शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

उलेमा बोर्डाचं मविआ नेत्यांना पत्र; मुस्लीम आरक्षण, पोलीस भरतीत प्राधान्य अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 12:57 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम संघटनांनी महाविकास आघाडीकडे प्रमुख मागण्या केल्या आहेत. जर मविआ सरकार आलं तर त्या पूर्ण कराव्यात असं ऑल इंडिया उलेमा बोर्डाने म्हटलं आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी ऑल इंडिया उलेमा बोर्डाने महाविकास आघाडीला पत्र लिहून १७ अटी ठेवल्या आहेत. त्या अटींची पूर्तता करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर उलेमा बोर्ड मविआला निवडणुकीत पाठिंबा देणार आहे. बोर्डाने शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना पत्र लिहून त्यांच्या मागण्या ठेवल्या आहेत. त्यात जर महाविकास आघाडीचं राज्यात सरकार आलं तर त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकाचा विरोध करावा, त्याशिवाय आरएसएसवर बंदी आणावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. 

उलेमा बोर्डाने महाराष्ट्रात मुस्लिमांना १० टक्के आरक्षण देण्याची मागणी केली आहे. नितीश राणे यांच्यावर कारवाई करावी असंही पत्रात म्हटलं आहे. महाराष्ट्रात २८८ जागांवर येत्या २० नोव्हेंबरला निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्याचा निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे. त्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे. या निवडणुकीच्या काळात भाजपाकडून सातत्याने महाविकास आघाडीवर व्होट जिहादचा आरोप लावण्यात येत आहे. त्यात ऑल इंडिया उलेमा बोर्डाच्या मागण्यांमुळे मविआवर टीका करण्याची महायुतीला संधी मिळणार आहे.

काय आहेत १७ मागण्या?

  • वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध
  • महाराष्ट्रात नोकरी आणि शिक्षणात मुस्लिमांना १० टक्के आरक्षण
  • महाराष्ट्रातील ४८ जिल्ह्यात मशीद, कब्रस्तान, दर्गा यांच्या जप्त जमिनीवर आयुक्तांकडून सर्व्हे करण्याचे आदेश द्यावेत
  • महाराष्ट्र वक्फ बोर्डाला १००० कोटींचा निधी
  • २०१२ ते २०२४ या काळात दंगलीचा आरोप झालेल्या निर्दोष मुस्लिमांना जेलबाहेर काढावे
  • मौलाना सलमान अजहरी यांना जेलमधून बाहेर काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या ३० खासदारांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहावे
  • महाराष्ट्रातील मशिदीत इमाम आणि मौलाना यांना सरकारकडून दरमहिना १५ हजार रुपये मिळावेत
  • पोलीस भरतीत मुस्लीम युवकांना प्राधान्य द्यावे
  • इंडिया आघाडीकडून रामगिरी महाराज, नितेश राणे यांना जेलमध्ये टाकावे
  • महाराष्ट्रात मविआ सरकार येण्यासाठी ऑल इंडिया उलेमा बोर्डाचे मुफ्ती मौलाना, अलीम हाफिज मशि‍दीच्या इमामाला सरकारी समितीत घ्यावे
  • राज्यातील वक्फ बोर्डात ५०० कर्मचाऱ्यांची भरती करावी
  • राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास आरएसएसवर बंदी आणावी

 

यासारख्या विविध मागण्या ऑल इंडिया उलेमा बोर्डाकडून महाविकास आघाडीकडे करण्यात आल्या आहेत. त्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंना पत्र लिहिण्यात आले आहे. राज्यात ३८ विधानसभा मतदारसंघ असे आहेत जिथे मुस्लीम मतदारांची संख्या निर्णायक आहे. उलेमा बोर्डाच्या या मागण्यांवर महाविकास आघाडीनेही सकारात्मक भूमिका घेतली आहे. याबाबत नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि इतर नेत्यांसोबत आमची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेवर त्यांनी सकारात्मक उत्तर दिले आहे अशी माहिती ऑल इंडिया उलेमा बोर्डाचे महाराष्ट्र चेअरमन नायब अन्सारी यांनी माहिती दिली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेNana Patoleनाना पटोलेMuslimमुस्लीम