शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 16:43 IST

अमरावती येथे राज ठाकरेंनी सभा घेत मशि‍दीवरील भोंग्यासह हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून जनतेला साद घातली. त्यावरून स्थानिक काँग्रेस खासदार वानखेडेंनी पलटवार केला आहे. 

दर्यापूर - अमरावती येथील सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशि‍दीवरील भोंगे काढण्यावरून विधान केले. या विधानावर काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांनी जोरदार टीका केली. राज ठाकरे यांचे हे वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना काळिमा फासणारे आहे असं खासदारांनी म्हटलं. दर्यापूर येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होती. या सभेत बळवंत वानखेडे यांनी राज यांच्या विधानावर भाष्य केले. 

खासदार बळवंत वानखेडे म्हणाले की, काल राज ठाकरे आले होते, त्यांनी मशि‍दीवरील भोंगे काढण्याचं विधान केले. त्यांची ही घोषणा जुनीच आहे. परंतु वाईट या गोष्टीचे वाटते. त्यांच्या झेंड्यावर छत्रपती शिवरायांची मुद्रा आहे. छत्रपती शिवरायांना अपेक्षित होते, मंदिर असेल त्याच्या बाजूला मशीद असली पाहिजे. आपले जे गडकिल्ले आहेत तिथे मशीद असली पाहिजे हे धोरण छत्रपती शिवरायांचं होते. त्या शिवरायांच्या विचारांना काळिमा फासणारं विधान होते अशी टीका त्यांनी केली. 

त्याशिवाय बडनेरा मतदारसंघात मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर पाहिले, त्याबाजूला जिल्ह्यातील भाभीचे फोटो होते. बाळासाहेब ठाकरेंसोबत फोटो लावण्याची या लोकांना लाज कशी वाटत नाही. ज्यांनी मातोश्री बनवली. त्या मातोश्रीला त्रास देणे, उद्धव ठाकरेंना त्रास देणे हे काम त्यांनी केले. आजपर्यंतच्या उत्कृष्ट मुख्यमंत्र्यांपैकी उद्धव ठाकरे आदर्श मुख्यमंत्री होते. त्यांनी कोरोना काळात सर्वांना सोबत घेऊन केलेले काम, ही किमया त्यांच्यात होती. योगायोगाने काय झाले सगळ्यांना माहिती आहे. ५० खोके हे सगळ्यांना माहिती आहे असं सांगत खासदार बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणांसह एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांवर निशाणा साधला.

दरम्यान, उद्धव ठाकरेंचे मी आभार मानतो, त्यांच्या आशीर्वादाने मी आज लोकसभेत पोहचलो. खऱ्या अर्थाने त्यांचा आशीर्वाद मला लाभला. अमरावती जिल्ह्याची खासदारकी त्यांच्या वाट्याला होती. मात्र त्यांनी मला इथं उमेदवार केले त्यामुळे त्यांचे आभार मानतो. ही लढाई उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी आहे. राज्य वाचवण्यासाठी, देश वाचवण्यासाठी तसेच संविधान वाचवण्यासाठी ही लढाई आहे. आपल्याला महाविकास आघाडी सरकार आणणं गरजेचे आहे. जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. जाहीरनाम्यातील प्रत्येक गोष्ट राबवण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज आहे असा विश्वास खासदार बळवंत वानखेडे यांनी व्यक्त केला.   

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४amravati-acअमरावतीMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज