शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

५ जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवू, मविआच्या सभेत ठाकरे यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 12:41 IST

Maharashtra Assembly Election 2024: राज्यातील जनतेला सर्व प्रकारचे कर लावून महागाईच्या खाईत लोटणाऱ्या सरकारला सत्तेतून खाली खेचून आम्ही पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर कायम स्थिर ठेवणार आहोत, असे आश्वासन महाविकास आघाडीचे नेते आणि उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले.

मुंबई - राज्यातील जनतेला सर्व प्रकारचे कर लावून महागाईच्या खाईत लोटणाऱ्या सरकारला सत्तेतून खाली खेचून आम्ही पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर कायम स्थिर ठेवणार आहोत, असे आश्वासन महाविकास आघाडीचे नेते आणि उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. ते बुधवारी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या स्वाभिमान सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी महागाईवर आवर घालणे यांना जमलेच नाही, असे म्हणत राज्य सरकार आणि महायुतीवर जोरदार टीका केली. 

स्वाभिमान सभेत मविआच्या सर्व प्रमुख नेत्यांची भाषणे झाली. महिलांसाठी असलेली योजना आम्ही केवळ चालू ठेवणार नाही तर त्यात अधिक भर घालणार असल्याचेही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. ठाकरे पुढे म्हणाले की, आमचे सरकार आल्यानंतर आम्ही राज्यातील मुलांना मोफत शिक्षण देणार असून आम्ही जे करतो तेच बोलतो. प्रत्येक बेरोजगार तरुणाला दर महिन्याला चार हजार रुपयांची मदत करणार असून आता एक तरुण बेरोजगार होईल, त्याचे निकष ठरवावे लागतील, असा टोलाही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना लगावला.

ठाकरे म्हणाले... संविधान वाचवायचे असेल तर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणे गरजेचे आहे.  धारावी अदानीच्या घशात घालायला सरकार निघाले असून सरकार आल्यानंतर ज्या सवलती अदानींना दिल्या आहेत, ते कॉन्ट्रॅक्ट सर्वांत आधी रद्द करणार असून धारावीकरांना जिथल्या तिथे उद्योगाच्या सोयीसह घर देणार. ही निवडणूक केवळ  काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची नाही तर मुंबईचे सुरू असलेले अदानीकरण  थांबवण्यासाठी ही निवडणूक आहे.   फडणवीसांनी मुंब्र्यात मंदिर बांधणार का, म्हणून आम्हाला आव्हान दिले आहे. मुंब्रा ठाणे जिल्ह्यात येतो. त्याच्या जिल्ह्यात जर तुम्हाला छत्रपतींचे मंदिर बांधणे अवघड वाटत असेल तर गद्दाराला डोक्यावर कशाला घेतला?

शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचे कर्ज माफ : शरद पवार राज्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले असून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात महायुती सरकारने फसवणूक केली आहे. आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही सर्व शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करू तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये परतावा दिला जाईल, असे आश्वासन राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी दिले.

बळाचा वापर करून निवडणुका जिंकता येणार नाहीत : पटोलेमहायुती सरकार हे अधिकाऱ्यांचा गैरवापर करत असून पोलिसी बळावर निवडणुका जिंकता येतील, असा यांचा भ्रम असल्याचे पटोले म्हणाले. राहुल गांधी यांनी संविधान जनतेसमोर दाखवल्यानंतर संविधानाच्या पुस्तकाच्या लाल रंगाबाबत हा नक्षलवाद्यांचा रंग असल्याची टीका फडणवीस आणि भाजप यांनी केली आहे. मात्र, लाल रंगाला हिंदू धर्मात मोठे महत्त्व असून हा आपल्या क्रांतीचा रंग आहे. त्यामुळे या रंगाला नक्षलवाद्यांचा रंग म्हणून हिणवू नये, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. 

अचानक लाइट गेलीकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत असताना अचानक सभास्थळावरील वीज खंडित झाली. यामुळे नाना पटोले यांना पाच मिनिटे आपले भाषण थांबवावे लागले. अखेरीस पटोले यांनी ध्वनिक्षेपकाशिवाय भाषण सुरू केले.

नेत्यांच्या आगमनामुळे गोंधळसभा सुरू असताना व्यासपीठावर मुख्य नेते येत होते. जितेंद्र आव्हाड यांचे भाषण सुरू असताना राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांचे व्यासपीठावर आगमन झाल्याने आव्हाड यांना भाषण थांबवावे लागले. तर सभा सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले. मात्र, त्यांच्या आगमनाचे स्वागत करण्यात आले नाही.

राहुल, उद्धव यांचा जयघाेषसभास्थळी काँग्रेस आणि उद्धवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात होते. कारण कार्यकर्त्यांमधून राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा सातत्याने दिल्या जात होत्या. सभेला हजारोंच्या संख्येने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी