शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

“उद्धव ठाकरे केवळ २ वेळा आले, भेटीसाठी १० मिनिटे वेळ दिला नाही”; महंतांचा ठाकरे गटाला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 12:41 IST

Maharashtra Assembly Election 2024: पक्षवाढीसाठी राज्यभर दौरे केले. बंजारा समाजात नवचैतन्य आणले. गेल्या १० महिन्यात हजारो मेसेज, फोन केले. परंतु, भेटीबाबत अद्यापही कोणताचा रिप्लाय आला नाही, असा दावा बंजारा समाजाच्या महंतांनी केला आहे.

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, राजकीय घडामोडींना मोठा वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाने ९९ जणांची यादी जाहीर करत बाजी मारल्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि मनसेने उमेदवारी यादी जाहीर केली आहे. यानंतर आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यातच महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अखेर ठरला असून, लवकरच उमेदवारी यादी येऊ शकते, असे म्हटले जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बंजारा समाजाच्या महंतांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १३ खासदार आणि ४० आमदारांनी बंडखोरी केली आणि नवीन पक्ष स्थापन केला. उद्धव ठाकरे यांच्याकडून केवळ पक्ष नव्हे, तर पक्षचिन्हही हिसकावून घेतले. अशा परिस्थिती प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमेचे नेते उद्धव ठाकरे यांना सहकार्य करावे. समाजाचे त्यांच्या माध्यमातून भले व्हावे, समाजाला न्याय मिळावा, या उद्देशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला. यानंतर पक्षवाढीसाठी राज्यभर दौरे केले. समाजात नवचैतन्य निर्माण केले, असा दावा पोहरादेवी येथील बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी केला. 

गेल्या १० ते १२ महिन्यांपासून मला एकदाही वेळ दिलेली नाही

एका बाजूला माझे हे काम सुरू असताना उद्धव ठाकरे एकदा पोहरादेवीच्या दर्शनाला आले. त्यानंतर जनसंवाद यात्रेला संबोधित करण्यासाठी करंजा, वाशिमला आले. अनेकदा उद्धव ठाकरे यांना मेसेज केले. पक्षवाढीसाठी आणि समाजाच्या हितासाठी आम्हाला एकदा तुमची भेट हवी आहे. उद्धव ठाकरे यांच्या पीए यांना हजारो वेळा मेसेज टाकले, फोन केले. परंतु, गेल्या १० ते १२ महिन्यांपासून मला एकदाही वेळ दिलेली नाही. माझ्या फोनना, मेसेजला, विनंतीला कोणताच रिप्लाय देण्यात आलेला नाही, अशी हकिकत महंत सुनील महाराज यांनी कथन केली.

दरम्यान,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली असली तरी ते खरोखरच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे आहे, हे माझ्या लक्षात आले. विधानसभा निवडणुकीची तिकीटे, उमेदवारी जाहीर होत आहे. परंतु, ठाकरे गटाची बंजारा समाजाला प्रतिनिधित्व द्यायची तयारी किंवा इच्छा दिसत नाही. शरद पवार यांनी बंजारा समाजाच्या दोन जणांना उमेदवारी दिली आहे, त्याबाबत त्यांचे आभार मानतो. परंतु, ठाकरे गटात बंजारा समाजाला न्याय मिळाला नाही. त्यामुळे ठाकरे गटातून बाहेर पडत आहे, असे महंत सुनील महाराज यांनी स्पष्ट केले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंजारा महंत सुनील महाराज  यांनी हा निर्णय घेतल्याने याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना