शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

"जे अर्ज मागे घेणार नाही त्यांना..."; भाजपमधून बंडखोर केलेल्यांना चंद्रशेखर बावनकुळेंनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 14:37 IST

भाजपमधून बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवारांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इशारा दिला आहे.

Chandrashekhar Bawankule : विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधील अनेकांनी बंडखोरी करत, तर काहींनी पक्षाच्या नावावर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार दिल्यानंतरही इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे अधिकृत उमेदवारांची चिंता वाढली आहे. अपक्ष बंडखोर उमेदवारांचे बंड शमविण्यासाठी आता भाजपने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपमधील बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीत भाजप एकूण १५६ जागांवर निवडणूक लढणार आहे. उर्वरित जागा शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्या आहेत. तर ज्या जागांचा प्रश्न सुटलेला नाही त्याजागी महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. मात्र काही ठिकाणी शिंदे गट आणि राष्ट्रवादीने उमेदवार दिल्याने भाजपमधील नाराज इच्छुकांनी बंडखोरी करत महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे  आता सर्व बंडखोरांना भाजपने आपला अर्ज मागे घेण्यास सांगितलं आहे. जे अर्ज मागे घेणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

बंडखोरी थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. "परवा रात्री आमची बैठक झाली. देवेंद्र फडणवीस, मी आणि आमचे सर्व राज्याचे निवडणूक संचालन समिती या बैठकीत होते. सर्व जिल्हाध्यक्ष, नेत्यांना आम्ही सूचना दिल्या आहेत. एकावेळी एका ठिकाणी एकच व्यक्ती लढू शकते," असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे.  "नाराजीतून काहींनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली आहे. माझी विनंती, सूचना यांचे प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी पालन करेल असं मला वाटतं. आपला पक्ष आईसारखा आहे त्यामुळे पक्षावर श्रद्धा ठेवून पक्ष भलं करेल ही भावना ठेवून अर्ज मागे घेण्याची विनंती केली आहे. ज्यांनी अर्ज भरला आहे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते अर्ज मागे घेतील असा १०० टक्के विश्वास आहे. जे मागे घेणार नाहीत त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल," असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.

दरम्यान, बंडखोरांची संख्या यावेळी वाढली असून काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले आहे. दुसरीकडे काँग्रेसने आमच्यात मैत्रीपूर्ण लढती होणार नाही, असा दावा काँग्रेसचे प्रभारी रमेश चैनीथला यांनी केला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे