शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

“उद्धव ठाकरे केवळ २ वेळा आले, भेटीसाठी १० मिनिटे वेळ दिला नाही”; महंतांचा ठाकरे गटाला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 12:41 IST

Maharashtra Assembly Election 2024: पक्षवाढीसाठी राज्यभर दौरे केले. बंजारा समाजात नवचैतन्य आणले. गेल्या १० महिन्यात हजारो मेसेज, फोन केले. परंतु, भेटीबाबत अद्यापही कोणताचा रिप्लाय आला नाही, असा दावा बंजारा समाजाच्या महंतांनी केला आहे.

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, राजकीय घडामोडींना मोठा वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाने ९९ जणांची यादी जाहीर करत बाजी मारल्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि मनसेने उमेदवारी यादी जाहीर केली आहे. यानंतर आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यातच महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अखेर ठरला असून, लवकरच उमेदवारी यादी येऊ शकते, असे म्हटले जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बंजारा समाजाच्या महंतांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १३ खासदार आणि ४० आमदारांनी बंडखोरी केली आणि नवीन पक्ष स्थापन केला. उद्धव ठाकरे यांच्याकडून केवळ पक्ष नव्हे, तर पक्षचिन्हही हिसकावून घेतले. अशा परिस्थिती प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमेचे नेते उद्धव ठाकरे यांना सहकार्य करावे. समाजाचे त्यांच्या माध्यमातून भले व्हावे, समाजाला न्याय मिळावा, या उद्देशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला. यानंतर पक्षवाढीसाठी राज्यभर दौरे केले. समाजात नवचैतन्य निर्माण केले, असा दावा पोहरादेवी येथील बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी केला. 

गेल्या १० ते १२ महिन्यांपासून मला एकदाही वेळ दिलेली नाही

एका बाजूला माझे हे काम सुरू असताना उद्धव ठाकरे एकदा पोहरादेवीच्या दर्शनाला आले. त्यानंतर जनसंवाद यात्रेला संबोधित करण्यासाठी करंजा, वाशिमला आले. अनेकदा उद्धव ठाकरे यांना मेसेज केले. पक्षवाढीसाठी आणि समाजाच्या हितासाठी आम्हाला एकदा तुमची भेट हवी आहे. उद्धव ठाकरे यांच्या पीए यांना हजारो वेळा मेसेज टाकले, फोन केले. परंतु, गेल्या १० ते १२ महिन्यांपासून मला एकदाही वेळ दिलेली नाही. माझ्या फोनना, मेसेजला, विनंतीला कोणताच रिप्लाय देण्यात आलेला नाही, अशी हकिकत महंत सुनील महाराज यांनी कथन केली.

दरम्यान,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली असली तरी ते खरोखरच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे आहे, हे माझ्या लक्षात आले. विधानसभा निवडणुकीची तिकीटे, उमेदवारी जाहीर होत आहे. परंतु, ठाकरे गटाची बंजारा समाजाला प्रतिनिधित्व द्यायची तयारी किंवा इच्छा दिसत नाही. शरद पवार यांनी बंजारा समाजाच्या दोन जणांना उमेदवारी दिली आहे, त्याबाबत त्यांचे आभार मानतो. परंतु, ठाकरे गटात बंजारा समाजाला न्याय मिळाला नाही. त्यामुळे ठाकरे गटातून बाहेर पडत आहे, असे महंत सुनील महाराज यांनी स्पष्ट केले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंजारा महंत सुनील महाराज  यांनी हा निर्णय घेतल्याने याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना