शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 16:33 IST

Maharashtra Assembly Election 2024: राज्यातील भाजपाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटातील उमेदवारांबाबत एक सूचक विधान केलं आहे. ठाकरे गटाच्या पहिल्या यादीमधील १७ उमेदवार हे आमचे नेते आहेत, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडीने आपल्या बहुतांश उमेदवारांची घोषणा केली आहे. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत राज्यातील समिकरणं बदललेली असल्याने सर्वच पक्षांमध्ये नाराजी आणि बंडखोरीला उत आला आहे. त्यामुळे पक्षांतरही मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटातील उमेदवारांबाबत एक सूचक विधान केलं आहे. ठाकरे गटाच्या पहिल्या यादीमधील १७ उमेदवार हे आमचे नेते आहेत, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

एनडीटीव्हीने आयोजित कार्यक्रमामध्ये मुलाखतीदरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जेव्हा आपण तडजोड करतो, तेव्हा काही लोकांवर अन्याय होतो. त्याचं दु:खही होतं. कारण पहिली अडीच वर्ष आम्ही २८८ जागांवर लढण्याची तयारी करत होतो. अनेक नेते आम्ही तयार केले. परवा मी पाहत होतो की, उद्धव ठाकरे यांनी जी पहिली यादी प्रसिद्ध केली. त्यामध्ये १७ नेते हे आमचे आहेत. ते आमच्या पक्षातील नेते होते. आता आजच्या काळात राजकारणामध्ये कुणी थांबायला तयार नाही, त्यामुळे त्यातले काही जण सांगतात की साहेब, आता आम्ही एवढी तयारी केली आहे आणि तुम्ही उमेदवारी मित्रपक्षाला दिली. आम्ही निष्ठावंतच आहोत. मात्र आता आम्ही संधी मिळेल तिथून लढतो, अशी माहिती त्यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकारणामध्ये आपल्याला व्यावहारिक असावं लागतं. तसेच जमिनीवरील परिस्थिती काय आहे, हे समजूनच निर्णय घ्यावे लागतात. आज तीन पक्ष मिळूनच आम्हाला विजय मिळणार आहे, अशी जमिनीवरील परिस्थिती आहे. एकट्या भाजपाच्या भरोशावर विजय मिळू शकणार नाही. तीनही पक्षांची बेरीज करून आम्ही विजयापर्यंत पोहोचतो आहोत. भाजपा हा महायुतीमधील सर्वात मोठा पक्ष आहे, सर्वाधिक मतं भाजपाकडे आहेत हे खरं आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला ते पक्ष हवे आहेत, त्यांची मतं हवी आहेत. मात्र त्यांना आम्ही जागा देणार नाही, असं म्हणता येत नाही. तडजोड करावीच लागले, असंही त्यांनी सांगितलं.

बाकी तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राची निवडणूक अशी आहे की, येथे सहा प्रमुख पक्ष आहेत. म्हणजे एवढे पक्ष आहेत की प्रत्येक कलाकाराला काही भूमिका आहे. इतके सिनेमे बनत आहेत की, प्रत्येकजण जो स्वत:ला हिरो समजतो. तो ज्या सिनेमात काम मिळेल तिकडे चाललाय. पण, काही लोकांच्या पक्ष सोडून जाण्याबाबत मला दु:खही आहे. मी त्यांची नावं घेणार नाही. पण युतीच्या राजकारणातील अपरिहार्यतेमुळे काही चांगली मंडळी आमच्यापासून दूर गेली, अशी खंतही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे