबई हा अकबरुद्दीन ओवैसी कायम इथं येत राहणार. जीवनात मी कधीही मत मागितले नाही पण यंदाच्या निवडणुकीत तुम्ही तुमचं मत माझ्या सहकाऱ्यांना द्या. तुमच्या प्रत्येक समस्येत मी तुमच्यासोबत राहणार. जर आपले १० आमदार निवडून आले तर ना ठाकरे ना शिंदे, ना गांधी, ना पवार आमच्याशिवाय कुणी सत्ता बनवू शकत नाही. ही सुवर्णसंधी आहे असं सांगत एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी महायुतीसहमहाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे.

छत्रपती संभाजीनगर याठिकाणी अकबरुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी ते म्हणाले की, १० वर्षांनी मी पुन्हा महाराष्ट्रात आलोय. जेव्हा मी १० वर्षाआधी महाराष्ट्रात आलो तेव्हा इम्तियाज जलील नव्हते, वारिस पठाण नव्हते, आमचे मालेगाव, धुळे इथले आमदार नव्हते. जेव्हा हे लोक निवडून आले त्यांनी जबाबदारीने एमआयएमचं नेतृत्व पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. आज १० वर्षांनी मी आलोय ते या लोकांच्या पाठीमागे मजबुतीने उभा राहून MIM चा झेंडा सांभाळण्यासाठी आलोय. अकबरुद्दीन ओवैसी कधी कुठल्याही लालसेची गरज नाही. नेतृत्व येईल आणि जाईल, जमात महत्त्वाचा आहे. आज परीक्षेची वेळ आहे. जवळपास ४ हजार उमेदवार त्यांचे नशीब आजमवत आहेत. १० वर्षापूर्वी भाजपा - शिवसेना होती आणि राष्ट्रवादी- काँग्रेस, , समाजवादी पक्ष होता मात्र आज काँग्रेस आहे, २ राष्ट्रवादी आहेत, २ शिवसेना आहेत, शिंदे सेना, ठाकरेसेना...हिंदुत्व बोलणारी शिवसेना-भाजपा पक्ष, आता हिंदुत्व विचारधारेच्या शिवसेनेचे २ तुकडे झाले. आता काँग्रेस आणि शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना जवळ केले. तीन पक्षांची आघाडी बनली. उद्धव ठाकरे हिंदुत्वाचा धडा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना शिकवण्यात यशस्वी झाले की नाही...राहुल गांधी प्रियंका गांधी हे पुरोगामित्वाचे धडे उद्धव ठाकरेंना देण्यात यशस्वी झाले की नाही? हा माझा प्रश्न आहे असा त्यांनी म्हटलं. 

त्याशिवाय अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांना समजून घेतले की भाजपाने दोघांना समजून घेतले..? कुठे आहे विचारधारा...यांच्याकडे विचारधारा नाही, धोरण नाही फक्त सत्तेची खुर्ची हवीय. आमचं काम लोकांची मने जिंकणे आहे. सत्तेवर बसून मज्जा लुटणारे आम्ही नाही. आम्ही खऱ्या अर्थाने समाजाचा आवाज संसद असो वा विधानसभा तिथे उचलून धरतो. अकबरुद्दीन ओवैसी मी मुसलमान आहे, मला मुस्लीम असल्याचा गर्व आहे आणि हिंदुस्तानी असल्याचा अभिमान आहे. आम्ही मुस्लिमांचा आवाज बनून मुस्लिमांची समस्या जाणतो. मुस्लिमांच्या हक्कासाठी लढतो. अन्यायाविरोधात उभे राहतो. पण मागासवर्गीयांना ताकद देणे, जो मागे आहे त्याला पुढे आणणं हे नेतृत्वाचं काम आहे. मागासवर्गीयांना ताकद देणे हा आमचा विचार आहे. आम्ही भडकाऊ भाषण करत नाही. आम्ही हक्काचं बोलतो, आमच्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नसतात म्हणून त्याला भडकाऊ बोललं जातं असा टोलाही अकबरुद्दीन ओवैसींनी विरोधकांना लगावला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी