शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

उलेमा बोर्डाचं मविआ नेत्यांना पत्र; मुस्लीम आरक्षण, पोलीस भरतीत प्राधान्य अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 12:57 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम संघटनांनी महाविकास आघाडीकडे प्रमुख मागण्या केल्या आहेत. जर मविआ सरकार आलं तर त्या पूर्ण कराव्यात असं ऑल इंडिया उलेमा बोर्डाने म्हटलं आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी ऑल इंडिया उलेमा बोर्डाने महाविकास आघाडीला पत्र लिहून १७ अटी ठेवल्या आहेत. त्या अटींची पूर्तता करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर उलेमा बोर्ड मविआला निवडणुकीत पाठिंबा देणार आहे. बोर्डाने शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना पत्र लिहून त्यांच्या मागण्या ठेवल्या आहेत. त्यात जर महाविकास आघाडीचं राज्यात सरकार आलं तर त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकाचा विरोध करावा, त्याशिवाय आरएसएसवर बंदी आणावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. 

उलेमा बोर्डाने महाराष्ट्रात मुस्लिमांना १० टक्के आरक्षण देण्याची मागणी केली आहे. नितीश राणे यांच्यावर कारवाई करावी असंही पत्रात म्हटलं आहे. महाराष्ट्रात २८८ जागांवर येत्या २० नोव्हेंबरला निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्याचा निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे. त्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे. या निवडणुकीच्या काळात भाजपाकडून सातत्याने महाविकास आघाडीवर व्होट जिहादचा आरोप लावण्यात येत आहे. त्यात ऑल इंडिया उलेमा बोर्डाच्या मागण्यांमुळे मविआवर टीका करण्याची महायुतीला संधी मिळणार आहे.

काय आहेत १७ मागण्या?

  • वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध
  • महाराष्ट्रात नोकरी आणि शिक्षणात मुस्लिमांना १० टक्के आरक्षण
  • महाराष्ट्रातील ४८ जिल्ह्यात मशीद, कब्रस्तान, दर्गा यांच्या जप्त जमिनीवर आयुक्तांकडून सर्व्हे करण्याचे आदेश द्यावेत
  • महाराष्ट्र वक्फ बोर्डाला १००० कोटींचा निधी
  • २०१२ ते २०२४ या काळात दंगलीचा आरोप झालेल्या निर्दोष मुस्लिमांना जेलबाहेर काढावे
  • मौलाना सलमान अजहरी यांना जेलमधून बाहेर काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या ३० खासदारांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहावे
  • महाराष्ट्रातील मशिदीत इमाम आणि मौलाना यांना सरकारकडून दरमहिना १५ हजार रुपये मिळावेत
  • पोलीस भरतीत मुस्लीम युवकांना प्राधान्य द्यावे
  • इंडिया आघाडीकडून रामगिरी महाराज, नितेश राणे यांना जेलमध्ये टाकावे
  • महाराष्ट्रात मविआ सरकार येण्यासाठी ऑल इंडिया उलेमा बोर्डाचे मुफ्ती मौलाना, अलीम हाफिज मशि‍दीच्या इमामाला सरकारी समितीत घ्यावे
  • राज्यातील वक्फ बोर्डात ५०० कर्मचाऱ्यांची भरती करावी
  • राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास आरएसएसवर बंदी आणावी

 

यासारख्या विविध मागण्या ऑल इंडिया उलेमा बोर्डाकडून महाविकास आघाडीकडे करण्यात आल्या आहेत. त्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंना पत्र लिहिण्यात आले आहे. राज्यात ३८ विधानसभा मतदारसंघ असे आहेत जिथे मुस्लीम मतदारांची संख्या निर्णायक आहे. उलेमा बोर्डाच्या या मागण्यांवर महाविकास आघाडीनेही सकारात्मक भूमिका घेतली आहे. याबाबत नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि इतर नेत्यांसोबत आमची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेवर त्यांनी सकारात्मक उत्तर दिले आहे अशी माहिती ऑल इंडिया उलेमा बोर्डाचे महाराष्ट्र चेअरमन नायब अन्सारी यांनी माहिती दिली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेNana Patoleनाना पटोलेMuslimमुस्लीम