शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 16:33 IST

Maharashtra Assembly Election 2024: राज्यातील भाजपाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटातील उमेदवारांबाबत एक सूचक विधान केलं आहे. ठाकरे गटाच्या पहिल्या यादीमधील १७ उमेदवार हे आमचे नेते आहेत, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडीने आपल्या बहुतांश उमेदवारांची घोषणा केली आहे. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत राज्यातील समिकरणं बदललेली असल्याने सर्वच पक्षांमध्ये नाराजी आणि बंडखोरीला उत आला आहे. त्यामुळे पक्षांतरही मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटातील उमेदवारांबाबत एक सूचक विधान केलं आहे. ठाकरे गटाच्या पहिल्या यादीमधील १७ उमेदवार हे आमचे नेते आहेत, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

एनडीटीव्हीने आयोजित कार्यक्रमामध्ये मुलाखतीदरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जेव्हा आपण तडजोड करतो, तेव्हा काही लोकांवर अन्याय होतो. त्याचं दु:खही होतं. कारण पहिली अडीच वर्ष आम्ही २८८ जागांवर लढण्याची तयारी करत होतो. अनेक नेते आम्ही तयार केले. परवा मी पाहत होतो की, उद्धव ठाकरे यांनी जी पहिली यादी प्रसिद्ध केली. त्यामध्ये १७ नेते हे आमचे आहेत. ते आमच्या पक्षातील नेते होते. आता आजच्या काळात राजकारणामध्ये कुणी थांबायला तयार नाही, त्यामुळे त्यातले काही जण सांगतात की साहेब, आता आम्ही एवढी तयारी केली आहे आणि तुम्ही उमेदवारी मित्रपक्षाला दिली. आम्ही निष्ठावंतच आहोत. मात्र आता आम्ही संधी मिळेल तिथून लढतो, अशी माहिती त्यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकारणामध्ये आपल्याला व्यावहारिक असावं लागतं. तसेच जमिनीवरील परिस्थिती काय आहे, हे समजूनच निर्णय घ्यावे लागतात. आज तीन पक्ष मिळूनच आम्हाला विजय मिळणार आहे, अशी जमिनीवरील परिस्थिती आहे. एकट्या भाजपाच्या भरोशावर विजय मिळू शकणार नाही. तीनही पक्षांची बेरीज करून आम्ही विजयापर्यंत पोहोचतो आहोत. भाजपा हा महायुतीमधील सर्वात मोठा पक्ष आहे, सर्वाधिक मतं भाजपाकडे आहेत हे खरं आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला ते पक्ष हवे आहेत, त्यांची मतं हवी आहेत. मात्र त्यांना आम्ही जागा देणार नाही, असं म्हणता येत नाही. तडजोड करावीच लागले, असंही त्यांनी सांगितलं.

बाकी तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राची निवडणूक अशी आहे की, येथे सहा प्रमुख पक्ष आहेत. म्हणजे एवढे पक्ष आहेत की प्रत्येक कलाकाराला काही भूमिका आहे. इतके सिनेमे बनत आहेत की, प्रत्येकजण जो स्वत:ला हिरो समजतो. तो ज्या सिनेमात काम मिळेल तिकडे चाललाय. पण, काही लोकांच्या पक्ष सोडून जाण्याबाबत मला दु:खही आहे. मी त्यांची नावं घेणार नाही. पण युतीच्या राजकारणातील अपरिहार्यतेमुळे काही चांगली मंडळी आमच्यापासून दूर गेली, अशी खंतही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे