शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

उमेदवार द्यायचे की पाडायचे? मनोज जरांगे पाटील यांनी घेतला मोठा निर्णय, केली महत्त्वाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 15:35 IST

Maharashtra Assembly Election 2024: जिथे आपला उमेदवार निवडणूक येण्याची शक्यता असेल, तिथे उमेदवार द्यायचे, तर इतर ठिकाणी मराठा आरक्षणाला विरोध असणाऱ्यांना पाडण्याची भूमिका घ्यायची, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलानाचा मतदानावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून आले होते. दरम्यान, आरक्षणाचा प्रश्न न सुटल्याने विधानसभा निवडणुकीसाठी काय भूमिका घ्यायची, याबाबतचा निर्णय २० ऑक्टोबर रोजी घेण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी घेतली होती. त्यानुसार मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार द्यायचे की पाडायचे याबाबतचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. जिथे आपला उमेदवार निवडणूक येण्याची शक्यता असेल, तिथे उमेदवार द्यायचे, तर इतर ठिकाणी मराठा आरक्षणाला विरोध असणाऱ्यांना पाडण्याची भूमिका घ्यायची, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तसेच एससी-एसटी आरक्षण असलेल्या ठिकाणी उमेदवार द्यायचे नाहीत, मात्र तिथे आपल्या भूमिकेला पाठिंबा असणाऱ्यांच्या मागे उभं राहायचं, अशी घोषणाही जरांगे पाटील यांनी केली आहे.

याबाबत आज मराठा आंदोलकांच्या उपस्थितीत मोठी घोषणा करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आपल्यावरती जाणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यांना वाटतंय की यांच्या हातातून हे संपले तर बरं होईल. आपल्या हातानं आपल्याला संपवायचं नाही, म्हणून काही तरी वेगळा मार्ग काढायचा आहे. तुम्हाला सांगतो गाफील राहू नका, आपला पराभव झाला तर आपल्याला एकमेकांच्या तोंडाकडेही बघावं असं वाटणार नाही, असं हे लोक आपल्याला हसतील. तुम्हाला हरवणं मला परवडणारी नाही. महायुती आणि महाविकास आघाडी हे दोघेही चाबरे आहेत. यांच्या याद्या दिल्लीत पडून आहेत. आम्ही काय निर्णय घेतो, याची हे वाट पाहत आहेत. प्रत्येक मतदारसंघात आपलं एक लाखाचं मतदान आहे. एक लाखाची लीड कशीच तुटत नाही. यश अपयश प्रत्येक बाबतीत असतं. जर आपणं उमेदवार उभे केले आणि ते पराभूत झाले, तर माझ्या आंदोलनाचं काय, माझ्या समाजाचं काय? असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित आंदोलकांना केला. 

पक्षाकडून आणि नेत्याकडून बोलायचं बंद करा. समाज डोळ्यासमोर धरा. समाजाचं काय होईल हे डोळ्यासमोर धरा. आपल्याला आजच मार्ग काढायचा आहे. असं सांगत जरांगे पाटील पुढे म्हणाले की,    आपण विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार दिले तर भाजपा खूश होईल. तसेच उमेदवार दिले नाही तर महाविकास आघाडीला आनंद होईल. मात्र मराठा आरक्षणाबाबत दोघेही काही स्पष्ट बोललेले नाहीत. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जिथे मराठा समाजाचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता असेल, तिथे आपण उमेदवार जाहीर करू. मात्र इतर ठिकाणी जिथे आपले उमेदवार नसतील, तेथील जो उमेदवार मी तुमच्या सर्व मागण्यांशी सहमत आहे, असं ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देईल, त्याला पाठिंबा देऊ, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. तसेच एससी, एसटींसाठी आरक्षित जागेवर आपण उमेदवार द्यायचे नाहीत. मात्र तिथे आपल्या आंदोलनाला पाठिंबा असणाऱ्या उमेदवाराच्या मागे उभं राहायचं, अशी घोषणाही त्यांनी केली. 

जरांगे पाटील यांनी पुढे सांगितले की, उमेदवार देताना आपल्याला कुठे मराठ्यांची ताकद आहे आणि कुठे मुस्लिमांची ताकद आहे, त्याचं गणित जुळवून पाहवं लागणार आहे. कारण अशी समीकरणं जुळवणं आवश्यक आहेत. मी अशी समीकरणं जुळवून पाहत आहे. आता तुम्हीही विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरून टाका. मात्र मी अर्ज मागे घ्या, म्हटलं की, अर्ज मागे घ्यायचा, अशी सक्त सूचनाही मनोज जगांरे पाटील यांनी दिली.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी