शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

"काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है"', नरेंद्र मोदी यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 07:08 IST

Maharashtra Assembly Election 2024: एससी, एसटी आणि ओबीसी या जाती-जातींमध्ये भांडण लावण्याचा खतरनाक खेळ काँग्रेस देशात आणि राज्यात खेळत आहे. हा समाज एकत्र आला तर आपले राजकीय दुकान बंद होईल, अशी भीती काँग्रेसला वाटत आहे, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

धुळे/नाशिक - एससी, एसटी आणि ओबीसी या जाती-जातींमध्ये भांडण लावण्याचा खतरनाक खेळ काँग्रेस देशात आणि राज्यात खेळत आहे. हा समाज एकत्र आला तर आपले राजकीय दुकान बंद होईल, अशी भीती काँग्रेसला वाटत आहे, असा घणाघाती आरोप करीत 'एक है तो सेफ है', असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या प्रचार शुभारंभप्रसंगी दिला. महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाके आहेत, ना ब्रेक आणि गाडीचा ड्रायव्हर बनण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. 

महायुतीच्या धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांनी दोन सभा घेतल्या. धुळ्याच्या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार अमरिशभाई पटेल आदींसह उमेदवार उपस्थित होते. काँग्रेसने नेहमी दहशतवादाला संरक्षण दिल्याची टीका मोदींनी यावेळी केली.

सावरकर, बाळासाहेबांच्या प्रशंसेचे आव्हान: स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान मोठे असतानाही काँग्रेस त्यांची कधीच प्रशंसा करत नाही. त्यामुळे उद्धवसेनेने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून सार्वजनिक सभेत या दोघांची प्रशंसा करून दाखवावी, असे आव्हान मोदी यांनी दिले. 

पोलिस दलात २५ हजार युवतींची भरती, मुंबईत नवे मोठे विमानतळ: मुंबईत वाढवण बंदरासोबतच एक नवे मोठे विमानतळ बांधणार तसेच १५ नोव्हेंबरपासून वर्षभर बिरसा मुंडा यांची १५०वी जयंती देशात उत्साहात साजरी करण्यासोबतच राज्य पोलिस दलात २५ हजार युवतींची भरती करण्याच्या घोषणाही मोदी यांनी केल्या.  

हिमाचल, कर्नाटक, तेलंगणात सर्व आश्वासने फिरविलीमहाराष्ट्रात दुसऱ्या अडीच वर्षांच्या कालावधीत   महायुती सरकारने अनेक विकास योजना राबविल्या. लाडकी बहीण योजनेची तर देशभरात चर्चा आहे. काँग्रेस पक्षाला महाराष्ट्राची प्रगती सहन होत नसल्याने आघाडी समवेत ते सत्तेवर आल्यास या चांगल्या कल्याणकारी योजना बंद करतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.राज्यात महायुती असेल तरच प्रगती होईल असे मोदी यांनी, राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आल्यास चांगल्या योजनांना खीळ बसेल. यापूर्वीही समृद्धी महामार्गासह अनेक योजनांना काँग्रेस आघाडी सरकारने खीळ घातली होती. सत्ता मिळाल्यानंतर काँग्रेसने हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा येथे सर्व आश्वासने फिरविली. महाराष्ट्रात असेच करणार, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांना वीज बिल मुक्ती दिली : फडणवीस राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयात ८ हजार कोटींचा विमा दिला आहे, तसेच शेतकऱ्यांचे १०० टक्के वीज बिल माफ केले आहे. तसेच, पुढील पाच वर्षांसाठी शेतकऱ्यांना वीज बिल मुक्ती दिली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर वन: देशात आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीत महाराष्ट्र गेल्या दोन वर्षांपासून नंबर वनवर आहे. या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत राज्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करण्यात आली आहे, यातून महाराष्ट्राच्या प्रगतीला गती मिळत असल्याचे मोदी म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा